शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

धोनीच्या टीकाकारांना कोहलीचे विराट उत्तर

By admin | Updated: July 7, 2017 22:15 IST

संथ फलंदाजीमुळे धोनीवर जोरदार टीका करण्यात आली होती. पाचव्या एकदिवसीय सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना विराटने धोनीची पाठराखण केली

ऑनलाइन लोकमतकिंग्स्टन, दि. 7 - सर्वोत्कृष्ट फिनिशर मानला जाणा-या धोनीने वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वांत कूर्मगती खेळी केली. चौथ्या सामन्यात त्याने 114 चेंडूत केवळ 54 धावा केल्या पण 190 चे विजयी लक्ष्य गाठून देऊ शकला नव्हता. याच खेळीमुळे धोनीच्या करिअरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. संथ फलंदाजीमुळे धोनीवर जोरदार टीका करण्यात आली होती. पाचव्या एकदिवसीय सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना विराटने धोनीची पाठराखण केली. यावेळी धोनीच्या टीकाकारांना त्याने सडेतोड उत्तर दिले. तो म्हणाला धोनीनं कसं खेळावं हे कोणीही सांगायची गरज नाही.

आणखी वाचा Happy Birthday एम.एस.धोनी ! जाणून घ्या माहीच्या या खास गोष्टी

 

धोनीच्या निवृत्तीच्या मागणीविषयी प्रश्न विचारताच कोहलीने धोनीचे समर्थन केले. यावर तो म्हणाला, परिस्थितीनुरुप खेळणे आणि धावसंख्येला आकार देणे हे अनुभवी खेळाडूंना सांगण्याची गरज नाही. विकेट कशी आहे याकडेही लक्ष द्यावे लगेल. ती विकेट खेळण्यायोग्य नव्हतीच. एक सामना किंवा एक खेळी खराब झाल्यामुळे संयम सोडण्याची गरज नाही. कुठल्याही फलंदाजाला एखाद्या सामन्यात खराब फॉर्मचा सामना करावा लागू शकतो. धोनीबाबत कुठली समस्या आहे, असे मला वाटत नाही.

आणखी वाचा - सात वर्षात पहिल्यांदाच रहाणेनं केला हा पराक्रम

हार्दिक पांड्या आणि केदार जाधव यांच्यासारखे खेळाडू संघात असल्याबद्दल मी खूष असून हे फलंदाज तळाच्या स्थानावर आक्रमकता जोपासतात, असे कर्णधार विराट कोहलीचे मत आहे. अपेक्षा असताना कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेत संघात फारसे काही बदल केले नाहीत. मालिका ३-१ ने जिंकल्यानंतर कोहली म्हणाला, तुम्ही कुठल्याही संघाला सोहजपणे घेऊ शकत नाहीत. हार्दिक आणि केदारसाख्यांना तुम्ही वरच्या स्थानावर तसेच आघाडीच्या फलंदाजांना तळाच्या स्थानावर खेळवू शकत नाही.

आणखी वाचा विराट कोहलीने मोडला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्धी संघांचा सन्मान राखावाच लागतो. खेळपट्टीचे स्वरूप कसे आहे. हे ओळखून डावपेचांवर ठामपणे अंमल करण्याविषयी विचार केला पाहिजे.  हार्दिक आणि केदार यांच्यात आम्ही सर्व खेळाडू आत्मविश्वास जागविण्याचे काम करतो. त्यांच्या क्षमतेवर विश्वास असल्याने दोघेही प्रभावी कामगिरी करण्यास नेहमी सज्ज असतात, असे सांगून तो म्हणाला, नेहमी एकसारखे बाद होणे आपल्याला पसंत नाही. चुका सुधारणे तसेच कामगिरी करणे हेच माझ्या यशाचे गमक आहे.