शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

भारतीयांच्या कामगिरीविषयी भाकीत करणे कठीण - अंजली भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2016 20:23 IST

लंडन आॅलिम्पिकनंतर खेळातील नियम पुर्णपणे बदलले आहेत. त्यामुळेच रिओ आॅलिम्पिकमधील भारतीय नेमबाजांच्या कामगिरीविषयी भाकीत करणे अत्यंत कठीण ठरेल

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २९ : लंडन आॅलिम्पिकनंतर खेळातील नियम पुर्णपणे बदलले आहेत. त्यामुळेच रिओ आॅलिम्पिकमधील भारतीय नेमबाजांच्या कामगिरीविषयी भाकीत करणे अत्यंत कठीण ठरेल, असे भारताची माजी आॅलिम्पियन नेमबाज अंजली भागवतने सांगितले.

५ आॅगस्ट पासून सुरु होणाऱ्या आॅलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजांबद्दल अंजलीने सांगितले की, स्पर्धेतील पदकाच्या अपेक्षाविषयी बोलणे कठीण आहे. लंडन आॅलिम्पिकनंतर सगळेच नियम बदलले आहेत आणि आता पात्रता फेरीचे गुण अंतिम फेरीतील गुणांसह जोडले जात नाही. निशानेबाजाला अंतिम फेरीत पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागते. अंतिम फेरीतील गुणावरुनंच पदक निश्चित होणार असल्याने अंतिम फेरीत सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्यावर खेळाडूंना लक्ष केंद्रीत करावे लागेल. त्यामुळेच अंतिम फेरीत पोहचल्यानंतर खेळाडूंना पात्रता फेरीतील कामगिरी पुर्णपणे विसरुन नव्याने सुरुवात करावी लागेल.

त्याचप्रमाणे, पदकासाठी नेमबाजांकडून सर्वाधिक अपेक्षा करण्यात येत आहे. त्यामुळेच यावरुन स्पष्ट होते की, नेमबाजीने आॅलिम्पिकमध्ये नवी उंची गाठली आहे. आपले नेमबाज चांगल्या तयारीने रिओमध्ये जात आहेत. त्यांची मजबूत तयारी झाली असून प्रत्येक नेमाबजाकडे अत्याधुनिक साहित्य आहेत. गेल्या दोन वर्षांत त्यांनी जे काही मिळवले आहे त्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे, असेही अंजलीने यावेळी सांगितले.

पदक मिळवण्यासाठी अंजलीने पिस्तूल नेमबाज जीतू रायला अधिक पसंती देताना सांगितले की, जीतू जेव्हा खेळतो तेव्हा त्याच्यावर कोणताच दबाव नसतो. जागतिक अजिंक्यपद आणि विश्वचषक स्पर्धेत पदक जिंकून हे त्याने सिध्द केले आहे. माझ्यामते सेनादलाचा असल्याने त्याच्यामध्ये शिस्त अधिक आहे आणि दबाव झेलण्याची क्षमताही अधिक आहे.अभिनव बिंद्राची गोष्टच निराळी आहे. त्याने आपल्या अखेरच्या आशियाई स्पर्धेत कोरिया आणि जपानच्या जागतिक दर्जाच्या नेमबाजांना मागे टाकून सुवर्ण जिंकले. रिओ स्पर्धा बिंद्राची अखेरची आॅलिम्पिक असल्याने माझ्यामते आशियाई स्पर्धेसारखेच यश तो यावेळी मिळवेल.