शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

भारत-पाक मालिका अधांतरीच

By admin | Updated: June 1, 2015 01:40 IST

‘बीसीसीआय’चे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्यासोबत कोलकाता येथे संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना पीसीबी प्रमुख शहरयार खान यांनी यंदा डिसेंबर महिन्यात युएईमध्ये

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान क्रिकेट मालिकेबाबत अद्याप कुठलाच निर्णय झालेला नाही, असे विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले. भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान पुन्हा द्विपक्षीय क्रिकेट मालिका प्रारंभ करण्यासाठी प्रयत्नशील असलेले पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख शहरयार खान यांच्या अलीकडेच झालेल्या भारत दौऱ्यावर टिप्पणी करताना सुषमा स्वराज यांनी हे वक्तव्य केले. ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्यासोबत कोलकाता येथे संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना पीसीबी प्रमुख शहरयार खान यांनी यंदा डिसेंबर महिन्यात युएईमध्ये तीन कसोटी, पाच वन-डे व दोन टी-२० सामन्यांच्या मालिकेचा प्रस्ताव ठेवला होता. ‘बीसीसीआय’ने मात्र या मालिकेबाबत व स्थळाबाबत अद्याप अधिकृत वक्तव्य केलेले नाही. पाकिस्तानसोबत भारताच्या द्विपक्षीय क्रिकेट मालिकेच्या आयोजनाबाबत विचारले असता स्वराज म्हणाऱ्या, ‘अद्याप याबाबत कुठलाच निर्णय झालेला नाही. भारत-पाक क्रिकेट मालिकेच्या आयोजनाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, हे वृत्त कुठून आले, याची कल्पना नाही. माझ्यासोबत अद्याप चर्चा झालेली नसून, निर्णय झालेला नाही.’२००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध द्विपक्षीय कसोटी मालिका खेळलेली नाही. या घटनेनंतर उभय देशांदरम्यानच्या द्विपक्षीय क्रिकेट संबंध संपुष्टात आले आहेत. उभय देशांदरम्यान २०१२ मध्ये तीन वन-डे व दोन टी-२० सामन्यांची मालिका भारतात खेळली गेली होती. या व्यतिरिक्त उभय देशांदरम्यान केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये लढती झालेल्या आहेत. २००९ मध्ये श्रीलंका क्रिकेट संघाच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर झिम्बाब्वेचा संघ सहा वर्षांपेक्षा अधिक कालावधीनंतर पाकिस्तानचा दौरा करणारा पहिला कसोटी संघ ठरला आहे. झिम्बाब्वे संघ सध्या दोन टी-२० व तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर आहे. (वृत्तसंस्था)