शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
2
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
3
“१०० टक्के माझ्या वॉर्डातून लढणार, ठाकरे बंधू १३० पेक्षा जास्त जागा जिंकणार”: किशोरी पेडणेकर
4
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
5
बापरे! करोडपती सरकारी अधिकारी, ६२ कोटींची मालमत्ता, आलिशान फ्लॅट्स अन् रोख रक्कम; तेलंगणा उपपरिवहन आयुक्तांच्या साम्राज्याचे गुपिते उघड
6
"तेव्हा बडव्यांनी घेरलं होतं, मग आता हातमिळवणी कशी?" शेलारांचा राज ठाकरेंना रोखठोक सवाल!
7
Travel : कुठे आहे सांता क्लॉजचे खरेखुरे गाव, जिथे रोजच साजरा होतो ख्रिसमस? तुम्हीही जाऊ शकता फिरायला!
8
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
9
ठाकरे बंधूंची युती घोषित; पाहा, राज-उद्धव यांच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील १० ठळक मुद्दे
10
Tata Nexon EV खरेदी करायची आहे? किती करावं लागेल डाऊनपेमेंट, पाहा EMI चं संपूर्ण गणित
11
'धुरंधर'नंतर 'दृश्यम ३'मध्ये दिसणार होता अक्षय खन्ना, पण अचानक सोडला सिनेमा? कारण...
12
“मुंबईचे लचके तोडले जातायत, गुजरातच्या दावणीला मुंबईला बांधले जातेय”: विजय वडेट्टीवार
13
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
14
BMC Election: "ते रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे..." ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर बावनकुळेंचा प्रहार!
15
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
16
Video: जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; CRPF कॅम्पमध्ये घुसून जवानावर हल्ला
17
ढासू परतावा...! : या SME स्टॉकनं ३ महिन्यांत दिला 225% हून अधिक परतावा, लोकांना केलं मालामाल; केडियालांकडे तब्बल 393100 शेअर
18
बंडखोरीच्या भीतीनं पक्षांची गुपित रणनीती, जागावाटपाचा तिढा सुटेना; भाजपात इच्छुकांची गर्दी
19
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
20
४ दिवसांपासून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळतोय 'हा' शेअर; सरकारच्या घोषणेचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

जैशाने विशेष रिफ्रेशमेंट नाकारले होते!

By admin | Updated: August 25, 2016 20:55 IST

रिओ आॅलिम्पिकमधील मॅरेथॉनदरम्यान मला कुठल्याही प्रकारचे विशेष रिफ्रेशमेंट नको. त्याची काहीही गरज नसल्याचे ओपी जैशा हिने स्वत: म्हटले होते.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 25  :रिओ आॅलिम्पिकमधील मॅरेथॉनदरम्यान मला कुठल्याही प्रकारचे विशेष रिफ्रेशमेंट नको. त्याची काहीही गरज नसल्याचे ओपी जैशा हिने स्वत: म्हटले होते.  तिचे खासगी कोच निकोलाय स्रेसारेव यांनीच ही कबुली दिल्याने जैशाने सुरू केलेला वाद नव्या वळणावर पोहोचला आहे. बेलारुसचे असलेले निकोलाय यांनी जैशाला विशेष रिफ्रेशमेंटची गरज राहीलका, अशी विचारणा केली होती. पण जैशाने त्यास नकार दिला. त्यानंतर रेसदरम्यान जैशाला विशेष रिफ्रेशमेंट लागणार नसल्याचे आपण भारतीय अ‍ॅथ्लेटिक्स संघटनेला कळविले होते, असे निकोलाय यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

राष्ट्रीय विक्रमाची मानकरी जैशा हिने आरोप केला होता की, कडक उन्हात आयोजित मॅरेथॉनदरम्यान भारतीय अ‍ॅथ्लेटिक्स संघटनेने पिण्याचे पाणी आणि एनर्जी ड्रिंक्सची व्यवस्था केली नव्हती. त्यामुळे धावताना मला जीव गेल्याचा भास होत होता. एएफआयच्या अधिकाऱ्यांनी मात्र जैशाचा आरोप खोटा ठरविला.

बेंगळुरुच्या साई केंद्रात बोलताना निकोलाय म्हणाले,जैशाने याआधी मॅरेथॉनदरम्यान कधीही पाणी किंवा एनर्जी ड्रिंक्सचा वापर केला नाही. मॅरेथॉनच्या एक दिवसापूर्वी मुख्य कोचचे सहायक राधाकृष्ण नायर यांनी माझ्याकडे जैशासाठी ड्रिंक्स किंवा पाण्याची गरज आहे काय अशी विचारणा केली होती. मी जैशाला ही बाब सांगितली. तिने केवळ साधारण पाण्याची मागणीकेली. तेव्हा जैशा रेसदरम्यान साधारण पाणी घेणार असल्याचे मी एएफआयला कळविले होते. जैशाने आॅलिम्पिकच्या तयारी दरम्यानही कधी विशेष ड्रिंक्स घेतले नाही. ती साधारण पाण्याचा वापर करीत असे. २०१६ मध्ये जैशाने कधीही विशेष ड्रिंक्स घेतले नाही.

रिओमध्ये आयोजकांनी पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था केली होती का, असे विचारताच निकोलाय म्हणाले,ह्यअसे नव्हते. मी रेसमध्ये धावलो नाही. संपूर्ण ४२ किमी जैशासोबत नव्हतो. काही अंतरापर्यंतचे चित्र मी सांगू शकतो. माझी नजर जिथवर जात होती, तिथे पाण्याची व्यवस्था होती. या रेसमध्ये एकूण १५७ धावापटू धावले. ७० व्या स्थानावर आलेला धावपटू आणित्याच्या कोचकडे विचारणा केली तेव्हा त्याने पाण्याची व्यवस्था २५-३० किमीनंतर होती आणि ती पुरेशी नसल्याचे सांगितले होते. मी जैशासोबत बोललो तेव्हा तिने देखील हा प्रकार सांगितला. २५ किमीनंतर पाण्याचीव्यवस्था(स्पजिंग पार्इंट) हे मॅरेथॉनमधील आदर्श स्थान नव्हे इतकेच मी सांगू शकतो