शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

धोनींच्या डोळयांकडे पाहून चेंडू कुठे टाकायचा ते समजते - केदार जाधव

By admin | Updated: June 16, 2017 10:47 IST

विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार असला तरी, माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या अनुभवचाही संघाला प्रचंड फायदा होत आहे.

 ऑनलाइन लोकमत 

बर्मिंगहॅम, दि. 16 - विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार असला तरी, माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या अनुभवचाही संघाला प्रचंड फायदा होत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बांगलादेश विरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात महत्वाची भूमिका बजावणा-या केदार जाधवने धोनीची आपल्याला भरपूर मदत होत असल्याचे मान्य केले. 
 
मी जास्त गोलंदाजीचा सराव करत नाही पण एमएस धोनीसोबत राहून शक्य तितके त्याच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करतो. धोनीने त्याच्याकडे जो अनुभव, ज्ञान आहे ते त्याने मला दिले. गोलंदाजी करतानाही यष्टीपाठून धोनी मला सतत मार्गदर्शन करत असतो. कुठल्या फलंदाजाला कशी गोलंदाजी करावी हे तो मला सांगत असतो. मी सुद्धा त्याच्या सल्ल्यानुसार गोलंदाजी करतो असे केदारने सांगितले. गोलंदाजी करताना धोनींच्या डोळयांकडे पाहिल्यानंतर माझ्याकडून कुठला चेंडू त्याला अपेक्षित आहे ते लक्षात येते असे केदारने सांगितले. 
 
जाधव स्वत:ला काम चलाऊ गोलंदाज समजत नाही. आपल्याकडे गोलंदाजीत वैविध्य असून यापूर्वीच्या मालिकेतही मी गोलंदाजी केलीय. मी वरच्या फळीतील फलंदाजांना बाद केलेय असे जाधवने सांगितले. कालच्या सामन्यात विराटने केदारच्या हाती चेंडू सोपवल्यानंतर त्याने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला.
 
आणखी वाचा 
 
केदारने तमीम इक्बाल (71) आणि मुशाफीकूर रहिमची (61) जमलेली जोडी फोडली. त्यामुळे भारताला सामन्यावर पकड मिळवता आली. हार्दिक पंडयाला मार बसल्यानंतर विराटने केदारच्या हाती चेंडू सोपवला. केदारने सहा षटकात 22 धावा देत दोन गडी बाद केले.  
 
चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाने बांगलादेशला पराभूत करत मोठ्या दिमाखात अंतिम फेरी गाठली. बांगलादेशने दिलेले २६५ धावांचे आव्हान टीम इंडियाने ४०.१ षटकांत ९ गडी राखून पूर्ण केले. या विजयाचा शिल्पकार ठरला तो शतकवीर रोहित शर्मा. त्याने १२९ चेंडूत १२३ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. त्याला कर्णधार विराट कोहली (९६) आणि सलामीवीर शिखर धवन (४६) यांनी दमदार साथ दिली. तत्पूर्वी अष्टपैलू खेळाडू केदार जाधव याने घेतलेल्या दोन बळींच्या जोरावर भारताने बांगलादेशला २६४ धावात गुंडाळले. 
 
बांगलादेशचा सलामीवीर तमीम इक्बाल आणि मुशीफिकूर रहीम यांनी शतकी भागीदारी करत भारतीय गोलंदाजांना घाम फोडला होता. त्या वेळी कर्णधाराने चेंडू केदारकडे सोपवला. कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत केदारने तमीम इक्बालला त्रिफळाचीत केले. त्यानंतर प्रमुख गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली.