शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाक महिला क्रिकेट मालिका रद्द?

By admin | Updated: October 18, 2016 04:30 IST

भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उभय देशांच्या महिला क्रिकेट संघांदरम्यान आयोजित क्रिकेट मालिका रद्द होण्याच्या स्थितीत आहे.

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उभय देशांच्या महिला क्रिकेट संघांदरम्यान आयोजित क्रिकेट मालिका रद्द होण्याच्या स्थितीत आहे. आॅक्टोबरअखेरीस ही मालिका खेळली जाणार होती. या मालिकेच्या आयोजनावर आयसीसी महिला चॅम्पियनच्या गुणांचा निर्णय अवलंबून आहे. बीसीसीआयने पीसीबीला अद्यापही मालिका खेळण्याचे किंवा रद्द करण्याचे संकेत दिलेले नाहीत. मालिका रद्द झाल्यास गुणविभागणीचा निर्णय चॅम्पियनशिपची तांत्रिक समिती घेईल, असे ‘क्रिकइन्फो’च्या वृत्तात म्हटले आहे.आयसीसीच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार पाकच्या यजमानपदाखाली होणाऱ्या या मालिकेत सहभागी होण्यास भारताने नकार दिल्यास गुण मिळणार नाहीत. मालिकेत उभय संघांत तीन वन डे खेळले जाणार आहेत. पीसीबी या सामन्यांचे आयोजन संयुक्त अरब अमिरातीमध्ये करण्यास इच्छुक आहे. आयसीसी महिला चॅम्पियनशिपनंतर आघाडीच्या चार स्थानांवर राहणाऱ्या संघांचा प्रवेश २०१७ मध्ये इंग्लंडमध्ये आयोजित विश्वचषकात निश्चित मानला जाईल. नंतरच्या चार स्थानांवर राहणाऱ्या संघांना मात्र पात्रता फेरी खेळावी लागेल. भारत-पाकला या महिन्याअखेरपर्यंत मालिका खेळायची आहे. पण मालिका न झाल्यास तांत्रिक समितीकडे अहवाल सोपविला जाईल. बीसीसीआयने मेपासून आतापर्यंत मालिकेबाबत पीसीबीला स्पष्टीकरण दिलेले नाही. आमच्याकडे निर्णय घेण्याचा अधिकार नसून सरकारच्या परवानगीशिवाय काहीच करू शकत नसल्याचे बीसीसीआय अधिकाऱ्यांचे मत आहे. (वृत्तसंस्था)>लक्षवेधी...भारतीय पुरुष संघाने पाकविरुद्ध २०१२-१३ पासून द्विपक्षीय मालिका खेळलेली नाही. तथापि पाकने भारताच्या यजमानपदाखाली झालेल्या आयसीसी टी-२० विश्वचषकात आणि वन-डे विश्वचषकासह चॅम्पियन्स ट्रॉफी व आशिया चषक क्रिकेटमध्ये भाग घेतला होता. भारत-पाक यांच्यात मे २०१४ मध्ये एक करार झाला. याअंतर्गत उभय देश २०१५ ते २०२३ या कालावधीत सहा मालिका खेळतील, असे ठरले होते. गतवर्षी डिसेंबरमध्ये पाकच्या यजमानपदाखालीभारताविरुद्ध मालिकेचे आयोजन व्हायचे होते. यावर अनेक खलबते झाल्यानंतर भारताने ही मालिका रद्द केली होती.