शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

...हे तर मानसिक खच्चीकरण करण्यासारखेच

By admin | Updated: September 2, 2016 03:05 IST

रिओ आॅलिम्पिक स्पर्धेनंतर खेळाडंूंच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला जात असतानाच त्यांच्यावर झालेल्या खर्चाबाबत भली मोठी आकडेवारी क्रीडा मंत्रालयाने जाहीर केली.

नाशिक : रिओ आॅलिम्पिक स्पर्धेनंतर खेळाडंूंच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला जात असतानाच त्यांच्यावर झालेल्या खर्चाबाबत भली मोठी आकडेवारी क्रीडा मंत्रालयाने जाहीर केली. खेळाडूूंनी मागणी केलेला खर्चच पुढे केला जात असून, प्रत्यक्षात मंजूर खर्चाबाबत माहिती दडविली जात असल्यामुळे खेळाडूंविषयी पसरणारा गैरसमज आणि होणाऱ्या टीकेने त्यांचे मानसिक खच्चीकरण होत असून नाशिकची धावपटू कविता राऊतही याला अपवाद ठरलेली नाही. रिओ आॅलिम्पिकनंतर खेळाडूंची कामगिरी आणि त्यांच्यावर झालेल्या खर्चाबाबत सध्या चर्चा होत आहे. आॅलिम्पिक स्पर्धेच्या तयारीसाठी कवितावर सुमारे २६ लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे क्रीडा विभागाकडून सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मंजूर खर्च केवळ ३ लाख ३८ हजार ५०० इतकाच असल्याचा दावा कविताने पुराव्यानिशी केला आहे. कविताला आॅलिम्पिक खर्चासाठी ३० लाख रूपये खर्चाची मर्यादा देण्यात आली होती. त्यानुसार प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आले होते. कविताने २६ लाख ४१ हजार रूपयांचा प्रस्ताव सादर केला होता. या बजेटवर स्पोर्ट्स अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया आणि अ‍ॅथलेटिक्स फेडरेशन यांची चर्चा होऊन त्यांनी ३ लाख ३८ हजार ५०० रुपये इतकाच खर्च मंजूर केला. कविता ही साईच्या क्रीडा शिबिरात सराव करीत असून तेथील शासकीय सुविधांचा लाभ मिळत असल्यामुळे मागणी खर्चातून (२६ लाखांमधून) हा सर्व खर्च वजावट करून केवळ ३ लाख ३८ हजार रुपये मंजूर करण्यात आल्याचे पत्रच कविताला देण्यात आले होते. त्यामुळे कवितावर २६ लाखांचा खर्च झाल्याच्या चर्चेवर तिनेही आक्षेप घेत मनस्ताप व्यक्त केला. वास्तविक आॅलिम्पिकसाठी आपण २०१४ पासून तयारीला लागलो असून त्यासाठी आपणाला आतापर्र्यंत २० ते २१ लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक खर्च आला आहे. परंतु स्पर्धेहून परत आल्यानंतर आपली कामगिरी आणि आपणावरील खर्चाबाबत उलटसुलट चर्चेने मानसिक त्रास होत असल्याचेही कविताने म्हटले आहे. भर उन्हात ४२ किलोमीटरच्या स्पर्धेत धावण्याचे आव्हान काय असते ते आपण अनुभवले असताना केवळ भारतात राहून टीका करणाऱ्यांमुळे सरावावर परिणाम होत असल्याची खंतही तिने व्यक्त केली. सहन करण्यापलीकडचेआपणावर झालेला खर्च हा चुकीचा दाखविण्यात येत आहे. आॅलिम्पिकसाठी २६ लाखांचा खर्च केलेला नाही. तो केवळ एक प्रस्ताव दिला होता. तोही पूर्णपणे मंजूर झालेला नाही. मंजूर खर्च केवळ ३ लाख ३८ हजार ५०० इतकाच आहे. वास्तविक आपण स्वत: केलेला वैयक्तिक खर्चच यापेक्षा अधिक आहे. महाराष्ट्राच्या इतर अ‍ॅथलेटिक्सच्या खर्चाबाबत कुणी बोलत नाही. माझ्याच खर्चाबाबत चर्चा का व्हावी? हे सर्व सहन करण्यापलीकडचे आहे. ज्या गोष्टी प्रत्यक्षात नाहीत त्याविषयी अधिक चर्चा केली जाते. यामुळे खेळाडू व खेळावरही परिणाम होतो. आपणाला कोणत्याही वादात पडायचे नाही. खेळावर लक्ष केंद्रित करायचे आहे. टीकाकारांनी वस्तुस्थिती लक्षात घेऊन बोलावे इतकेच.- कविता राऊत, धावपटूभारतीय प्रशिक्षकांच्या पात्रतेविषयी बोलणाऱ्यांना भारतीय प्रशिक्षकांनीच उत्तर दिले आहे. भारतीय प्रशिक्षक आणि खेळाडू यांना बदनाम करण्याचे षडयंत्र थांबवावे- विजेंद्रसिंग, प्रशिक्षकप्रशिक्षकांनी पात्रता सिद्ध केलीरिओ आॅलिम्पिकमध्ये साक्षी मलिक, पी. व्ही. सिंधू या दोघींनी पदके मिळविली त्यांचे प्रशिक्षक हे भारतीयच होते. चौथ्या स्थानावर राहिलेल्या दीपा कर्माकरलादेखील भारतीय प्रशिक्षकाचेच मार्गदर्शन लाभले. त्यामुळे भारतीय प्रशिक्षकांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहेच. असे असताना परदेशी प्रशिक्षकांवर कोट्यवधींचा खर्च का केला जातो, असा सवाल आता उपस्थित केला जाऊ लागला आहे. परदेशी प्रशिक्षकांनी केलेल्या कामगिरीचे मूल्यमापन व्हावे, असा मतप्रवाहही यानिमित्ताने समोर आला आहे. कविता राऊतचे असेही म्हणणे़़़रिओ आॅलिम्पिकमध्ये प्रतिकूल परिस्थितीतही सर्व अडचणींवर मात करीत धावत राहिले. टीकाकारांनीही आपल्या कामगिरीविषयी टीका केली असली तरी स्पर्धा पूर्ण करणे हे आपले ध्येय होते.महाराष्ट्राच्या धावपटूने स्पर्धा अर्धवट सोडल्याचा डाग लागू नये आणि त्यामुळे उदयोन्मुख धावपटूंचे खच्चीकरण होऊ नये, माझ्याकडे बघून या खेळाकडे येणाऱ्या धावपटूंसाठी आपण स्पर्धा पूर्ण केली. या स्पर्धेविषयी आपण कोणतीही आणि कुणाबाबतही तक्रार केलेली नाही, मात्र ज्या पातळीवर टीका होत आहे ती पाहून मानसिक खच्चीकरण होत आहे. खेळामध्ये चढ-उतार होतच असतात.