शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

भारतात दर्जेदार स्थानिक स्पर्धांची उणीव

By admin | Updated: March 31, 2015 23:17 IST

भारतात दर्जेदार स्थानिक स्पर्धांचे आयोजन होत नसल्यामुळे दर्जेदार टेनिसपटू निर्माण होत नाहीत, असे मत महान टेनिसपटू रमेश कृष्णन यांनी व्यक्त केले.

नवी दिल्ली : भारतात दर्जेदार स्थानिक स्पर्धांचे आयोजन होत नसल्यामुळे दर्जेदार टेनिसपटू निर्माण होत नाहीत, असे मत महान टेनिसपटू रमेश कृष्णन यांनी व्यक्त केले. भविष्यातील चॅम्पियन तयार करण्यासाठी खेळाचा प्रचार व प्रसार देशाच्या काना-कोपऱ्यात होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.१९८७ मध्ये आॅस्ट्रेलियाचा पराभव करीत भारताला डेव्हिस कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रमेश कृष्णनला भारतीय खेळाडूंमधील उणिवांबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘‘ती वेळ वेगळी होती. त्या वेळी भारतीय टेनिस वर्तुळ विश्व टेनिसचा महत्त्वाचा भाग होते. प्रत्येक तीन-चार महिन्यांत येथे चांगल्या स्पर्धेचे आयोजन होत होते. त्यामुळे अधिक पैसा खर्च होत नव्हता, पण आता सर्व स्पर्धा युरोपमध्ये होत आहेत. त्यामुळे युरोपला चांगला लाभ मिळत आहे. भारतीय खेळाडूंना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मोठा प्रवास करावा लागतो. ही खर्चिक बाब आहे. येथे अधिकाधिक स्पर्धांचे आयोजन झाले तर युवा खेळाडूंना कामगिरीमध्ये सुधारणा करण्याची संधी मिळेल.’’ १९७९ मध्ये विम्बल्डन आणि फ्रेंच ओपन स्पर्धेत ज्युनिअर गटात जेतेपद पटकावणारे आणि जागतिक क्रमवारीत ज्युनिअर गटात अव्वल स्थान भूषवलेले खेळाडू असलेले रमेश म्हणाले, ‘‘त्या वेळी येथे मोठ्या स्पर्धा होत होत्या. युरोपमध्ये वर्षांतील काही महिने टेनिस होत होते.’’महान खेळाडू रामनाथन कृष्णनचे पुत्र असलेल्या रमेश यांनी १९८० च्या दशकात तीन ग्रॅण्डस्लॅममध्ये उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती. १९८५ मध्ये त्यांनी जागतिक क्रमवारीत २३ वे स्थान पटकावले होते. रमेश म्हणाले, ‘‘भारतीय खेळाडू आता अनेक खेळांमध्ये चमकदार कामगिरी करीत आहेत. बॅडमिंटनमध्ये आपली कामगिरी उल्लेखनीय ठरत आहे. सर्व खेळांमध्ये खेळाडूंना प्रतिस्पर्ध्यांसोबत संघर्ष करावा लागत आहे. भारतीय क्रीडा वर्तुळासाठी ही चांगली बाब आहे. टेनिसमध्ये युवा खेळाडूंना आकर्षित करण्यासाठी योजना तयार करणे आवश्यक आहे.’’ भारताचे आघाडीचे टेनिसपटू सोमदेव देववर्मन व युकी भांबरी यांच्याबाबत बोलताना रमेश म्हणाले, ‘‘सोमदेव चांगला खेळत आहे. त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. या दुखापतीतून तो पूर्णपणे सावरला असेल, असे मला वाटत नाही. भारतासाठी ही दुर्दैवाची बाब आहे. युकीने काही चांगले विजय मिळवले आहे.’’ (वृत्तसंस्था)