शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

कोहलीने स्वत:ला सिद्ध केले : जयसूर्या

By admin | Updated: September 13, 2015 04:07 IST

टीम इंडियाने तब्बल २२ वर्षांनतर श्रीलंकेत २-१ ने कसोटी मालिका जिंकली. या ऐेतिहासिक जेतेपदात कर्णधार या नात्याने विराट कोहलीच्या नेतृत्वगुणाचा चांगलाच कस लागला; पण

नागपूर : टीम इंडियाने तब्बल २२ वर्षांनतर श्रीलंकेत २-१ ने कसोटी मालिका जिंकली. या ऐेतिहासिक जेतेपदात कर्णधार या नात्याने विराट कोहलीच्या नेतृत्वगुणाचा चांगलाच कस लागला; पण त्याने स्वत:ची प्रतिभा सिद्ध केल्याचे मत श्रीलंकेचा माजी धडाकेबाज फलंदाज आणि सलामीवीर सनथ जयसूर्या याने शनिवारी नागपुरात व्यक्त केले. वन डे क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूपासून गोलंदाजीच्या चिंधड्या उडविण्याचा नवा पायंडा खरे तर जयसूर्याने पाडला. भारताविरुद्ध या खेळाडूने अनेकदा मनसोक्त खेळून धावांचा पाऊस पाडला होता. एका वैद्यकीय परिषदेसाठी आलेला जयसूर्या ‘लोकमत’शी बोलताना म्हणाला, ‘‘विराटने संघाचे यशस्वी नेतृत्व करून भारताला २२ वर्षांनंतर मालिका विजय मिळवून दिला. त्याने स्वत:च्या कौशल्याने संघाचे जे नेतृत्व केले, त्याची सर्वांनी प्रशंसा करायला हवी. पाच गोलंदाज खेळविणे हा धाडसी निर्णय होता; पण त्याने अपेक्षित निकाल देऊन ५ गोलंदाज खेळविणे कसे लाभदायी असते, हेदेखील सिद्ध केले. विराट हा जोखीम पत्करणारा आणि जीव ओतून खेळणारा खेळाडू आहे. स्वत:कडे असलेल्या क्लृप्त्यांचा वापर करायलादेखील तो मागेपुढे पाहत नाही.’’लंकेकडून १४ कसोटी आणि २८ वन डे शतके ठोकणाऱ्या जयसूर्याने गेल्या ३ एप्रिलला लंकेच्या मुख्य निवडकर्ता पदाचा राजीनामा दिला होता. अटापट्टूच्या राजीनाम्यानंतर लंकेचे कोचपद स्वीकारण्याची काही ‘आॅफर’ आहे काय, असे विचारताच लंका क्रिकेटबद्दल काहीसा नाराजीचा सूर त्याच्या बोलण्यातून जाणवत होता. नुकत्याच झालेल्या मालिकेत भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीचे त्याने कौतुक केले. फिरकीपटूंबद्दल तो म्हणाला, ‘‘आश्विन आणि अमित मिश्रा यांनी स्वत:च्या कुवतीपेक्षा किती तरी चांगली गोलंदाजी केली.’’ सनथने भारताच्या वेगवान गोलंदाजांचीदेखील पाठ थोपटली. भारत-लंका मालिकेदरम्यान ‘आक्रमकता’ आणि खेळाडूंमधील ‘शाब्दिक चकमक’ चांगलीच गाजली. याविषयी जयसूर्याचे मत जाणून घेतले असता सनथ म्हणाला, ‘‘मैदानावर असे प्रकार घडत असतात; पण सामना संपल्यानंतर त्याची प्रतिक्रिया बाहेर उमटायला नको. खेळाडूंनी आयसीसी आचारसंहितेचे भान राखूनच वर्तन करावे. या मालिकेत जो प्रकार घडला त्याबद्दल मॅच रेफ्रीने ईशांत, दिनेश चांदीमल, धम्मिका प्रसाद, लाहिरू थिरिमाने यांना दिलेली शिक्षा योग्यच आहे.’’ आमच्या वेळी भारताविरुद्ध वारंवार साामने खेळले जायचे; पण उभय देशांत कधीही असे प्रसंग ओढवले नाहीत. आमच्या वेळी आम्ही सभ्यपणे क्रिकेट खेळलो, असे सनथने नमूद केले. (क्रीडा प्रतिनिधी)