शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
4
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
5
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
6
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
7
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
8
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
9
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
10
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
11
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
12
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
13
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
14
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
15
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
16
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
17
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
18
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
19
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
20
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर

लोकेश राहुल कारकिर्दीत सर्वोत्तम स्थानी

By admin | Updated: March 31, 2017 00:55 IST

आॅस्ट्रेलियाविरुद्ध धरमशाला येथे चौथ्या कसोटीत दोन अर्धशतके झळकविणारा सलामीवीर लोकेश राहुल हा

दुबई : आॅस्ट्रेलियाविरुद्ध धरमशाला येथे चौथ्या कसोटीत दोन अर्धशतके झळकविणारा सलामीवीर लोकेश राहुल हा आयसीसी फलंदाजी क्रमवारीत सर्वोत्कृष्ट ११ व्या स्थानावर विराजमान झाला. कर्नाटकच्या २४ वर्षांच्या राहुलचे मालिकेआधी क्रमवारीत ५७ वे स्थान होते. त्याने चार सामन्यात ६४, १०,९०, ५१,६७, ६० आणि नाबाद ५१ अशा धावा काढून थेट ४६ स्थानांची जबरदस्त झेप घेतली. यासह तो चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यानंतरचा सवोत्तम क्रमांकाचा भारतीय फलंदाज ठरला.दुसरीकडे, चेतेश्वर पुजारा चौथ्या आणि विराट कोहली पाचव्या स्थानावर आहे. पुजारा आणि कोहली यांची अनुक्रमे दोन व एका स्थानाने घसरण झाली आहे. चौथ्या कसोटीत भारताचे नेतृत्व केलेल्या अजिंक्य रहाणेने तीन स्थानांनी प्रगती करताना १४वे स्थान पटकावले असून मुरली विजय मात्र चार स्थानांनी ३४ व्या स्थानावर घसरला आहे. आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ फलंदाजांध्ये पहिल्या तर न्यूझीलंडचा केन विलियम्सन दुसऱ्या स्थानावर आहे.गोलंदाजीत रवींद्र जडेजा व रविचंद्रन आश्विन या फिरकी जोडीने पहिले दोन स्थान कायम राखले आहे. तसेच, आॅस्टे्रलियाविरुद्ध तुफानी मारा केलेला उमेश यादव करियरमधील सर्वोच्च २१ व्या स्थानी पोहोचला आहे. उमेशने चौथ्या कसोटीत पाच गडी बाद केले होते. अष्टपैलूंमध्ये जडेजा चमकला असून त्याने अश्विनकडून दुसरे स्थान हिसकावले. बांगलादेशचा शकिब अल हसन अव्वल स्थानी आहे. जडेजाने धरमशाला येथे चार गडी बाद करुन ६३ धावांचे योगदान दिले. त्याला मालिकावीराचा सन्मान मिळाला. (वृत्तसंस्था)आॅस्टे्रलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील अखेरच्या कसोटी सामन्यात दोन्ही डावात अर्धशतक झळकावताना मालिकेत एकूण ३९३ धावा काढल्या. त्याने या मालिकेत तब्बल ६ अर्धशतक झळकावताना सलामीवीर म्हणून स्वत:चे स्थान भक्कम केले. रविंद्र जडेजाने संपुर्ण मालिकेत निर्णायक अष्टपैलू कामगिरी करताना भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्याने चार सामन्यांत २५ बळी घेताना फलंदाजीतही चमक दाखवताना १२७ धावा काढल्या. त्यात, अखेरच्या कसोटीमध्ये पहिल्या डावात त्याने संघ अडचणीत असताना केलेली ६३ धावांची निर्णायक ठरली.या अर्धशतकाच्या जोरावर आघाडी घेतल्यानंतर भारताने कांगारुंना लोळवले. विशेष म्हणजे, हुकमी फिरकी गोलंदाज रविचंद्रन आश्विन प्रभावी कामगिरी करण्यात अपयशी ठरल्यानंतरही जडेजाने आपल्या धडाक्यापुढे आश्विनच्या वर्चस्वाची कमतरता भासू दिली नाही.