शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा पाकवर विराट' विजय

By admin | Updated: February 15, 2015 17:14 IST

वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सलामीच्या लढतीत भारताने पाकचा ७६ धावांनी पराभव केला.

ऑनलाइन लोकमत 

अॅडिलेड, दि. १५ - वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सलामीच्या लढतीत भारताने पाकचा ७६ धावांनी पराभव केला. भारताच्या ३०० धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानचा डाव अवघ्या २२४ धावांवरच आटोपला. 

वर्ल्डकपमध्ये भारताची सलामीची लढत कट्टर प्रतिस्पर्धी समजल्या जाणा-या पाकिस्तानसोबत सुरु आहे. भारताच्या ३०० धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकला भारताने सुरुवातीलाच धक्का दिला. सलामीवीर युनूस खान सहा धावांवर बाद झाला. मोहम्मद शमीच्या बाऊन्सरवर युनूस बाद झाला. यानंतर अहमद शहजाद आणि हॅरिस सोहेल या जोडीने पाकचा पुढे नेला. मात्र आर. अश्विनच्या फिरकीने हॅरिस सोहेलची विकेट घेतली. यानंतर उमेश यादवच्या भेदक मा-याने सोहेब मकसूद व शहजादची विकेट घेत पाकची अवस्था ४ बाद १०२ अशी झाली.  यानंतर कर्णधार मिसबाह उल हकचा अपवाद वगळता एकही फलंदाज फार काळ खेळपट्टीवर टिकला नाही. शाहिद आफ्रिदी २२, उमर अकमल ०, वहाब रियाज ४, यासिर शहा १३ धावांवर बाद झाला.  शेवटी २२४ धावांवर पाकचा डाव आटोपला. मिसबाहने ७६ धावांची खेळी केली. भारतातर्फे मोहम्मद शमीने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. उमेश यादव, मोहित शर्माने प्रत्येकी दोन आणि  आर. अश्विन, रविंद्र जडेजा या फिरकी गोलंदाजांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

दरम्यान, नाणेफेक जिंकून कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवन आणि रोहित शर्मा ही जोडी सलामीला आली. भारताच्या २४ धावा झाल्या असताना भारताची सलामीची जोडी फोडण्यात पाकच्या गोलंदाजांना यश आले. रोहित शर्मा १५ धावांवर बाद झाला. यानंतर फलंदाजीला आलेल्या विराट कोहलीने संयमी खेळी करत भारताचा डाव पुढे नेला. धवन - कोहली जोडीने मोठे फटके मारण्याऐवजी एकेरी धावा करत भारताचा फलक हलता ठेवला. खेळपट्टीवर स्थिरावताच या दोघांनीही फटकेबाजीला सुरुवात केली. शिखर धवन ७३ धावांवर असताना चोरटी धाव घेण्याच्या नादात बाद झाला. धवन - कोहली जोडीने १२९ धावांची भागीदारी केली. यानंतर विराट कोहलीने रैनाच्या मदतीने भारताला दोनशेचा टप्पा गाठून दिला. कोहलीच्या शतकानंतर सुरेश रैनानेही अर्धशतक ठोकले.  कोहली १०८ आणि रैना ७२ धावांवर बाद झाला तेव्हा भारताची स्थिती ४७.३ षटकांत  ४ बाद २८४ अशी होती. त्यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजांचा अचूक मा-यासमोर भारतीय फलंदाजांनी शरणागती पत्कारली. कर्णधार महेंद्रसिंग धोनी १८, रविंद्र जडेजा ३ आणि अजिंक्य रहाणे भोपळा न फोडताच माघारी परतला. लागोपाठ तीन फलंदाज बाद झाल्याने भारताने ५० षटकांत सात गडी गमावत ३०० धावाच केल्या. शेवटच्या पाच षटकांत भारताने फक्त २७ धावा केल्या. पाकिस्तानतर्फे सोहेल खानने १० षटकांत ५५ धावा देऊन ५ विकेट घेतल्या. तर वहाब रियाजने एक विकेट घेतली.

भारतीय गोलंदाजांचा अचूक मारा, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि धोनीचे आक्रमक नेतृत्व या आधारे भारताने सहजरित्या पाकला नमवले. या विजयासह वर्ल्डकपमध्ये पाकविरोधात भारताची विजयी मालिका सुरुच आहे. आज वर्ल्डकपमध्ये भारत व पाकिस्तान सहाव्यांदा आमने सामने होते. या सहाही सामन्यांमध्ये भारतालाच विजय मिळाला आहे.