शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
4
बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
5
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
6
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
7
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
8
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
9
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
10
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
11
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
12
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
13
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
14
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
15
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
16
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
17
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
18
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
19
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
20
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन

धोनींच्या डोळयांकडे पाहून चेंडू कुठे टाकायचा ते समजते - केदार जाधव

By admin | Updated: June 16, 2017 10:47 IST

विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार असला तरी, माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या अनुभवचाही संघाला प्रचंड फायदा होत आहे.

 ऑनलाइन लोकमत 

बर्मिंगहॅम, दि. 16 - विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार असला तरी, माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या अनुभवचाही संघाला प्रचंड फायदा होत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बांगलादेश विरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात महत्वाची भूमिका बजावणा-या केदार जाधवने धोनीची आपल्याला भरपूर मदत होत असल्याचे मान्य केले. 
 
मी जास्त गोलंदाजीचा सराव करत नाही पण एमएस धोनीसोबत राहून शक्य तितके त्याच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करतो. धोनीने त्याच्याकडे जो अनुभव, ज्ञान आहे ते त्याने मला दिले. गोलंदाजी करतानाही यष्टीपाठून धोनी मला सतत मार्गदर्शन करत असतो. कुठल्या फलंदाजाला कशी गोलंदाजी करावी हे तो मला सांगत असतो. मी सुद्धा त्याच्या सल्ल्यानुसार गोलंदाजी करतो असे केदारने सांगितले. गोलंदाजी करताना धोनींच्या डोळयांकडे पाहिल्यानंतर माझ्याकडून कुठला चेंडू त्याला अपेक्षित आहे ते लक्षात येते असे केदारने सांगितले. 
 
जाधव स्वत:ला काम चलाऊ गोलंदाज समजत नाही. आपल्याकडे गोलंदाजीत वैविध्य असून यापूर्वीच्या मालिकेतही मी गोलंदाजी केलीय. मी वरच्या फळीतील फलंदाजांना बाद केलेय असे जाधवने सांगितले. कालच्या सामन्यात विराटने केदारच्या हाती चेंडू सोपवल्यानंतर त्याने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला.
 
आणखी वाचा 
 
केदारने तमीम इक्बाल (71) आणि मुशाफीकूर रहिमची (61) जमलेली जोडी फोडली. त्यामुळे भारताला सामन्यावर पकड मिळवता आली. हार्दिक पंडयाला मार बसल्यानंतर विराटने केदारच्या हाती चेंडू सोपवला. केदारने सहा षटकात 22 धावा देत दोन गडी बाद केले.  
 
चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाने बांगलादेशला पराभूत करत मोठ्या दिमाखात अंतिम फेरी गाठली. बांगलादेशने दिलेले २६५ धावांचे आव्हान टीम इंडियाने ४०.१ षटकांत ९ गडी राखून पूर्ण केले. या विजयाचा शिल्पकार ठरला तो शतकवीर रोहित शर्मा. त्याने १२९ चेंडूत १२३ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. त्याला कर्णधार विराट कोहली (९६) आणि सलामीवीर शिखर धवन (४६) यांनी दमदार साथ दिली. तत्पूर्वी अष्टपैलू खेळाडू केदार जाधव याने घेतलेल्या दोन बळींच्या जोरावर भारताने बांगलादेशला २६४ धावात गुंडाळले. 
 
बांगलादेशचा सलामीवीर तमीम इक्बाल आणि मुशीफिकूर रहीम यांनी शतकी भागीदारी करत भारतीय गोलंदाजांना घाम फोडला होता. त्या वेळी कर्णधाराने चेंडू केदारकडे सोपवला. कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत केदारने तमीम इक्बालला त्रिफळाचीत केले. त्यानंतर प्रमुख गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली.