शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

लॉर्ड्सचे यश इशांतला आणखी परिपक्व बनवेल

By admin | Updated: July 25, 2014 01:13 IST

लॉर्डसवर 28 वर्षानंतर भारताची विजयी पताका फडकवण्यात सिंहाचा वाटा उचलणारा ईशांत शर्माने अपेक्षेचे एव्हरेस्ट पेलले असले, तरी त्याचे पाय अजूनही जमिनीवरच आहेत,

लॉर्डसवर 28 वर्षानंतर भारताची विजयी पताका फडकवण्यात सिंहाचा वाटा उचलणारा ईशांत शर्माने अपेक्षेचे एव्हरेस्ट पेलले असले, तरी त्याचे पाय अजूनही जमिनीवरच आहेत, तो म्हणतो, मी बळी मिळवले म्हणून लोक माझा उदोउदो करीत आहेत. पण समजा याउलट घडले असते, मला बळी मिळाले नसते किंवा मी धावा दिल्या असत्या, तर मला जयजयकाराऐवजी शिव्याशाप मिळाल्या असत्या. पण, मी सातत्याने बाउन्सरचा मारा करीत होतो, तेही 80 हून जास्त षटके वापर झालेल्या चेंडूने. हे सोपे काम नाही. बीसीसीआय टीव्हीशी बोलताना ईशांत सांगत होता. मी आता परिपक्व झालो आहे. कोणीही काहीही म्हंटले, तरी मला फारसा फरक पडत नाही. माङो सहकारी माङयावर विश्वास ठेवतात. मी काय करु शकतो, हे त्यांना माहीत आहे. 
त्याच्या या प्रतिक्रियेने त्याच्या आयुष्यातील वेदना कळू शकते. भारतीय क्रिकेट संघातील  स्थान हे त्याच्यासाठी मोरपिसांच्या गादीइतके सुखदायक नाही, हे सिद्ध होते. 2007 साली 19व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण केलेल्या ईशांतचे करियर चढ-उताराने भरलेले आहे. पदार्पणात ईशांतकडून खूप अपेक्षा केल्या जात होत्या. 2007-08 मधील ऑस्ट्रेलिया दौ:यात त्याच्या एका कृतीने भारताला एका महान विजयाची नोंद करता आली. पर्थमधील कसोटी सामन्यात कर्णधार कुंबळेने त्याला ‘और एक ओव्हर करेगा’ असे विचारले, असता त्याने ‘हां मैं करुंगा असे उत्तर दिले. पर्थवरील उन्हात त्याने ते षटक टाकताना वेग आणि स्टॅमिना याच्याशी तडजोड न करता जीव तोडून गोलंदाजी केली. याचे फळ त्याला लगेच मिळाले, पहिल्याच चेंडूवर ऑस्ट्रेलियन फलंदाज रिकी पाँटिंगची विकेट त्याने काढली. हा त्या सामन्यातील टर्निग पॉईंट होता. हा सामना भारताने जिंकून एका ऐतिहासिक विजयाची नोंद केली. 
तथापि यशाच्या अधून मधून सरी बरसणारा इशांत शर्मा कायमस्वरुपी भरवशाचा कधी वाटत नव्हता. तो त्याच्या कामाशी अतिशय प्रामाणिक असतो. चुका सुधारण्यासाठी सतत परिश्रम करतो, पण तो विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीसारखा संघाचा हुकमी एक्का कधी बनला नाही.
त्याच्या आठ वर्षाच्या कारकिर्दीत त्याने 57 कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने 37.4 च्या सरासरीने 174 बळी घेतले आहेत. डावात पाच बळी मिळवण्याची किमया त्याने 6 वेळा केली आहे. तर एकदा त्याने सामन्यात दहा बळी मिळविले आहेत. यावरुन त्याचा फॉर्म हा वळवाच्या पावसासारखा बेभरवशाचा असल्याचे दिसून येते. म्हणूनच संघातील त्याच्या स्थानावर टीकाकार प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. विदर्भाच्या उमेश यादवऐवजी ईशांतची निवड झाल्याचे पाहून अनेकांना धक्का बसला होता. पण या सर्वांवर मात करणारी एक शक्ती त्याच्याकडे आहे, ती म्हणजे कर्णधार धोनीचा त्याच्यावर असलेला विश्वास. त्याच्यावर आम्ही खूप इनव्हेस्टमेंट केली असल्याचे धोनी सांगतो. इशांतची स्ट्रेंथ त्याच्या कर्णधाराला माहीत होती. लॉर्ड्स कसोटीत त्याने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरविला.