शहरं
Join us  
Trending Stories
1
नफ़रत नहीं, नौकरी चुनो! 'इंडिया'चे सरकार बनतंय; ३० लाख रिक्त सरकारी पदे भरणार : राहुल गांधी
2
"आमचे अणुबॉम्ब कायम सज्ज असतात"; रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची अमेरिकेला खुली धमकी
3
“उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले, मानसोपचार तज्ज्ञांची गरज”: देवेंद्र फडणवीस
4
शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स 1000 तर निफ्टी 350 अंकांनी घसरले, 7 लाख कोटी बुडाले
5
...मग काय अमित शाह येताहेत का इंडिया आघाडीत?, आम्ही त्यांना पंतप्रधान करतो : संजय राऊत
6
Amit Shah : Video - "तीन टप्प्यात भाजपाने किती जागा जिंकल्या?"; अमित शाह यांची 'भविष्यवाणी'
7
'प्रत्येक गोष्टीला कारण असतं', हास्यजत्रा सोडल्यानंतर गौरव मोरेने चाहत्यांच्या प्रश्नांना दिलं उत्तर
8
"डबल इंजिन सरकारने शेतकरी, मजुरांना डबल झटका दिला; भाजपा संविधानाशी खेळतेय"
9
“बोरिवलीपासून कोकण रेल्वेला जोडणारी वाहतूकसेवा लवकरच सुरु करणार”: पीयूष गोयल 
10
जलेबी बाबाचा तुरूंगात मृत्यू! मादक पदार्थ देऊन महिलांवर करायचा बलात्कार, अनेकांना फसवले
11
"हो, कपिल शर्मा शोची कॉपी केली", 'चला हवा येऊ द्या'बाबत निलेश साबळेचं स्पष्ट वक्तव्य
12
Success Story: Google चे सीईओ सुंदर पिचाईंची क्लासमेट, IIT च्या 'त्या' बॅचची एकमेव महिला; आता बनली 'या' कंपन्यांची बॉस
13
Tata Harrier आणि Safari वर 1.25 लाखांपर्यंत डिस्काउंट तर अनेक कारवर मोठ्या ऑफर्स
14
देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्राला 'उबाठा'चीही मान्यता; भाजपाचा हल्लाबोल 
15
भारतामध्ये ६५ वर्षांत हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली, अहवालावरून खळबळ, भाजपा-कांग्रेसचे आरोप प्रत्यारोप   
16
WhatsApp कॉल आता आणखी सोपे होणार! नवीन फीचर कॉल मॅनेजमेंटला सुपरफास्ट बनवणार
17
अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ! दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडी मोठं पाऊल उचलणार
18
अक्षय्य तृतीया: कर्माचे श्रेष्ठत्व सांगणारे, आद्य समाजसुधारक, संत महात्मा बसवेश्वरांची जयंती
19
IPL 2024: लखनौच्या फ्रँचायझीने पोलिसांचे १० कोटी रूपये थकवले; एका सामन्याची फी आहे...
20
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अमोल किर्तीकरांच्या प्रचारात?; Video व्हायरल

ऑस्ट्रेलियाला हरवून भारताने उभारली 'विजयाची गुढी'

By admin | Published: March 28, 2017 10:36 AM

अखेरच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला 8 विकेटने नमवून भारताने गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर विजयाची गुढी उभारली.

 ऑनलाइन लोकमत 

धरमशाला, दि. 28 - गोलंदाजांनी विजयाचा पाया रचल्यानंतर भारतीय फलंदाजांनी कोणतीही चूक न करता आज गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर 'विजयाची गुढी' उभारली. ऑस्ट्रेलियाचे 106 धावांचे लक्ष्य भारताने दोन विकेटच्या मोबदल्यात सहज पार करत सामन्यासह बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 ने जिंकली. अजिंक्य रहाणे नाबाद (38) आणि लोकेश राहुल नाबाद (51) या जोडीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 
 
लोकेश राहुलने पहिल्या डावाप्रमाणे दुस-या डावातही नाबाद अर्धशतकी खेळी केली. पूजारा बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या रहाणेने आत्मविश्वासाने आक्रमक फलंदाजी केली. त्याच्या 38 धावांच्या नाबाद खेळीत त्याने चार चौकार आणि दोन षटकार लगावले. कालच्या बिनबाद 19 वरुन मुरली विजय आणि लोकेश राहुल या सलामीवीरांनी डावपुढे सुरु केल्यानंतर भारताला 46 धावांवर पहिला धक्का बसला. 
 
मुरली विजय (8) धावांवर कमिन्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने वाडेकडे झेल दिला. त्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पूजाराला भोपळाही फोडू न देता मॅक्सवेलने धावबाद केले. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या रहाणेने आणखी पडझड होऊ न देता विजयावर शिक्कामोर्तब केले.
 
ऑस्ट्रेलियाचा दुसऱ्या डावांत १३७ धावांत खुर्दा उडवत विजयाचा पाया रचला. जाडेजाने ६३ धावांत ४, आश्विनने २९ धावांत ३ आणि उमेश यादवने २९ धावांत ३ गडी बाद करून दुसऱ्या डावांत ५३.५ षटकांत ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले. ग्लेन मॅक्सवेल (४५) आणि पीटर हँड्सकोंब (१८), मॅथ्यू वेड (२५) यांच्या संयमी खेळीनंतरही पाहुण्यांना फार काळ तग धरणे कठीण झाले होते. चहापानापर्यंत ९२ धावांत ५ गडी गमावणाऱ्या पाहुण्या संघाचे उर्वरित ५ फलंदाज तिसऱ्या सत्रात पाठोपाठ बाद झाले.
 
सामनावीर - रविंद्र जाडेजा 
मालिकावीर - रविंद्र जाडेजा