शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

भारत-पाक मालिका अधांतरीच

By admin | Updated: June 1, 2015 01:40 IST

‘बीसीसीआय’चे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्यासोबत कोलकाता येथे संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना पीसीबी प्रमुख शहरयार खान यांनी यंदा डिसेंबर महिन्यात युएईमध्ये

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान क्रिकेट मालिकेबाबत अद्याप कुठलाच निर्णय झालेला नाही, असे विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले. भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान पुन्हा द्विपक्षीय क्रिकेट मालिका प्रारंभ करण्यासाठी प्रयत्नशील असलेले पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख शहरयार खान यांच्या अलीकडेच झालेल्या भारत दौऱ्यावर टिप्पणी करताना सुषमा स्वराज यांनी हे वक्तव्य केले. ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्यासोबत कोलकाता येथे संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना पीसीबी प्रमुख शहरयार खान यांनी यंदा डिसेंबर महिन्यात युएईमध्ये तीन कसोटी, पाच वन-डे व दोन टी-२० सामन्यांच्या मालिकेचा प्रस्ताव ठेवला होता. ‘बीसीसीआय’ने मात्र या मालिकेबाबत व स्थळाबाबत अद्याप अधिकृत वक्तव्य केलेले नाही. पाकिस्तानसोबत भारताच्या द्विपक्षीय क्रिकेट मालिकेच्या आयोजनाबाबत विचारले असता स्वराज म्हणाऱ्या, ‘अद्याप याबाबत कुठलाच निर्णय झालेला नाही. भारत-पाक क्रिकेट मालिकेच्या आयोजनाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, हे वृत्त कुठून आले, याची कल्पना नाही. माझ्यासोबत अद्याप चर्चा झालेली नसून, निर्णय झालेला नाही.’२००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध द्विपक्षीय कसोटी मालिका खेळलेली नाही. या घटनेनंतर उभय देशांदरम्यानच्या द्विपक्षीय क्रिकेट संबंध संपुष्टात आले आहेत. उभय देशांदरम्यान २०१२ मध्ये तीन वन-डे व दोन टी-२० सामन्यांची मालिका भारतात खेळली गेली होती. या व्यतिरिक्त उभय देशांदरम्यान केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये लढती झालेल्या आहेत. २००९ मध्ये श्रीलंका क्रिकेट संघाच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर झिम्बाब्वेचा संघ सहा वर्षांपेक्षा अधिक कालावधीनंतर पाकिस्तानचा दौरा करणारा पहिला कसोटी संघ ठरला आहे. झिम्बाब्वे संघ सध्या दोन टी-२० व तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर आहे. (वृत्तसंस्था)