शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Khel Ratna Award: भारताचे 'गोल्डन बॉईज' ठरलेत 'खेलरत्न'चे मानकरी; पाहा या जोडीची अभिमानास्पद कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 17:13 IST

Khel Ratna Award : सात्विकसाईराज रँकीरेड्डी व चिराग शेट्टी यांना ( Satwiksairaj Rankireddy - Chirag Shetty ) यंदाचा मेजर ध्यान चंद खेल रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.

वर्ल्ड चॅम्पियन्सशीप, राष्ट्रकुल स्पर्धा, आशियाई स्पर्धा, आशियाई चॅम्पियन्सशीप अशा नावाजलेल्या स्पर्धा गाजवणाऱ्या सात्विकसाईराज रँकीरेड्डी व चिराग शेट्टी यांना ( Satwiksairaj Rankireddy - Chirag Shetty ) यंदाचा मेजर ध्यान चंद खेल रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. पुलेला गोपिचंद ( २०००-२००१), सायना नेहवाल  ( २०१०) व पी व्ही सिंधू ( २०१६) यांच्यानंतर खेल रत्न पुरस्कार जिंकणारे हे चौथे बॅटमिंटनपटू आहेत. जागतिक क्रमवारीत नंबर १ क्रमांकावर झेप घेणारी चिराग व सात्विकरसाईराज ही पहिली भारतीय जोडी ठरली होती.

प्रकाश पादुकोण ( १९८०) हे पुरुष एकेरीत आणि सायना नेहवाल ( २०१५) ही महिला एकेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर होते. त्यानंतर किदंबी श्रीकांतने २०१८ मध्ये अव्वल स्थान पटकावले होते. मुंबईचा चिराग शेट्टी व आंध्रप्रदेशचा सात्विकसाईराज ही पहिली जोडी ज्यांनी हा पराक्रम केला. या जोडीने २०२२ चे वर्ष गाजवले. त्यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकल्यानंतर यंदा मार्चमध्ये स्वीस ओपन स्पर्धा जिंकली. त्यानंतर आशिया अजिंक्यपद स्पर्धा जिंकून इतिहास रचला. भारताला ५८ वर्षानंतर या स्पर्धेत जेतेपद पटकावता आले. १९६५ साली दिनेश खन्ना यांनी सर्वप्रथम ही स्पर्धा जिंकली होती.  

चिराग शेट्टी व सात्विकसाईराज यांनी २०२२ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आणि त्याचवर्षी त्यांनी आशियाई स्पर्धेचे सुवर्णपदकही नावावर केले. २०२२ च्या आशियाई स्पर्धेत या दोघांच्या कामगिरीच्या जोरावर भारताने पुरुष सांघिक गटात रौप्यपदक नावावर केले. २०२३ मध्ये त्यांनी इंडोनेशिया ओपन स्पर्धा जिंकली आणि सुपर १००० स्पर्धा जिंकणारी ही पहिली भारतीय जोडी ठरली. त्यांनी BWF World Tour जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय जोडीचा मानही पटकावला.  

BWF World Tour स्पर्धेत सात्विकने चिरागसोबत ७ जेतेपद पटकावली, तर ३ स्पर्धांमध्ये त्याला उप विजेतेपदावर समाधान मानावे लागले. 

 

टॅग्स :BadmintonBadmintonMumbaiमुंबई