शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

खेळपट्टी भारताची झोप उडवेल

By admin | Updated: March 23, 2017 00:28 IST

‘भारत - आॅस्टे्रलिया कसोटी मालिका आता रोमांचक स्थितीत आली असून धरमशाला येथे होणारा अंतिम सामना निर्णायक ठरेल.

नवी दिल्ली : ‘भारत - आॅस्टे्रलिया कसोटी मालिका आता रोमांचक स्थितीत आली असून धरमशाला येथे होणारा अंतिम सामना निर्णायक ठरेल. शिवाय येथील वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल असलेली परिस्थिती पाहता खेळपट्टीबाबत भारतीय संघामध्ये अस्वस्थता असेल,’ असे वक्तव्य आॅस्टे्रलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सन याने केले. एका वृत्त संकेतस्थळाशी बोलताना जॉन्सनने सांगितले, ‘‘धरमशालाचे मैदान शानदार आहे. मी हे मैदान एकदाच पाहिले असून त्या वेळी येथील खेळपट्टीवर गवत होते. त्यामुळे माझ्या मते आॅस्टे्रलियन खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला असेल आणि भारतीयांमध्ये काहीसा अस्वस्थपणा असेल.’’त्याचप्रमाणे, जॉन्सनच्या मते मालिकेतील अखेरच्या कसोटीसाठी आॅस्टे्रलियन संघात स्टीव्ह ओकीफेच्याऐवजी जॅक्सन बर्डला संधी मिळू शकते, असे मत व्यक्त केले. याबाबत तो म्हणाला, की ‘माझ्या मते आॅस्टे्रलियाने या सामन्यात एका फिरकीपटूसह खेळावे. फिरकी गोलंदाजांनी मालिकेत चमकदार कामगिरी केली. त्यांच्यावर येथे चांगल्या कामगिरीचा दबाव होता. मालिकेत दोन्ही फिरकी गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली असल्याने कोणाला संधी द्यावी, हे ठरवणे अवघड आहे. परंतु माझ्या मते अनुभवाला प्राधान्य द्यावे.’’बर्डला अंतिम सामन्यासाठी प्राधान्य देताना जॉन्सनने सांगितले, ‘‘अंतिम सामन्याची खेळपट्टी आॅस्टे्रलियाप्रमाणे असल्यास मला वाटते, की लिआॅनला अंतिम संघात घेऊन तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून बर्डला संधी द्यावी.’’ (वृत्तसंस्था)२७व्या कसोटी केंद्रासाठी धरमशाला सज्ज-धौलाधर पर्वतराजीत वसलेले समुद्र सपाटीपासून १३१७ मीटर उंचीवर निसर्गाच्या सान्निध्यात उभारण्यात आलेले धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेचे (पीएचसीए) स्टेडियम जगातील ११४वे आणि भारतात २७वे कसोटी केंद्र बनण्यास सज्ज झाले आहे.निसर्गरम्यस्थळी वसलेल्या या स्टेडियममध्ये शनिवारपासून भारत-आॅस्ट्रेलिया यांच्यात चौथा आणि मालिकेतील अखेरचा कसोटी सामना खेळला जाईल. याआधी तीन वन-डे तसेच आठ टी-२० सामन्यांचे आयोजन येथे झाले. भारताने तीनपैकी दोन वन-डे जिंकले तर एका सामन्यात पराभव पत्करला. भारताच्या वाट्याला येथे द.आफ्रिकेविरुद्ध एकमेव टी-२० सामना आला. त्यातही संघ पराभूत झाला होता. ऑस्ट्रेलियालादेखील येथे खेळण्याचा अनुभव आहे. मागच्या वर्षी न्यूझीलंड विरुद्ध विश्वचषक टी-२० चा सुपर-टेन सामना त्यांनी आठ धावांनी गमावला होता. त्या सामन्यात स्टीव्ह स्मिथ हाच आॅस्ट्रेलियाचा कर्णधार होता. बीसीसीआयने मागच्या वर्षी कसोटीचे आयोजन नव्या स्थळांवर करण्याचा निर्णय घेताच सहा महिन्यात इंदूर, राजकोट, विशाखापट्टणम, पुणे आणि रांचीपाठोपाठ धरमशाला देशातील सहावे नवे केंद्र बनले. याआधी २००८ मध्ये नागपूरचे जामठा आणि २०१० मध्ये हैदराबादच्या उप्पल स्टेडियमला कसोटी केंद्र म्हणून मान्यता देण्यात आली होती. भारतात ईडन गार्डनवर सर्वाधिक ४० तर लंडनच्या लॉर्डस्वर सर्वाधिक १३३ कसोटी सामन्यांचे आयोजन झाले.