शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतच बलवान संघ - कुमार संगकारा

By admin | Updated: May 30, 2017 14:45 IST

ले. भारताकडे संतुलित संघ असून वेगवान गोलंदाजीमुळे भारताच्या जेतेपदाची शक्यता अधिक आहे.

 ऑनलाइन लोकमत 

कोलंबो, दि. 30 - गतविजेता भारतच चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. भारताकडे जेतेपद कायम राखण्याची क्षमता आहे असे मत श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने व्यक्त केले. भारताकडे संतुलित संघ असून वेगवान गोलंदाजीमुळे भारताच्या जेतेपदाची शक्यता अधिक आहे असे संगकाराने सांगितले. यंदाच्यावर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आशियातून चार संघ सहभागी झाले असून, भारताचा संघ सर्वाधिक सशक्त आहे. 
 
2013 मध्ये भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. आताही भारतामध्ये विजेतेपद मिळवण्याची क्षमता आहे असे संगकाराने आयसीसीच्या वेबसाईटवर लिहीलेल्या स्तंभामध्ये म्हटले आहे. रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जाडेजा हे भारताचे फिरकी गोलंदाज एकदिवसीय क्रिकेटमध्ये उपयुक्त कामगिरी करत असून, कर्णधार विराट कोहली भले आयपीएलमध्ये अपयशी ठरला असेल पण इथे तो दमदार कामगिरी करेल असे संगकाराला विश्वास वाटतो. 
 
ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये उपांत्यफेरीचे सामने रंगतील असे भाकीत संगकाराने वर्तवले आहे. श्रीलंकेने 2002 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली होती तर, 2014 मध्ये टि-20 वर्ल्डकप जिंकला होता. संगकाराने दोनवर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून संगकाराने 28,016 धावा केल्या आहेत. 
 
काही काळापूर्वी एक ते दोन संघांचेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वर्चस्व होते. पण आता अनेक संघांनी आपल्यामध्ये प्रगती केली असून, चार ते पाच संघ समानपातळीचे आहेत असे संगकाराने म्हटले आहे. इंग्लंडच्या एकदिवसीय संघाने मागच्या दोनवर्षात चांगली प्रगती केली आहे. रणनिती आणि अन्य आघाडयांवर हा संघ इतरांपेक्षा पिछाडीवर असायचा पण आता त्यांनी चांगली प्रगती केली आहे. इंग्लंडसंघामध्ये गुणवान खेळाडू असून ते आक्रमक क्रिकेट खेळत आहेत असे संगकाराने सांगितले. 1 जून पासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार असून, भारताचा सलामीचा सामना 4 जूनला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. 
 
रोहित सलामीसाठी सज्ज
रोहित शर्मा सलामीवीर म्हणून पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सलामीच्या लढतीपूर्वी भारतीय संघ आज (मंगळवारी) बांगलादेशविरुद्ध अखेरचा सराव सामना खेळणार आहे. या लढतीच्यानिमित्ताने रोहितला सलामीवीर म्हणून सराव करण्याची चांगली संधी मिळणार आहे.