शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

भारताची सन्मानजनक मजल

By admin | Updated: August 21, 2015 00:14 IST

युवा सलामीवीर लोकेश राहुलचे शतक आणि कर्णधार विराट कोहली व रोहित शर्मा यांनी झळकविलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्ध आजपासून खेळल्या

कोलंबो : युवा सलामीवीर लोकेश राहुलचे शतक आणि कर्णधार विराट कोहली व रोहित शर्मा यांनी झळकविलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्ध आजपासून खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दिवसअखेर पहिल्या डावात ६ बाद ३१९ धावांची सन्मानजनक मजल मारली. पहिल्या लढतीत पराभव स्वीकारणाऱ्या भारतीय संघाच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी या लढतीत चांगली कामगिरी केली. कुमार संगकाराच्या निरोपाच्या कसोटी सामन्यात भारताच्या डावात राहुल (१०८), कोहली (७८) आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणारा रोहित (७९) यांचे योगदान उल्लेखनीय ठरले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या भारताची एकवेळ २ बाद १२ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर राहुल व कर्णधार कोहली यांनी तिसऱ्या विकेटसाठी १६४ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. कोहलीने १०७ चेंडूंमध्ये ८ चौकार व १ षटकाराच्या साह््याने ७८ धावांची खेळी केली. त्याआधी, सकाळच्या सत्रात धम्मिका प्रसादने दोन बळी घेत श्रीलंकेला चांगली सुरुवात करून दिली. सलामीवीर मुरली विजय (०) आणि अजिंक्य रहाणे (४) यांना मोठी खेळी करता आली नाही. दुखापतीमुळे पहिल्या कसोटी सामन्याला मुकणाऱ्या विजयला पुनरागमनात चांगली कामगिरी करता आली नाही. रहाणे तिसऱ्या क्रमांकावर अपयशी ठरला. त्यानंतर दुष्मंता चामीराच्या पहिल्या षटकात राहुल सुदैवी ठरला. त्याचा उडालेला झेल गलीमध्ये तैनात जेहान मुबारकला टिपता आला नाही. दुसऱ्या टोकाकडून कोहली शानदार फलंदाजी करीत होता. उपाहारानंतर कोहली व राहुल यांनी शानदार फलंदाजी केली. विराटने ११ वे कसोटी अर्धशतक ६३ चेंडूंमध्ये पूर्ण केले. भारताने २८ व्या षटकात १०० धावांचा पल्ला ओलांडला. त्यानंतर राहुलनेही वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. कोहलीने चामिराच्या गोलंदाजीवर चौकार वसूल करून आक्रमक पवित्रा कायम राखला. विराट शतकी खेळी करणार, असे वाटत असताना रंगाना हेराथच्या गोलंदाजीवर अँजेलो मॅथ्यूजने शानदार झेल टिपून त्याला तंबूचा मार्ग दाखविला. कोहलीने १०७ चेंडूंमध्ये ८ चौकार व १ षटकार ठोकला. राहुलने १९० चेंडूंना सामोरे जाताना १३ चौकार व एका षटकाराच्या साह्याने शतक साकारले. रोहितने ७९ धावांची खेळी केली; पण दिवसाच्या अखेरच्या षटकांमध्ये त्याने विकेट गमावली. कामगिरीत सातत्य राखण्यासाठी संघर्ष करीत असलेल्या रोहितने संघ व्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरविण्याचा प्रयत्न केला. मला आणखी धावा काढायला पाहिजे होत्या : राहुलकोलंबो : लोकेश राहुलने शतकी खेळी करीत श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा डाव सावरला, पण संघाला अधिक मजबूत स्थिती गाठून देण्यासाठी आणखी धावा करायला पाहिजे होत्या, अशी प्रतिक्रिया या सलामीवीराने व्यक्त केली. २३ वर्षीय राहुलने कारकिर्दीतील दुसरे कसोटी शतक झळकावल्यामुळे समाधान व्यक्त केले, पण १०८पेक्षा अधिक धावा फटकावता न आल्यामुळे निराशा जाहीर केली. ‘‘मला पहिल्या कसोटी सामन्यात धावा फटकावता आल्या नव्हत्या. आज नैसर्गिक खेळ करता आल्यामुळे समाधान झाले. मला यापेक्षा सरस कामगिरी करण्याची संधी होती, पण त्यात अपयशी ठरल्यामुळे निराश झालो. दिवसाच्या तिसऱ्या सत्रात अधिक धावा फटकावण्याची संधी आहे. त्या वेळी खेळपट्टीवर राहून संघासाठी अधिक धावा वसूल करायला पाहिजे होत्या. मी सध्या शिकत असून, काही बाबींवर लक्ष केंद्रित केले आहे. भविष्यात अशी चूक होणार नाही, अशी आशा आहे.’’ धावफलकभारत पहिला डाव : मुरली विजय पायचित गो. प्रसाद ००, के. एल. राहुल झे. चांदीमल हो. चामीरा १०८, अजिंक्य रहाणे झे. करुणारत्ने गो. प्रसाद ०४, विराट कोहली झे. मॅथ्यूज गो. हेराथ ७८, रोहित शर्मा पायचित गो. मॅथ्यूज ७९, स्टुअर्ट बिन्नी झे. चामीरा गो. हेराथ १०, रिद्धिमान साहा नाबाद १९. अवांतर (२१). एकूण ८७.२ षटकांत ६ बाद ३१९. बाद क्रम : १-४, २-१२, ३-१७६, ४-२३१, ५-२६७, ६-३१९. गोलंदाजी : प्रसाद २०-५-७२-२, मॅथ्यूज १०.२-४-१७-१, चामीरा १३-०-५९-१, हेराथ २१-२-७३-२, कौशल २३-२-८२-०.(वृत्तसंस्था)