शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

जितू रायचा सुवर्णवेध

By admin | Updated: March 2, 2017 00:10 IST

उत्कृष्ट वेध साधून येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत बुधवारी पुरुषांच्या ५० मीटर पिस्तुल प्रकारात सुवर्णवेध घेतला.

नवी दिल्ली : जितू रायने पुन्हा एकदा एकाग्रतेचा उत्कृष्ट वेध साधून येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत बुधवारी पुरुषांच्या ५० मीटर पिस्तुल प्रकारात सुवर्णवेध घेतला. अमनप्रीतसिंग रौप्यपदक जिंकण्यात यशस्वी ठरला. जितू रायने मंगळवारी दहा मीटर पिस्तुलमध्ये कांस्य जिंकल्यानंतर स्पर्धेतील हे दुसरे पदक ठरले.सेनेचा जवान असलेल्या जितूने कर्णीसिंग शूटिंग रेंजवर २३०.१ असा विश्वविक्रमी स्कोअर नोंदविला. दुसरीकडे, फायनलमध्ये बऱ्याच वेळा आघाडीवर राहिलेल्या अमनप्रीतने २२६.९ गुणांसह विश्वचषक स्पर्धेच्या पदार्पणातच रौप्यपदक जिंकण्याची किमया केली. इराणचा नेमबाज वाहीद गोलखांदन २०८.० गुणांसह कांस्यपदकाचा मानकरी ठरला.पहिल्या दोन फेऱ्यांनंतर अंतिम फेरी गाठणारा २९ वर्षांचा जितू ८ नेमबाजांमध्ये सहाव्या स्थानावर होता. त्यानंतर बाद फेरीत १०.८ गुण नोंदविताच तो सहाव्यावरून तिसऱ्या स्थानावर आला; शिवाय कझाकिस्तानच्या नेमबाजाला त्याच्यामुळे बाहेर व्हावे लागले. त्यानंतरच्या पुढील २ फेऱ्यांमध्ये आणखी सरस कामगिरीसह जितू पहिल्या स्थानावर पोहोचला. अमनप्रीत माघारताच त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. पूजा घाटकरने विश्वचषक स्पर्धेत भारताला पहिले पदक मिळवून दिले होते. अंकुर मित्तलने ट्रॅपमध्ये रौप्य आणि रायने दहा मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्य जिंकले होते. राय आणि हिना सिद्धू यांच्या जोडीने मिश्र सांघिक प्रकारात अव्वल स्थान पटकावले होते; पण ही केवळ चाचणी स्पर्धा असल्याने पदक विचारात घेतले जात नाही. (वृत्तसंस्था) >सुवर्ण जिंकल्यानंतर जितू म्हणाला, ‘‘माझी सुरुवात खराब झाली; पण खेळात चढउतार चालायचेच. मला खेळातील अनिश्चितता चांगली वाटते. असे झाले नाही, तर खेळातील रोमांचकपणा संपुष्टात येईल. २०१६च्या सत्राचा शेवट मी विश्वचषकात रौप्य विजयाने केला होता. २०१७ मध्ये देशासाठी शानदार सुरुवात करण्याचे स्वप्न पाहिले होते. यंदादेखील म्युनिच विश्वचषकात सहभागी होण्याचे स्वप्न जोपासले आहे.’’ ५५९ रायने याआधी पात्रता फेरीत ५५९ गुण मिळविल्याने आघाडीवर असलेल्या अमनप्रीतच्या (५६१ गुण) तुलनेत तो माघारला होता. >महिलांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुलमध्ये मुस्कान ५७६ गुणांसह १२ व्या आणि राही सरनोबत २३व्या स्थानावर राहिल्या. महिला स्कीट प्रकारात रश्मी राठोड १७ व्या, आरती सिंग २४ व्या आणि सानिया शेख २७ व्या स्थानावर राहिल्या.>देशात प्रथमच आयोजित विश्वचषकात चाहत्यांपुढे सुवर्ण जिंकणे शानदार ठरले. हा मोठा सन्मान आहे. भारतीय तिरंगा उंचावताना पाहणे सुखद वाटते. - जितू राय, सुवर्णविजेता