शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

कोहलीने स्वत:ला सिद्ध केले : जयसूर्या

By admin | Updated: September 13, 2015 04:07 IST

टीम इंडियाने तब्बल २२ वर्षांनतर श्रीलंकेत २-१ ने कसोटी मालिका जिंकली. या ऐेतिहासिक जेतेपदात कर्णधार या नात्याने विराट कोहलीच्या नेतृत्वगुणाचा चांगलाच कस लागला; पण

नागपूर : टीम इंडियाने तब्बल २२ वर्षांनतर श्रीलंकेत २-१ ने कसोटी मालिका जिंकली. या ऐेतिहासिक जेतेपदात कर्णधार या नात्याने विराट कोहलीच्या नेतृत्वगुणाचा चांगलाच कस लागला; पण त्याने स्वत:ची प्रतिभा सिद्ध केल्याचे मत श्रीलंकेचा माजी धडाकेबाज फलंदाज आणि सलामीवीर सनथ जयसूर्या याने शनिवारी नागपुरात व्यक्त केले. वन डे क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूपासून गोलंदाजीच्या चिंधड्या उडविण्याचा नवा पायंडा खरे तर जयसूर्याने पाडला. भारताविरुद्ध या खेळाडूने अनेकदा मनसोक्त खेळून धावांचा पाऊस पाडला होता. एका वैद्यकीय परिषदेसाठी आलेला जयसूर्या ‘लोकमत’शी बोलताना म्हणाला, ‘‘विराटने संघाचे यशस्वी नेतृत्व करून भारताला २२ वर्षांनंतर मालिका विजय मिळवून दिला. त्याने स्वत:च्या कौशल्याने संघाचे जे नेतृत्व केले, त्याची सर्वांनी प्रशंसा करायला हवी. पाच गोलंदाज खेळविणे हा धाडसी निर्णय होता; पण त्याने अपेक्षित निकाल देऊन ५ गोलंदाज खेळविणे कसे लाभदायी असते, हेदेखील सिद्ध केले. विराट हा जोखीम पत्करणारा आणि जीव ओतून खेळणारा खेळाडू आहे. स्वत:कडे असलेल्या क्लृप्त्यांचा वापर करायलादेखील तो मागेपुढे पाहत नाही.’’लंकेकडून १४ कसोटी आणि २८ वन डे शतके ठोकणाऱ्या जयसूर्याने गेल्या ३ एप्रिलला लंकेच्या मुख्य निवडकर्ता पदाचा राजीनामा दिला होता. अटापट्टूच्या राजीनाम्यानंतर लंकेचे कोचपद स्वीकारण्याची काही ‘आॅफर’ आहे काय, असे विचारताच लंका क्रिकेटबद्दल काहीसा नाराजीचा सूर त्याच्या बोलण्यातून जाणवत होता. नुकत्याच झालेल्या मालिकेत भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीचे त्याने कौतुक केले. फिरकीपटूंबद्दल तो म्हणाला, ‘‘आश्विन आणि अमित मिश्रा यांनी स्वत:च्या कुवतीपेक्षा किती तरी चांगली गोलंदाजी केली.’’ सनथने भारताच्या वेगवान गोलंदाजांचीदेखील पाठ थोपटली. भारत-लंका मालिकेदरम्यान ‘आक्रमकता’ आणि खेळाडूंमधील ‘शाब्दिक चकमक’ चांगलीच गाजली. याविषयी जयसूर्याचे मत जाणून घेतले असता सनथ म्हणाला, ‘‘मैदानावर असे प्रकार घडत असतात; पण सामना संपल्यानंतर त्याची प्रतिक्रिया बाहेर उमटायला नको. खेळाडूंनी आयसीसी आचारसंहितेचे भान राखूनच वर्तन करावे. या मालिकेत जो प्रकार घडला त्याबद्दल मॅच रेफ्रीने ईशांत, दिनेश चांदीमल, धम्मिका प्रसाद, लाहिरू थिरिमाने यांना दिलेली शिक्षा योग्यच आहे.’’ आमच्या वेळी भारताविरुद्ध वारंवार साामने खेळले जायचे; पण उभय देशांत कधीही असे प्रसंग ओढवले नाहीत. आमच्या वेळी आम्ही सभ्यपणे क्रिकेट खेळलो, असे सनथने नमूद केले. (क्रीडा प्रतिनिधी)