शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

कोहलीने स्वत:ला सिद्ध केले : जयसूर्या

By admin | Updated: September 13, 2015 04:07 IST

टीम इंडियाने तब्बल २२ वर्षांनतर श्रीलंकेत २-१ ने कसोटी मालिका जिंकली. या ऐेतिहासिक जेतेपदात कर्णधार या नात्याने विराट कोहलीच्या नेतृत्वगुणाचा चांगलाच कस लागला; पण

नागपूर : टीम इंडियाने तब्बल २२ वर्षांनतर श्रीलंकेत २-१ ने कसोटी मालिका जिंकली. या ऐेतिहासिक जेतेपदात कर्णधार या नात्याने विराट कोहलीच्या नेतृत्वगुणाचा चांगलाच कस लागला; पण त्याने स्वत:ची प्रतिभा सिद्ध केल्याचे मत श्रीलंकेचा माजी धडाकेबाज फलंदाज आणि सलामीवीर सनथ जयसूर्या याने शनिवारी नागपुरात व्यक्त केले. वन डे क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूपासून गोलंदाजीच्या चिंधड्या उडविण्याचा नवा पायंडा खरे तर जयसूर्याने पाडला. भारताविरुद्ध या खेळाडूने अनेकदा मनसोक्त खेळून धावांचा पाऊस पाडला होता. एका वैद्यकीय परिषदेसाठी आलेला जयसूर्या ‘लोकमत’शी बोलताना म्हणाला, ‘‘विराटने संघाचे यशस्वी नेतृत्व करून भारताला २२ वर्षांनंतर मालिका विजय मिळवून दिला. त्याने स्वत:च्या कौशल्याने संघाचे जे नेतृत्व केले, त्याची सर्वांनी प्रशंसा करायला हवी. पाच गोलंदाज खेळविणे हा धाडसी निर्णय होता; पण त्याने अपेक्षित निकाल देऊन ५ गोलंदाज खेळविणे कसे लाभदायी असते, हेदेखील सिद्ध केले. विराट हा जोखीम पत्करणारा आणि जीव ओतून खेळणारा खेळाडू आहे. स्वत:कडे असलेल्या क्लृप्त्यांचा वापर करायलादेखील तो मागेपुढे पाहत नाही.’’लंकेकडून १४ कसोटी आणि २८ वन डे शतके ठोकणाऱ्या जयसूर्याने गेल्या ३ एप्रिलला लंकेच्या मुख्य निवडकर्ता पदाचा राजीनामा दिला होता. अटापट्टूच्या राजीनाम्यानंतर लंकेचे कोचपद स्वीकारण्याची काही ‘आॅफर’ आहे काय, असे विचारताच लंका क्रिकेटबद्दल काहीसा नाराजीचा सूर त्याच्या बोलण्यातून जाणवत होता. नुकत्याच झालेल्या मालिकेत भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीचे त्याने कौतुक केले. फिरकीपटूंबद्दल तो म्हणाला, ‘‘आश्विन आणि अमित मिश्रा यांनी स्वत:च्या कुवतीपेक्षा किती तरी चांगली गोलंदाजी केली.’’ सनथने भारताच्या वेगवान गोलंदाजांचीदेखील पाठ थोपटली. भारत-लंका मालिकेदरम्यान ‘आक्रमकता’ आणि खेळाडूंमधील ‘शाब्दिक चकमक’ चांगलीच गाजली. याविषयी जयसूर्याचे मत जाणून घेतले असता सनथ म्हणाला, ‘‘मैदानावर असे प्रकार घडत असतात; पण सामना संपल्यानंतर त्याची प्रतिक्रिया बाहेर उमटायला नको. खेळाडूंनी आयसीसी आचारसंहितेचे भान राखूनच वर्तन करावे. या मालिकेत जो प्रकार घडला त्याबद्दल मॅच रेफ्रीने ईशांत, दिनेश चांदीमल, धम्मिका प्रसाद, लाहिरू थिरिमाने यांना दिलेली शिक्षा योग्यच आहे.’’ आमच्या वेळी भारताविरुद्ध वारंवार साामने खेळले जायचे; पण उभय देशांत कधीही असे प्रसंग ओढवले नाहीत. आमच्या वेळी आम्ही सभ्यपणे क्रिकेट खेळलो, असे सनथने नमूद केले. (क्रीडा प्रतिनिधी)