शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाक मालिका सरकारच्या निर्णयावर अवलंबून

By admin | Updated: December 8, 2015 23:48 IST

भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिका खेळविण्यात आलेल्या खेळपट्टीवर चौफेर टीका होत आहे; परंतु भारताचा माजी शैलीदार फलंदाज व्ही. व्ही. एस. लक्ष्मण याने मात्र

औरंगाबाद : भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिका खेळविण्यात आलेल्या खेळपट्टीवर चौफेर टीका होत आहे; परंतु भारताचा माजी शैलीदार फलंदाज व्ही. व्ही. एस. लक्ष्मण याने मात्र, ‘ही चर्चा निरर्थक आहे. खेळपट्टी खेळण्यायोग्य होती,’ असे मत व्यक्त केले.व्हेरॉक समूहातर्फे आयोजित आंतरशालेय व औद्योगिक क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनासाठी लक्ष्मण मंगळवारी औरंगाबादेत आला होता. आपल्या शैलीदार कलात्मक फलंदाजीने २००१मध्ये कोलकता येथे प्रतिकूल परिस्थितीत २८१ धावांची मॅरेथॉन खेळी करून स्टीव्ह वॉच्या नेतृत्वाखालील आॅस्ट्रेलियाविरुद्ध भारताला संस्मरणीय विजय मिळवून देणाऱ्या लक्ष्मणने दक्षिण आफ्रिका-भारत, वर्ल्डकप आणि अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा यांच्याविषयी आपली मते मनमोकळेपणाने मांडली.दक्षिण आफ्रिकेसारख्या नंबर वन देशाला धूळ चारणाऱ्या भारताच्या दिल्लीतील कसोटी विजयाबद्दल छेडले असता, लक्ष्मण म्हणतो... या कसोटीचे श्रेय आपण दक्षिण आफ्रिका आणि भारतीय गोलंदाजांना देऊ. दक्षिण आफ्रिकेने दिल्ली कसोटीआधी पूर्ण मालिकेतच फायटिंग स्पिरीट दाखविले नाही; परंतु त्यांनी दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या दिवशी दाखविलेली झुंजार वृत्ती प्रशंसनीय आहे. अ‍ॅबी डिव्हिलियर्ससारख्या स्फोटक फलंदाजानेही तब्बल ३५४ चेंडू खेळताना किल्ला लढवताना ४३ धावा केल्या. दुसरे श्रेय भारतीय गोलंदाजांना आहे. कर्णधार विराट कोहलीने चांगली कॅप्टनशिप केली. आफ्रिकेचे फलंदाज भागीदारी करीत असतानाही त्याने हार मानली नाही आणि गोलंदाजांनीही त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी यशस्वीपणे पेलली. तथापि, लक्ष्मणने दक्षिण आफ्रिकेच्या गेमप्लॅनविषयी नाराजीही व्यक्त केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जरी यश मिळविले, तरी भारतीय संघ परदेशातील उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर यशस्वी ठरेल का, असे छेडले असता लक्ष्मण म्हणाला, ‘‘आॅस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका येथील खेळपट्ट्यांवर अजिंक्य रहाणे, विराट कोहली आणि मुरली विजय यांनी स्कोअर केला आहे. तथापि, तेथील खेळपट्ट्यांवरील यश चिंतेची बाब आहे. त्यासाठी महत्त्वपूर्ण खेळी करणे योग्य असते. अशा प्रकारची खेळी अजिंक्य रहाणे याने दिल्ली कसोटीत करून दाखविली. त्याने प्रतिकिूल स्थितीतही परिस्थितीशी जुळवून घेताना दोन्ही डावांत बहारदार खेळी करून परिपक्वता दाखविली. या मालिकेमुळे भारताला मॅचविनिंग गोलंदाज आणि फलंदाज मिळाले; त्यामुळे भारत रँकिंगमध्ये कसोटीत नक्कीच नंबर वन बनेल.’’दक्षिण आफ्रिका व भारत यांच्यातील मालिकेत खेळपट्टीवर टीका होत आहे. याविषयी लक्ष्मणने सांगितले, ‘‘या मालिकेत सामने खेळवण्यात येणाऱ्या खेळपट्ट्या या फिरकी गोलंदाजांसाठी पोषक होत्या. नागपूर येथील खेळपट्टीही खेळण्यालायक नव्हती, असे म्हणता येणार नाही. येथील खेळपट्टीवर माती थोडी सैल होती आणि ती आवश्यक अशी रोल केलेली नव्हती. तथापि, या खेळपट्टीवर धावा निघाल्या नसल्या, तरी भारताकडून मुरली विजय व साहा यांनी चांगली फलंदाजी केली आणि दक्षिण आफ्रिकेकडूनही हाशीम आमला आणि फाफ ड्यू प्लेसीस यांनी चांगली फलंदाजी केली. आमलाने १६७ आणि फाफ ड्यू प्लेसिसने १५२ चेंडूंचा सामना केला. त्यामुळे ही खेळपट्टी धोकादायक होती, असे म्हणता येणार नाही. खेळपट्टी टफ होती. खेळपट्टीशी जुळवून फलंदाजी करणे महत्त्वाचे होते. रोहित शर्मा वनडेत प्रभावी ठरत असताना कसोटीत मात्र तो तितका यशस्वी ठरला नाही. याविषयी लक्ष्मण म्हणतो.. वनडेत दोन द्विशतके झळकावणाऱ्या रोहितमध्ये ठासून गुणवत्ता भरलेली आहे. त्याने वनडेत स्वत:ला सिद्ध केले आहे. नागपूर कसोटीत तो चांगल्या चेंडूवर बाद झाला; परंतु दिल्ली कसोटीतील पहिल्या डावात तो खराब पद्धतीने बाद झाला. रोहितने शॉट सिलेक्शनमध्ये सुधारणा करायला हवी. माझ्या मते, तो भारताचा मॅचविनर फलंदाज आहे आणि नक्कीच तो वनडेप्रमाणेच कसोटीतही स्वत:ला सिद्ध करील, असा विश्वास वाटतो.’’(क्रीडा प्रतिनिधी)