शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
4
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
7
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
8
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
9
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
10
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
11
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
12
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
13
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
14
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
15
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
16
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
17
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
18
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
19
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
20
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल

विजयी लय कायम राखू : कुंबळे

By admin | Updated: February 7, 2017 20:03 IST

टीम इंडियाचे मुख्य कोच अनिल कुंबळे यांनी बांगला देशविरुद्ध एकमेव कसोटीत विजयी लय कायम राखू

ऑनलाइन लोकमतहैदराबाद, दि. 7 - कसोटी जिंकण्यासाठी २० बळी घेण्यावर विशेष भर देत टीम इंडियाचे मुख्य कोच अनिल कुंबळे यांनी बांगला देशविरुद्ध एकमेव कसोटीत विजयी लय कायम राखू, असा विश्वास व्यक्त केला आहे. इंग्लंड विरुद्ध जी विजयी घोडदौड सुरू झाली ती पुढेही कायम राहील, असा विश्वास व्यक्त करीत कुंबळे पुढे म्हणाले, मायदेशात नुकतीच संपलेली इंग्लंड विरुद्धची मालिका यशस्वी ठरली. विजयाची परंपरा पुढेही कायम राहील. यानंतर अनेक कसोटी मालिका खेळायच्या असल्याने बांगलादेशविरुद्ध खेळताना इंग्लंड आणि त्याआधीचा न्यूझीलंड विरुद्धचा विजयी अनुभव पणाला लावण्याचा प्रयत्न असेल. बांगलादेशविरुद्ध विजयासाठी वेगळे प्रयत्न करावे लागतील, असे वाटत नसल्याचे सांगून कुंबळे म्हणाले, विजयासाठी काही वेगळे करण्याची गरज नाही. आधी ज्या ताकदीने विजय मिळविले ती ताकद पुन्हा झोकून दिल्यास विजय आमच्या बाजूने येईल, यात शंका नाही. बांगला देश संघ खेळात फार प्रगत झाला आहे. न्यूझीलंडमध्ये निकाल थोडा वेगळा लागला तरी बांगलादेशची कामगिरी कमकुवत नव्हती. आम्ही प्रतिस्पर्धी संघाचा सन्मान करतो. बांगला देश संघात दर्जेदार व अष्टपैलू खेळाडू आहेत.त्यामुळे सामना रंगतदार होईल. आमच्या वेगवान गोलंदाजांनी अलीकडे जी यशस्वी कामगिरी केली त्यावरून प्रतिस्पर्धी संघाचे २० गडी बाद करण्यात यश मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. इंग्लंड विरुद्ध फिरकीचा बोलबाला राहिला, असे बोलले जाते. पण कुंबळे यांच्या मते, वेगवान गोलंदाजांची कामगिरी नजरेआड करता येणार नाही. कधी वेगवान तर कधी फिरकी माऱ्यामुळे प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणता आले. एकूणच २० गडी बाद करण्याची क्षमता आमच्या गोलंदाजांमध्ये आली आहे. बांगलादेशविरुद्ध काय डावपेच राहतील, या प्रश्नाच्या उत्तरात कुंबळे म्हणाले, हे सत्रातील खेळावर अवलंबून राहील. कसोटीत प्रत्येक सत्रातील खेळ सामन्याचा निकाल फिरवीत असल्याने आम्ही सत्रानुसार डावपेच आखू. एक कसोटी असली तरी पाच दिवसांत काय काय घडू शकते, यावर बारकाईने लक्ष असेल.