शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

संघातून वगळल्यामुळे जडेजाच्या कामगिरीत सुधारणा

By admin | Updated: November 16, 2015 02:43 IST

भारतीय संघातून काही काळ बाहेर राहिल्यामुळे डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाला चुका सुधारण्याची संधी मिळाली आणि आता त्याला त्याचा लाभ मिळाला

बंगळुरू : भारतीय संघातून काही काळ बाहेर राहिल्यामुळे डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाला चुका सुधारण्याची संधी मिळाली आणि आता त्याला त्याचा लाभ मिळाला, असे मत भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी व्यक्त केले. जडेजाने आतापर्यंत भारताचा प्रमुख फिरकीपटू रविचंद्रन आश्विनला योग्य साथ दिली आहे. या दोन्ही फिरकीपटूंनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत आतापर्यंत तीन डावांमध्ये प्रत्येकी १२ बळी घेतले आहेत.पावसाच्या व्यत्ययामुळे रविवारी दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द झाल्यानंतर पत्रकारांसोबत बोलताना अरुण म्हणाले, ‘‘जडेजाला संघातून वगळण्यात आल्यानंतर कुठल्या विभागात सुधारणा करण्याची गरज आहे, हे समजण्याची संधी मिळाली. रणजी ट्रॉफीमध्ये सौराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना जडेजाने ३० बळी घेतले आहेत. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास उंचावण्यास मदत मिळाली. कसोटी, वन-डे किंवा टी-२० क्रिकेटमध्ये जडेजा आमचा ‘स्टॉक’ गोलंदाज आहे. तो आपल्या क्षमतेचा कसा उपयोग करायचा, याची त्याला चांगली माहिती आहे. जडेजाने आपल्या खेळामध्ये सुधारणा केली आहे.’’अरुण यांनी सांगितले की, ‘‘आता प्रत्येकाच्या नावाचा उल्लेख करणे सयुक्तिक ठरणार नाही, पण आमच्याकडे गोलंदाजांचा चांगला पूल तयार झाला आहे. त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.’’ ईशांतच्या अ‍ॅक्शनमधील बदलाबाबत बोलताना अरुण म्हणाले, ‘‘दिल्लीचा हा वेगवान गोलंदाज आता अचूक मारा करीत आहे. त्यामुळे तो यशस्वी ठरत आहे. त्याच्या अ‍ॅक्शनमध्ये विशेष बदल केलेला नाही. आम्ही त्याला गोलंदाजी करताना दिशा व टप्पा कुठे राखायला पाहिजे याचे मार्गदर्शन केले.’’टर्निंग विकेटमुळे भारताच्या वेगवान गोलंदाजांच्या विकासासाठी अडथळा निर्माण होईल का, या मताशी मी सहमत नाही.(वृत्तसंस्था)भुवनेश्वर कुमारला चेंडू अधिक स्विंग करणे आवश्यक आहे. त्याचा वेग वाढलेला आहे, ही आनंदाची बाब आहे. भुवनेश्वर १४० किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी करू शकतो. त्याच्यात चेंडू स्विंग करण्याचीही क्षमता आहे. त्याच्या गोलंदाजीचा वेग वाढलेला आहे, पण स्विंग करणे आवश्यक आहे. त्यावर मेहनत घेतली तर तो यशस्वी ठरेल. भारतात वेगवान गोलंदाजांचा रिझर्व्ह पूल चांगला तयार झाला असून त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.’’- भरत अरुण, गोलंदाजी प्रशिक्षक, भारतीय संघ