शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
3
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
4
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
5
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
6
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
7
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
8
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
9
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
10
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
11
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
12
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
13
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
14
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
15
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
16
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
17
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
18
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
19
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
20
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
Daily Top 2Weekly Top 5

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतच बलवान संघ - कुमार संगकारा

By admin | Updated: May 30, 2017 14:45 IST

ले. भारताकडे संतुलित संघ असून वेगवान गोलंदाजीमुळे भारताच्या जेतेपदाची शक्यता अधिक आहे.

 ऑनलाइन लोकमत 

कोलंबो, दि. 30 - गतविजेता भारतच चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. भारताकडे जेतेपद कायम राखण्याची क्षमता आहे असे मत श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने व्यक्त केले. भारताकडे संतुलित संघ असून वेगवान गोलंदाजीमुळे भारताच्या जेतेपदाची शक्यता अधिक आहे असे संगकाराने सांगितले. यंदाच्यावर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आशियातून चार संघ सहभागी झाले असून, भारताचा संघ सर्वाधिक सशक्त आहे. 
 
2013 मध्ये भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. आताही भारतामध्ये विजेतेपद मिळवण्याची क्षमता आहे असे संगकाराने आयसीसीच्या वेबसाईटवर लिहीलेल्या स्तंभामध्ये म्हटले आहे. रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जाडेजा हे भारताचे फिरकी गोलंदाज एकदिवसीय क्रिकेटमध्ये उपयुक्त कामगिरी करत असून, कर्णधार विराट कोहली भले आयपीएलमध्ये अपयशी ठरला असेल पण इथे तो दमदार कामगिरी करेल असे संगकाराला विश्वास वाटतो. 
 
ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये उपांत्यफेरीचे सामने रंगतील असे भाकीत संगकाराने वर्तवले आहे. श्रीलंकेने 2002 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली होती तर, 2014 मध्ये टि-20 वर्ल्डकप जिंकला होता. संगकाराने दोनवर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून संगकाराने 28,016 धावा केल्या आहेत. 
 
काही काळापूर्वी एक ते दोन संघांचेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वर्चस्व होते. पण आता अनेक संघांनी आपल्यामध्ये प्रगती केली असून, चार ते पाच संघ समानपातळीचे आहेत असे संगकाराने म्हटले आहे. इंग्लंडच्या एकदिवसीय संघाने मागच्या दोनवर्षात चांगली प्रगती केली आहे. रणनिती आणि अन्य आघाडयांवर हा संघ इतरांपेक्षा पिछाडीवर असायचा पण आता त्यांनी चांगली प्रगती केली आहे. इंग्लंडसंघामध्ये गुणवान खेळाडू असून ते आक्रमक क्रिकेट खेळत आहेत असे संगकाराने सांगितले. 1 जून पासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार असून, भारताचा सलामीचा सामना 4 जूनला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. 
 
रोहित सलामीसाठी सज्ज
रोहित शर्मा सलामीवीर म्हणून पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सलामीच्या लढतीपूर्वी भारतीय संघ आज (मंगळवारी) बांगलादेशविरुद्ध अखेरचा सराव सामना खेळणार आहे. या लढतीच्यानिमित्ताने रोहितला सलामीवीर म्हणून सराव करण्याची चांगली संधी मिळणार आहे.