शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
4
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
5
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
6
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
7
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
8
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
11
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
12
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
13
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
14
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
15
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
16
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
17
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
18
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
19
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
20
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!

करुण, जयंतच्या यशात विराट, अनिलची भूमिका महत्त्वाची : द्रविड

By admin | Updated: December 26, 2016 01:32 IST

भारत ‘अ’ आणि अंडर-१९ संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने कसोटी कर्णधार विराट कोहली व मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांची प्रशंसा केली.

नवी दिल्ली : भारत ‘अ’ आणि अंडर-१९ संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने कसोटी कर्णधार विराट कोहली व मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांची प्रशंसा केली. युवा खेळाडूंना सहज वाटेल, असा माहोल त्यांनी संघात तयार केला, असे द्रविड म्हणाला. द्रविडच्या मते भारत ‘अ’ संघातील करुण नायर व जयंत यादव यांच्यासाठी ‘प्रक्रिया’ तयार करण्यात आल्यामुळे ते यशस्वी ठरले.द्रविड म्हणाला, ‘स्थानिक स्पर्धा आणि ‘अ’ संघातर्फे चमकदार कामगिरी केल्यानंतर हे खेळाडू राष्ट्रीय संघात दाखल झाले. राष्ट्रीय संघातील माहोलमुळे हे खेळाडू यशस्वी ठरले. तेथे त्यांच्यावर कुठलेही दडपण नसून त्यांना सहज वाटत आहे. त्यामुळे त्यांना चमकदार कामगिरी करता आली. राष्ट्रीय संघातील माहोल सहज करण्याचे श्रेय सर्वस्वी विराट कोहली व अनिल कुंबळे यांना द्यायला हवे. त्यामुळे आपल्याला अनुकूल निकाल मिळत असून या प्रक्रियेचा एक भाग होणे शानदार आहे.’द्रविडने करुण नायरला ‘अ’ संघ, दिल्ली डेअरडेव्हिल्स व राजस्थान रॉयल्स संघातर्फे खेळताना बघितले आहे. त्याच्या यशाचा द्रविडला अभिमान आहे. द्रविड म्हणाला, ‘त्याला पहिले शतक झळकावताना बघणे आणि त्याचे रुपांतर त्रिशतकात करताना बघणे शानदार होते. त्यामुळे त्याच्या क्षमतेची प्रचिती येते’द्रविडने सांगितले की, ‘माझे काम ‘अ’ आणि अंडर-१९ संघांसाठी सामने जिंकणे आणि राष्ट्रीय संघासाठी चांगले खेळाडू तयार करण्याचे आहे. माझ्या मते अंडर-१९ व ‘अ’ संघ हे निकालासाठी नाहीत. अनुकूल निकाल मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतो, पण युवा खेळाडूंचा विकास व त्यांना संधी मिळणे अधिक महत्त्वाचे आहे. प्रशिक्षकाचे काम केवळ त्यांना खेळाडू म्हणून घडविणेच नसून चांगली कारकीर्द घडविण्यासाठी मार्गदर्शन करण्याचे असते.’ (वृत्तसंस्था)

करुण, राहुल व जयंत यांच्यासारख्या खेळाडूंना या युगात बघताना आनंद होतो. हार्दिक पंड्याला ‘अ’ संघाच्या दौऱ्यात संधी मिळाली होती, पण दुखापतग्रस्त असल्यामुळे त्याला खेळता आले नव्हते. - राहूल द्रविड