शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

भारत-पाक महिला क्रिकेट मालिका रद्द?

By admin | Updated: October 18, 2016 04:30 IST

भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उभय देशांच्या महिला क्रिकेट संघांदरम्यान आयोजित क्रिकेट मालिका रद्द होण्याच्या स्थितीत आहे.

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उभय देशांच्या महिला क्रिकेट संघांदरम्यान आयोजित क्रिकेट मालिका रद्द होण्याच्या स्थितीत आहे. आॅक्टोबरअखेरीस ही मालिका खेळली जाणार होती. या मालिकेच्या आयोजनावर आयसीसी महिला चॅम्पियनच्या गुणांचा निर्णय अवलंबून आहे. बीसीसीआयने पीसीबीला अद्यापही मालिका खेळण्याचे किंवा रद्द करण्याचे संकेत दिलेले नाहीत. मालिका रद्द झाल्यास गुणविभागणीचा निर्णय चॅम्पियनशिपची तांत्रिक समिती घेईल, असे ‘क्रिकइन्फो’च्या वृत्तात म्हटले आहे.आयसीसीच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार पाकच्या यजमानपदाखाली होणाऱ्या या मालिकेत सहभागी होण्यास भारताने नकार दिल्यास गुण मिळणार नाहीत. मालिकेत उभय संघांत तीन वन डे खेळले जाणार आहेत. पीसीबी या सामन्यांचे आयोजन संयुक्त अरब अमिरातीमध्ये करण्यास इच्छुक आहे. आयसीसी महिला चॅम्पियनशिपनंतर आघाडीच्या चार स्थानांवर राहणाऱ्या संघांचा प्रवेश २०१७ मध्ये इंग्लंडमध्ये आयोजित विश्वचषकात निश्चित मानला जाईल. नंतरच्या चार स्थानांवर राहणाऱ्या संघांना मात्र पात्रता फेरी खेळावी लागेल. भारत-पाकला या महिन्याअखेरपर्यंत मालिका खेळायची आहे. पण मालिका न झाल्यास तांत्रिक समितीकडे अहवाल सोपविला जाईल. बीसीसीआयने मेपासून आतापर्यंत मालिकेबाबत पीसीबीला स्पष्टीकरण दिलेले नाही. आमच्याकडे निर्णय घेण्याचा अधिकार नसून सरकारच्या परवानगीशिवाय काहीच करू शकत नसल्याचे बीसीसीआय अधिकाऱ्यांचे मत आहे. (वृत्तसंस्था)>लक्षवेधी...भारतीय पुरुष संघाने पाकविरुद्ध २०१२-१३ पासून द्विपक्षीय मालिका खेळलेली नाही. तथापि पाकने भारताच्या यजमानपदाखाली झालेल्या आयसीसी टी-२० विश्वचषकात आणि वन-डे विश्वचषकासह चॅम्पियन्स ट्रॉफी व आशिया चषक क्रिकेटमध्ये भाग घेतला होता. भारत-पाक यांच्यात मे २०१४ मध्ये एक करार झाला. याअंतर्गत उभय देश २०१५ ते २०२३ या कालावधीत सहा मालिका खेळतील, असे ठरले होते. गतवर्षी डिसेंबरमध्ये पाकच्या यजमानपदाखालीभारताविरुद्ध मालिकेचे आयोजन व्हायचे होते. यावर अनेक खलबते झाल्यानंतर भारताने ही मालिका रद्द केली होती.