शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

विजयाचे श्रेय जसप्रीत बुमराहला...

By admin | Updated: March 26, 2016 02:15 IST

बांगलादेशने पुन्हा एकदा तोंडाशी आलेला विजयाचा घास हिसकावण्याची संधी दिली; पण भारतीय संघ फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर का खेळत आहे, हे न उलगडणारे कोडं आहे.

- वासिम आक्रम लिहितो़...

बांगलादेशने पुन्हा एकदा तोंडाशी आलेला विजयाचा घास हिसकावण्याची संधी दिली; पण भारतीय संघ फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर का खेळत आहे, हे न उलगडणारे कोडं आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघांनाही बरोबरीची संधी मिळते. बांगलादेशविरुद्ध भारताने पाटा खेळपट्टीवर खेळायला पाहिजे होते. भारतीय संघाला फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर खेळण्याचा सल्ला कोण देत आहे? बांगलादेशविरुद्धचा भारताचा विजय हा चमत्कार होता. बांगलादेशने अनेक चुका केल्या. अखेरच्या षटकात तीन चेंडंूवर ९ धावा वसूल केल्यानंतर महमुदुल्ला व मुशफिकर यांच्यासारख्या अनुभवी फलंदाजांना अशा प्रकारचे फटके खेळण्याची गरजच नव्हती. दडपणाखाली हा संघ ढेपाळला.टी-२० क्रिकेटमध्ये कुठल्याही खेळपट्टीवर १४५ धावांच्या लक्ष्याचा बचाव करणे कठीण असल्याची भारताला चांगली कल्पना होती; पण अखेर यजमान संघ नशिबवान ठरला. पंड्याने अखेरचा चेंडू ‘लेंथ बॉल’ केला; पण बांगलादेशच्या तळाच्या फलंदाजाने स्टम्प कव्हर न केल्यामुळे त्याला विजयासाठी आवश्यक धावा फटकावता आल्या नाहीत. ही बाब कुणी प्रशिक्षक सांगू शकत नाही. तळाच्या फलंदाजांना मर्यादा ओलांडून विचार करण्याची गरज आहे. धोनी नेहमी आकलनापलीकडचा विचार करतो. पंड्या लेंथ चेंडूने फलंदाजाला बिट करण्यात यशस्वी ठरल्यामुळे यजमान संघ नशिबवान ठरला. शिवाय धोनीने सुरुवातीला ग्लोव्हज् काढून घेत हुशारीची प्रचिती दिली. भारताने बांगलादेशविरुद्ध विजय मिळविला असला तरी यजमान संघाला अद्याप या स्पर्धेत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. बुमराहने १९ व्या षटकांत चांगला मारा केला. भारताने त्याला १९ वे षटक टाकण्याची संधी दिली, हे चांगले झाले. जर पंड्याने १९ व्या षटकांत गोलंदाजी केली असती, तर सामना त्याच षटकांत संपला असता. बुमराहने दडपण झुगारत चांगले यॉर्कर टाकले. दुसऱ्या बाजूचा विचार करता पाकिस्तान संघ सध्या दडपणाखाली आहे. न्यूझीलंडविरुद्ध या संघाने विजयाची संधी गमावली. अहमद शहजाद व उमर अकमल यांना फुलटॉस चेंडूंवर बाउंड्री लगावता आली नाही. (टीसीएम)