शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

भारताचा सांघिक विजय

By admin | Updated: July 18, 2015 00:34 IST

वनडे मालिकेत ३-० असा सफाया करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाने पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यातही विजयी घोडदौड कायम ठेवत झिम्बाब्वेवर ५४ धावांनी सहज

हरारे : वनडे मालिकेत ३-० असा सफाया करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाने पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यातही विजयी घोडदौड कायम ठेवत झिम्बाब्वेवर ५४ धावांनी सहज विजय मिळवित दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. कर्णधार अजिंक्य रहाणे, मुरली विजय, रॉबिन उथप्पा यांच्या सुरेख फलंदाजीनंतर अक्षर पटेल व हरभजनसिंग यांच्या फिरकीने संघाचा विजय साकार झाला.भारताने विजयासाठी दिलेल्या १७९ धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ २0 षटकांत ७ बाद १२४ पर्यंतच मजल मारू शकला. त्यांच्यातर्फे हॅमिल्टन मसकदजाने २८ व चामू चिभाभा याने २३ धावा केल्या. भारतातर्फे अक्षर पटेलने १७ धावांत ३ गडी बाद केले. त्याला हरभजनसिंगने २, तर मोहित शर्माने १ गडी बाद करीत साथ दिली. प्रत्युत्तरात उतरणाऱ्या झिम्बाब्वेला चिभाभा आणि मसकदजा यांनी सलामीसाठी ८.१ षटकांत ५५ धावांची भागीदारी करीत झिम्बाब्वेला चांगली सुरुवात करून दिली. ही जोडी नवव्या षटकात हरभजनसिंगने चिभाभाला सीमारेषेवर मनीष पांडेच्या हाती झेल देण्यास भाग पाडत फोडली. पुढच्या षटकात अक्षर पटेलने झिम्बाब्वेच्या दोन फलंदाजांना पाचच चेंडूंच्या अंतरात बाद करीत त्यांना बॅकफूटवर ढकलले. पटेलने हॅमिल्टन मसकदजाला शॉर्ट फाईनलेगला केदार जाधवकरवी झेलबाद केले तर कर्णधार एल्टन चिगुंबुरा याचा त्रिफळाबाद केला. त्यानंतर हरभजनने झिम्बाब्वेला आणखी एक धक्का देताना ११ व्या षटकात चार्लस कोव्हेंट्री याला बाद केले. त्यामुळे झिम्बाब्वेची स्थिती ४ बाद ६८ अशी झाली आणि सरासरी प्रति षटक १४ धावांची झाली. त्यानंतर मात्र, भारताने झिम्बाब्वेला वरचढ होण्याची संधीच मिळू दिली नाही. त्याआधी रॉबिन उथप्पाच्या नाबाद ३९ धावांच्या बळावर भारताने ५ बाद १७८ धावा केल्या. वनडे मालिकेत विशेष ठसा उमटवू न शकणाऱ्या उथप्पाने धीरोदात्त खेळी करताना भारतीय संघाच्या धावसंख्येला आकार दिला. उथप्पाने मनीष पांडे (१९) याच्या साथीने तिसऱ्या गड्यासाठी ४५ धावांची भागीदारी केली. तत्पूर्वी, सलामीवीर अजिंक्य रहाणे (३३) आणि मुरली विजय (३४) यांनी भारताला चांगली सुरुवात करुन दिली. उथप्पाने ३५ चेंडूंच्या खेळीत २ चौकार मारले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतल्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे आणि मुरली विजय यांनी ७ षटकात ६४ धावांची भागीदारी करताना भारताला चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनी लिलया धावफलक हलता ठेवला; परंतु मुरली विजय धावबाद झाल्यामुळे ही भागीदारी मोडली.मोठी खेळी करण्याकडे वाटचाल करणारा विजय मिडविकेटवर सिकंदर रजा याच्या अचूक थ्रोमुळे धावबाद झाला. त्याने १९ चेंडूंच्या खेळीत ५ चौकार, एक षटकार मारला. रहाणेने एकेरी-दुहेरी धावा काढत धावफलक हलता ठेवला. तो १० व्या षटकात लेगस्पिनर ग्रॅमी क्रेमरच्या चेंडूवर बाद झाला. रहाणे पाँइंटवर उभा असलेला क्षेत्ररक्षक मसाकदजाकडे झेल देऊन बाद झाला. रहाणे बाद झाला तेव्हा भारताची स्थिती २ बाद ८२ अशी होती. (वृत्तसंस्था)धावफलक भारत : रहाणे झे. मसाकदजा गो. क्रेमर ३३, मुरली धावबाद ३४, उथप्पा नाबाद ३९, मनीष झे. रजा गो. पोफू १९, केदार झे. मसाकदजा गो. पोफू ९, बिन्नी झे. क्रेमर गो. पोफू ११, हरभजन नाबाद ८, एकूण : २० षटकात ५/१७८. गोलंदाजी : उत्सेया ४-०-३०-०, पोफू ४-०-३३-३, मुजाराबानी ३-०-३६-०, मेडविजा ४-०-४६-, क्रेमर ४-१-२०-१, रजा १-०-२-०.झिम्बाब्वे : मसकदजा झे. जाधव गो. पटेल २८, चिभाभा झे. पांडे गो. हरभजन २३, कोव्हेंट्री झे. रहाणे गो. हरभजन १०, चिगुम्भुरा त्रि. गो. पटेल १, रजा त्रि. गो. पटेल १०, इर्व्हिन धावबाद २, क्रेमर त्रि. गो. शर्मा ९, उत्सेया नाबाद १३,मेडविजा नाबाद १४, एकूण : २० षटकांत ७/१२४. गोलंदाजी : भुवनेश्वर ४-०-२२-०, संदीप ३-०-३४-०, मोहित ३-०-८-१, अक्षर ४-०-१७-३, हरभजन ४-०-२९-२, बिन्नी २-०-८-०.