शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
4
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
5
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
6
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
7
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
9
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
10
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
11
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
12
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
13
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
14
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
15
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
16
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
17
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
18
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
20
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या

पुनरागमन ठरले यशस्वी - जडेजा

By admin | Updated: December 6, 2015 01:45 IST

भारतीय संघात यशस्वी पुनरागमन करणाऱ्या रवींद्र जडेजाने नशिबवान असल्याचे कबूल केले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत २१ बळी घेत जडेजाने शानदार पुनरागमन केले.

नवी दिल्ली : भारतीय संघात यशस्वी पुनरागमन करणाऱ्या रवींद्र जडेजाने नशिबवान असल्याचे कबूल केले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत २१ बळी घेत जडेजाने शानदार पुनरागमन केले. पुनरागमनानंतर सर्वकाही अनुकूल घडले, असे जडेजा म्हणाला. रणजी स्पर्धेत ३४ बळी घेतल्यानंतर जडेजाने कसोटी संघात पुनरागमन केले. चौथ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात ३० धावांच्या मोबदल्यात पाच बळी घेणारा जडेजा म्हणाला,‘मी सहा महिने संघाबाहेर होतो. रणजी स्पर्धेत तीन सामने खेळण्याची संधी मिळाली. नशिबाची साथ मिळाली आणि खेळपट्ट्याही फिरकीला अनुकूल मिळाल्या. मी बरीच मेहनत घेत आहे, यात काही संशय नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका प्रारंभ होण्यापूर्वी रणजी स्पर्धा प्रारंभ झाली. माझ्यासाठी सर्वकाही अनुकूल घडले.’जडेजाने सांगितले की,‘आम्ही पहिल्या डावात चांगली फलंदाजी केली. दक्षिण आफ्रिका संघाला पहिल्या डावात लौकिकाला साजेशी फलंदाजी करता आली नाही. त्यामुळे भारतीय संघाला २१३ धावांची भक्कम आघाडी घेता आली. खेळपट्टी यानंतर यापेक्षा खडतर होईल आणि आम्हाला वर्चस्व गाजवण्याची संधी राहील. दुसऱ्या डावात त्यांना बाद करावे लागेल. नागपूरच्या तुलनेत ही खेळपट्टी चांगली आहे. फिरकीपटूंची कामगिरी एकमेकांना पूरक ठरत आहे. रणजी ट्रॉफी सामन्यात जशी गोलंदाजी करतो तशीच गोलंदाजी येथे केली. अश्विन, मी आणि अमित मिश्रा एकमेकांना मदत करीत असतो. मला प्रत्येक लढतीत स्वत:ला सिद्ध करायचे आहे.’संघाबाहेर असताना काही काळ निराश झालो होतो. याबाबत बोलताना जडेजा म्हणाला,‘मी निराश झालो होतो. यातून सावरणे आवश्यक आहे, याची मला कल्पना आली. आता चांगल्या कामगिरीमुळे आगामी सामन्यांमध्ये चमकदार कामगिरीची आशा आहे. (वृत्तसंस्था)