शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

धोनींच्या डोळयांकडे पाहून चेंडू कुठे टाकायचा ते समजते - केदार जाधव

By admin | Updated: June 16, 2017 10:47 IST

विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार असला तरी, माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या अनुभवचाही संघाला प्रचंड फायदा होत आहे.

 ऑनलाइन लोकमत 

बर्मिंगहॅम, दि. 16 - विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार असला तरी, माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या अनुभवचाही संघाला प्रचंड फायदा होत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बांगलादेश विरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात महत्वाची भूमिका बजावणा-या केदार जाधवने धोनीची आपल्याला भरपूर मदत होत असल्याचे मान्य केले. 
 
मी जास्त गोलंदाजीचा सराव करत नाही पण एमएस धोनीसोबत राहून शक्य तितके त्याच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करतो. धोनीने त्याच्याकडे जो अनुभव, ज्ञान आहे ते त्याने मला दिले. गोलंदाजी करतानाही यष्टीपाठून धोनी मला सतत मार्गदर्शन करत असतो. कुठल्या फलंदाजाला कशी गोलंदाजी करावी हे तो मला सांगत असतो. मी सुद्धा त्याच्या सल्ल्यानुसार गोलंदाजी करतो असे केदारने सांगितले. गोलंदाजी करताना धोनींच्या डोळयांकडे पाहिल्यानंतर माझ्याकडून कुठला चेंडू त्याला अपेक्षित आहे ते लक्षात येते असे केदारने सांगितले. 
 
जाधव स्वत:ला काम चलाऊ गोलंदाज समजत नाही. आपल्याकडे गोलंदाजीत वैविध्य असून यापूर्वीच्या मालिकेतही मी गोलंदाजी केलीय. मी वरच्या फळीतील फलंदाजांना बाद केलेय असे जाधवने सांगितले. कालच्या सामन्यात विराटने केदारच्या हाती चेंडू सोपवल्यानंतर त्याने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला.
 
आणखी वाचा 
 
केदारने तमीम इक्बाल (71) आणि मुशाफीकूर रहिमची (61) जमलेली जोडी फोडली. त्यामुळे भारताला सामन्यावर पकड मिळवता आली. हार्दिक पंडयाला मार बसल्यानंतर विराटने केदारच्या हाती चेंडू सोपवला. केदारने सहा षटकात 22 धावा देत दोन गडी बाद केले.  
 
चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाने बांगलादेशला पराभूत करत मोठ्या दिमाखात अंतिम फेरी गाठली. बांगलादेशने दिलेले २६५ धावांचे आव्हान टीम इंडियाने ४०.१ षटकांत ९ गडी राखून पूर्ण केले. या विजयाचा शिल्पकार ठरला तो शतकवीर रोहित शर्मा. त्याने १२९ चेंडूत १२३ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. त्याला कर्णधार विराट कोहली (९६) आणि सलामीवीर शिखर धवन (४६) यांनी दमदार साथ दिली. तत्पूर्वी अष्टपैलू खेळाडू केदार जाधव याने घेतलेल्या दोन बळींच्या जोरावर भारताने बांगलादेशला २६४ धावात गुंडाळले. 
 
बांगलादेशचा सलामीवीर तमीम इक्बाल आणि मुशीफिकूर रहीम यांनी शतकी भागीदारी करत भारतीय गोलंदाजांना घाम फोडला होता. त्या वेळी कर्णधाराने चेंडू केदारकडे सोपवला. कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत केदारने तमीम इक्बालला त्रिफळाचीत केले. त्यानंतर प्रमुख गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली.