शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

कबड्डी खेळण्यासाठी पुन्हा भारतात येणार नाही - पाकिस्तान

By admin | Updated: December 21, 2014 20:21 IST

विश्वचषकात भारताकडून पराभव झालेल्या पाकिस्तान संघाने कबड्डी खेळण्यासाठी पुन्हा भारतात येणार नाही असे म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत 
बादल, दि. २१ - विश्वचषकात भारताकडून पराभव झालेल्या पाकिस्तान संघाने कबड्डी खेळण्यासाठी पुन्हा भारतात येणार नाही असे म्हटले आहे. आयोजकांनी पक्षपातीपणा केल्यामुळेच आमचा पराभव झाला असे पाकच्या कबड्डी संघाचे म्हणणे आहे. 
पंजाबमधील बादल येथे नुकताच कबड्डी विश्वचषक पार पडला असून या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये भारताने पाकचा पराभव करत विश्वचषकावर नाव कोरले आहे. मात्र आता भारताच्या विजयापेक्षा पाकिस्तानी खेळाडूंच्या रडगाण्यांमुळेच हा विश्वचषक चर्चेचा विषय ठरला आहे. सामन्याच्या शेवटच्या काही क्षणांपर्यंत पाक संघ ४ गुणांनी पुढे होता. मात्र यानंतर शेवटच्या काही मिनीटांमध्ये भारतीय कबड्डीपटूंनी चमकदार कामगिरी करत पाकवर ४५ - ४२ अशा फरकाने विजय मिळवला. यापराभवानंतर पाकचे कबड्डीपटू मैदानातच रडू लागले. आयोजकांनी पक्षपातीपणा करत नियोजीत वेळेच्या तीन मिनीटांपूर्वीच सामना संपवला असा आरोप पाक संघाचा कर्णधार शफीक चिश्तीने केला आहे. भारतीय खेळाडूंनी अंगाला तेल लावले होते व यामुळे त्यांना पकडता येत नव्हते, तर दुसरीकडे आम्हाला पाणी प्यायचीही संधी दिली जात नव्हती असे चिश्तीने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. पाक संघाचे प्रशिक्षक मलिक सफदर यांनीही चिश्तीच्या सुरात सूर मिसळले आहेत. भारताने खेळ भावनेला धक्का दिला असून आम्ही पुन्हा विश्वचषकासाठी येणार नाही असे सफदर यांनी सांगितले. या स्पर्धेचे आयोजन पंजाब सरकारकडे होते. याविषयी पंजाबचे उपमुख्यमंत्री आणि आयोजन समितीचे सदस्य सुखबीर बादल यांनी पाक खेळाडूंचा आरोप फेटाळून लावला असला तरी आम्ही त्यांच्या आरोपांची चौकशी करु असे बादल यांनी सांगितले.