शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

कोहलीने योग्यच केले : अझहर

By admin | Updated: December 14, 2014 23:55 IST

भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीनने विराट कोहलीच्या कृतीचे समर्थन केले. विराटने आॅस्ट्रेलियाच्या धावांचा पाठलाग करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच होता, असे अझहरुद्दिनने म्हटले आहे.

नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीनने विराट कोहलीच्या कृतीचे समर्थन केले. विराटने आॅस्ट्रेलियाच्या धावांचा पाठलाग करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच होता, असे अझहरुद्दिनने म्हटले आहे.कोहलीने पाचव्या दिवशी आॅस्ट्रेलियाच्या ३६४ धावांचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र संघाला ४८ धावांंनी पराभूत व्हावे लागले होते. भारताने शेवटचे आठ बळी फक्त ७३ धावांत गमावले. भारतीय फलंदाजांच्या कामगिरीने अझहरुद्दिनला निराशा झाली नाही. यामुळे आॅस्ट्रेलियाच्या गोलंदाजांच्या उणिवा दिसल्या. तो म्हणाला, ‘मला वाटते विराटने धावांचा पाठलाग करून खूप चांगली गोष्ट केली. आपण चांगले खेळत होतो. मात्र ऐन मोक्याच्या वेळी विकेट पडल्यामुळे पराभव झाला. मात्र यामुळे आॅस्ट्रेलियाच्या गोलंदाजांच्या आक्रमणातील उणिवा दिसल्या.’या कार्यक्रमात पाकिस्तानचा माजी कर्णधार वासिम अक्रम, जलदगती गोलंदाज शोएब अख्तर, भारताचे गौतम गंभीर व वीरेंद्र सेहवाग यांनीही सहभाग घेतला होता. शोएब अख्तरनेही विराट कोहलीची स्तुती केली. तो म्हणाला, ‘या सामन्यात तो ज्या पद्धतीने खेळला त्याद्वारे त्याने तो फक्त महान वन-डे खेळाडू नसून तो जबरदस्त कसोटी खेळाडू असल्याचेही सिद्ध केले आहे.’ विश्वचषकाच्या संभाव्य विजेत्याबद्दल विचारले असता अख्तर म्हणाला, ‘भारताकडे सध्या ताशी १४० कि.मी. वेगाने चेंडू टाकू शकणारे तीन गोलंदाज आहेत, ही चांगली गोष्ट आहे, मात्र त्यांनी फिट राहणे गरजेचे आहे. पाकिस्तान आणि भारताने योग्य पद्धतीने खेळ केला, तर या दोन संघांपैकीच एक विजेता असेल.’विश्वचषकाच्या प्रबळ दावेदारांबाबत विचारले असता गौतम गंभीर म्हणाला, ‘कोणत्याही एका संघाची निवड करणे अशक्य आहे. मला मनापासून वाटते की भारत विश्वचषक जिंकेल. मात्र, आॅस्ट्रेलिया विश्वचषकाचा प्रबळ दावेदार आहे, कारण त्यांच्या भूमीत ही स्पर्धा होत आहे.’सेहवागने दक्षिण आफ्रिका आणि आॅस्ट्रेलिया हे प्रबळ दावेदार असल्याचे सांगितले. अक्रमने दक्षिण आफ्रिका हा सर्वांत धोकादायक संघ असल्याचे सांगितले.