शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाक सामना २-२ ने ड्रॉ

By admin | Updated: June 27, 2015 00:58 IST

रमणदीपसिंग याने नोंदविलेल्या दोन गोलमुळे फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय संघाने वर्ल्ड हॉकी लीगच्या उपांत्यफेरीतील स्पर्धेत शुक्रवारी

एंटवर्प : रमणदीपसिंग याने नोंदविलेल्या दोन गोलमुळे फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय संघाने वर्ल्ड हॉकी लीगच्या उपांत्यफेरीतील स्पर्धेत शुक्रवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला २-२ असे बरोबरीत रोखले. भारताला आज विजयाची हॅट्ट्रिक साधण्याची संधी होती; पण विजयाची कोंडी न फुटल्यामुळे ड्रॉ वर समाधान मानावे लागले.रमणदीपने वारंवार हल्ले करीत आक्रमक खेळाच्या बळावर १३व्या तसेच ३९व्या मिनिटाला दोन गोल केले. पाककडूनदेखील दोन्ही गोल इम्रानने २३व्या तसेच ३७व्या मिनिटाला नोंदविले. भारताने दुसऱ्या क्वार्टरमधील शिथिलतेचा अपवद वगळता अन्य तिन्ही क्वार्टरमध्ये सुरेख खेळ केला. पण अखेरच्या क्षणी केलेल्या चुका भोवल्यामुळे संघाला केवळ एका गुणावर समाधान मानावे लागले. रियो आॅलिम्पिकसाठी आधीच पात्र ठरलेल्या भारताने ‘अ’ गटात मात्र अव्वल स्थान कायम राखले आहे. भारताचे तीन सामन्यांतून सात गुण झाले आहेत तर पाकचे तीन सामन्यानंतर चार गुण असल्याने हा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. भारताचा पुढील सामना २८ जून रोजी विश्वविजेत्या आॅस्ट्रेलियाविरुद्ध होईल.आजच्या लढतीत भारतीय संघाने सुरुवातीपासूनच चढाईचे धोरण अवलंबून संतुलित खेळ केला. दोन्ही संघांनी एकमेकांवर वर्चस्व मिळविण्याचा प्रयत्न करून पाहिला. दरम्यान युवराज वाल्मीकी जखमी झाला. याच वेळेत पाकच्या खेळाडूंनी प्रतिहल्ले सुरू केले. तथापि, भारताच्या बचाव फळीने त्यांचा प्रत्येक हल्ला उत्कृष्ट संतुलनाद्वारे थोपवून धरला. रमणदीपच्या शानदार प्रयत्नांच्या बळावर भारताला १३व्या मिनिटाला खाते उघडण्यात यश आले. गुरमेलने डाव्या फळीमधून जलद पास देताच रमणदीपने शिताफीने स्टिक लावून चेंडू गोलजाळीत ढकलला. पाकला दुसऱ्या क्वार्टरमध्ये पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्यावर भारताने चांगला बचाव केला; पण रेफ्रीने पाकिस्तानला पेनल्टी स्ट्रोक बहाल केला. भारतीय संघाने यावर विरोध दर्शविताना रेफरलची मागणी केली; पण त्याचाही निर्णय पाकच्या बाजूने गेला. इम्रानने पेनल्टी स्ट्रोकवर श्रीजेशच्या डाव्या बगलेतून गोल नोंदवून पाकला १-१ अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाले; पण सतबीरसिंग व रमणदीप यांना गोलजाळ्याचा वेध घेता आला नाही. मध्यंतराला उभय संघांदरम्यान १-१ बरोबरी होती. तिसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला भारताला १० खेळाडूंसह खेळावे लागले. सतबीरला यलो कार्ड दाखविण्यात आले होते. पाकने त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला; पण भारतीय बचाव फळीने जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यानंतर पाकला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्यावर इम्रानने गोल नोंदवून पाकला २-१ अशी आघाडी मिळवून दिली; पण भारताने त्यांना हा आनंद फार वेळ उपभोगू दिला नाही. दविंदर वाल्मीकीच्या चमकदार पासवर रमणदीपने मैदानी गोल नोंदवून दोन मिनिटांच्या अंतरात भारताला बरोबरी साधून दिली. त्यानतंर वाल्मीकीला यलो कार्ड दाखविण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा भारताला १० खेळाडूंसह खेळावे लागले. भारतीय संघाने आक्रमक खेळ कायम ठेवत पाकच्या बचाव फळीला व्यस्त ठेवले. भारताला पेनल्टी कॉर्नरही मिळाला होता; पण त्यावर गोल नोंदविता आला नाही. दरम्यान, भारताला दोनदा आघाडी घेण्याची संधी होती; पण पाकच्या गोलकीपरने उत्कृष्ट बचाव करून भारताचे गोल करण्याचे प्रयत्न हाणून पाडले. युवराज वाल्मीकीला ५३व्या मिनिटाला गोल नोंदवण्याची नामी संधी होती; पण त्यात तो अपयशी ठरला. (वृत्तसंस्था)