शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
5
२ हेल्थ इन्शुन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
6
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
7
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
8
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
9
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
10
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
11
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
12
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
13
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
14
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
15
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
16
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
17
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
18
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
19
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
20
गावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी

विजयाचे श्रेय जसप्रीत बुमराहला...

By admin | Updated: March 26, 2016 02:15 IST

बांगलादेशने पुन्हा एकदा तोंडाशी आलेला विजयाचा घास हिसकावण्याची संधी दिली; पण भारतीय संघ फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर का खेळत आहे, हे न उलगडणारे कोडं आहे.

- वासिम आक्रम लिहितो़...

बांगलादेशने पुन्हा एकदा तोंडाशी आलेला विजयाचा घास हिसकावण्याची संधी दिली; पण भारतीय संघ फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर का खेळत आहे, हे न उलगडणारे कोडं आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघांनाही बरोबरीची संधी मिळते. बांगलादेशविरुद्ध भारताने पाटा खेळपट्टीवर खेळायला पाहिजे होते. भारतीय संघाला फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर खेळण्याचा सल्ला कोण देत आहे? बांगलादेशविरुद्धचा भारताचा विजय हा चमत्कार होता. बांगलादेशने अनेक चुका केल्या. अखेरच्या षटकात तीन चेंडंूवर ९ धावा वसूल केल्यानंतर महमुदुल्ला व मुशफिकर यांच्यासारख्या अनुभवी फलंदाजांना अशा प्रकारचे फटके खेळण्याची गरजच नव्हती. दडपणाखाली हा संघ ढेपाळला.टी-२० क्रिकेटमध्ये कुठल्याही खेळपट्टीवर १४५ धावांच्या लक्ष्याचा बचाव करणे कठीण असल्याची भारताला चांगली कल्पना होती; पण अखेर यजमान संघ नशिबवान ठरला. पंड्याने अखेरचा चेंडू ‘लेंथ बॉल’ केला; पण बांगलादेशच्या तळाच्या फलंदाजाने स्टम्प कव्हर न केल्यामुळे त्याला विजयासाठी आवश्यक धावा फटकावता आल्या नाहीत. ही बाब कुणी प्रशिक्षक सांगू शकत नाही. तळाच्या फलंदाजांना मर्यादा ओलांडून विचार करण्याची गरज आहे. धोनी नेहमी आकलनापलीकडचा विचार करतो. पंड्या लेंथ चेंडूने फलंदाजाला बिट करण्यात यशस्वी ठरल्यामुळे यजमान संघ नशिबवान ठरला. शिवाय धोनीने सुरुवातीला ग्लोव्हज् काढून घेत हुशारीची प्रचिती दिली. भारताने बांगलादेशविरुद्ध विजय मिळविला असला तरी यजमान संघाला अद्याप या स्पर्धेत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. बुमराहने १९ व्या षटकांत चांगला मारा केला. भारताने त्याला १९ वे षटक टाकण्याची संधी दिली, हे चांगले झाले. जर पंड्याने १९ व्या षटकांत गोलंदाजी केली असती, तर सामना त्याच षटकांत संपला असता. बुमराहने दडपण झुगारत चांगले यॉर्कर टाकले. दुसऱ्या बाजूचा विचार करता पाकिस्तान संघ सध्या दडपणाखाली आहे. न्यूझीलंडविरुद्ध या संघाने विजयाची संधी गमावली. अहमद शहजाद व उमर अकमल यांना फुलटॉस चेंडूंवर बाउंड्री लगावता आली नाही. (टीसीएम)