शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

मोक्याच्या क्षणी नांगी टाकणे महागडे ठरले!

By admin | Updated: December 3, 2015 03:23 IST

जीवनात मनाविरुद्ध घडण्याचे अनेक प्रसंग येतात. अशावेळी आम्ही काही वेगळे करीत आहोत का, असा प्रश्न स्वत:ला विचारावाच लागतो. माझ्यासाठी आणि द. आफ्रिकेसाठी सध्याची

- एबी डिव्हिलियर्स लिहितो...

जीवनात मनाविरुद्ध घडण्याचे अनेक प्रसंग येतात. अशावेळी आम्ही काही वेगळे करीत आहोत का, असा प्रश्न स्वत:ला विचारावाच लागतो. माझ्यासाठी आणि द. आफ्रिकेसाठी सध्याची स्थिती अशीच आहे. मोहाली आणि नागपूरमध्ये पराभव झाल्याने मालिकेत आम्ही ०-२ ने माघारलो. याबद्दल घोर निराशा झाली. टी-२० आणि वन डे मालिका खिशात घातल्यानंतर कसोटीतही बाजी मारू अशीच अपेक्षा होती. पण असे घडू न शकल्याने आमच्या आशेवर पाणी फेरले गेले.खेळपट्टीला दोष देण्यात अर्थ नाही. टर्निंग विकेट बनविणे मुद्दा नाही. खेळपट्टी उभय संघांसाठी एकसारखीच होती. यावर काही बोलणार नाही. दोष आमचाच आहे. विराट आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली. ते विजयाचे हकदार आहेत. आमच्याबाबतीत बोलायचे झाल्यास संघाला मोहाली आणि नागपुरात खेळावर नियंत्रण ठेवण्याची संधी होती. पण मोक्याच्या क्षणी नांगी टाकल्याने संधी घालवली. सत्य असे की नागपूरची खेळपट्टी फलंदनाजांसाठी आव्हान होती. दोन्ही संघातील फलंदाजांपैकी सर्वोच्च खेळी येथे ४० धावांची ठरली. माझ्या मतांना हा दुजोरा ठरावा. परिस्थितीशी ताळमेळ साधण्यात भारतीय संघाला यश आले व त्यांनी विजय मिळविला.दिल्लीचा सामना आम्हाला निराशेतून बाहेर पडण्यास आणि खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मोक्याचा ठरू शकतो. भारतात कसोटी जिंकू शकतो तसेच घालविलेली पत परत मिळविण्यासाठी दिल्लीचा विजय दिलासा देणारा असेल. यानंतर मायदेशात इंग्लंडविरुद्ध मालिका खेळायची असल्याने भारतावरील विजय आत्मविश्वास कायम करणारा ठरावा. आम्हाला सुधारण्यास वाव आहे आणि आम्ही खेळात सुधारणा करणार हे निश्चित.(टीसीएम)