शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

जितू रायचा सुवर्णवेध

By admin | Updated: March 2, 2017 00:10 IST

उत्कृष्ट वेध साधून येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत बुधवारी पुरुषांच्या ५० मीटर पिस्तुल प्रकारात सुवर्णवेध घेतला.

नवी दिल्ली : जितू रायने पुन्हा एकदा एकाग्रतेचा उत्कृष्ट वेध साधून येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत बुधवारी पुरुषांच्या ५० मीटर पिस्तुल प्रकारात सुवर्णवेध घेतला. अमनप्रीतसिंग रौप्यपदक जिंकण्यात यशस्वी ठरला. जितू रायने मंगळवारी दहा मीटर पिस्तुलमध्ये कांस्य जिंकल्यानंतर स्पर्धेतील हे दुसरे पदक ठरले.सेनेचा जवान असलेल्या जितूने कर्णीसिंग शूटिंग रेंजवर २३०.१ असा विश्वविक्रमी स्कोअर नोंदविला. दुसरीकडे, फायनलमध्ये बऱ्याच वेळा आघाडीवर राहिलेल्या अमनप्रीतने २२६.९ गुणांसह विश्वचषक स्पर्धेच्या पदार्पणातच रौप्यपदक जिंकण्याची किमया केली. इराणचा नेमबाज वाहीद गोलखांदन २०८.० गुणांसह कांस्यपदकाचा मानकरी ठरला.पहिल्या दोन फेऱ्यांनंतर अंतिम फेरी गाठणारा २९ वर्षांचा जितू ८ नेमबाजांमध्ये सहाव्या स्थानावर होता. त्यानंतर बाद फेरीत १०.८ गुण नोंदविताच तो सहाव्यावरून तिसऱ्या स्थानावर आला; शिवाय कझाकिस्तानच्या नेमबाजाला त्याच्यामुळे बाहेर व्हावे लागले. त्यानंतरच्या पुढील २ फेऱ्यांमध्ये आणखी सरस कामगिरीसह जितू पहिल्या स्थानावर पोहोचला. अमनप्रीत माघारताच त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. पूजा घाटकरने विश्वचषक स्पर्धेत भारताला पहिले पदक मिळवून दिले होते. अंकुर मित्तलने ट्रॅपमध्ये रौप्य आणि रायने दहा मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्य जिंकले होते. राय आणि हिना सिद्धू यांच्या जोडीने मिश्र सांघिक प्रकारात अव्वल स्थान पटकावले होते; पण ही केवळ चाचणी स्पर्धा असल्याने पदक विचारात घेतले जात नाही. (वृत्तसंस्था) >सुवर्ण जिंकल्यानंतर जितू म्हणाला, ‘‘माझी सुरुवात खराब झाली; पण खेळात चढउतार चालायचेच. मला खेळातील अनिश्चितता चांगली वाटते. असे झाले नाही, तर खेळातील रोमांचकपणा संपुष्टात येईल. २०१६च्या सत्राचा शेवट मी विश्वचषकात रौप्य विजयाने केला होता. २०१७ मध्ये देशासाठी शानदार सुरुवात करण्याचे स्वप्न पाहिले होते. यंदादेखील म्युनिच विश्वचषकात सहभागी होण्याचे स्वप्न जोपासले आहे.’’ ५५९ रायने याआधी पात्रता फेरीत ५५९ गुण मिळविल्याने आघाडीवर असलेल्या अमनप्रीतच्या (५६१ गुण) तुलनेत तो माघारला होता. >महिलांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुलमध्ये मुस्कान ५७६ गुणांसह १२ व्या आणि राही सरनोबत २३व्या स्थानावर राहिल्या. महिला स्कीट प्रकारात रश्मी राठोड १७ व्या, आरती सिंग २४ व्या आणि सानिया शेख २७ व्या स्थानावर राहिल्या.>देशात प्रथमच आयोजित विश्वचषकात चाहत्यांपुढे सुवर्ण जिंकणे शानदार ठरले. हा मोठा सन्मान आहे. भारतीय तिरंगा उंचावताना पाहणे सुखद वाटते. - जितू राय, सुवर्णविजेता