शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

भारताची सन्मानजनक मजल

By admin | Updated: August 21, 2015 00:14 IST

युवा सलामीवीर लोकेश राहुलचे शतक आणि कर्णधार विराट कोहली व रोहित शर्मा यांनी झळकविलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्ध आजपासून खेळल्या

कोलंबो : युवा सलामीवीर लोकेश राहुलचे शतक आणि कर्णधार विराट कोहली व रोहित शर्मा यांनी झळकविलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्ध आजपासून खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दिवसअखेर पहिल्या डावात ६ बाद ३१९ धावांची सन्मानजनक मजल मारली. पहिल्या लढतीत पराभव स्वीकारणाऱ्या भारतीय संघाच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी या लढतीत चांगली कामगिरी केली. कुमार संगकाराच्या निरोपाच्या कसोटी सामन्यात भारताच्या डावात राहुल (१०८), कोहली (७८) आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणारा रोहित (७९) यांचे योगदान उल्लेखनीय ठरले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या भारताची एकवेळ २ बाद १२ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर राहुल व कर्णधार कोहली यांनी तिसऱ्या विकेटसाठी १६४ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. कोहलीने १०७ चेंडूंमध्ये ८ चौकार व १ षटकाराच्या साह््याने ७८ धावांची खेळी केली. त्याआधी, सकाळच्या सत्रात धम्मिका प्रसादने दोन बळी घेत श्रीलंकेला चांगली सुरुवात करून दिली. सलामीवीर मुरली विजय (०) आणि अजिंक्य रहाणे (४) यांना मोठी खेळी करता आली नाही. दुखापतीमुळे पहिल्या कसोटी सामन्याला मुकणाऱ्या विजयला पुनरागमनात चांगली कामगिरी करता आली नाही. रहाणे तिसऱ्या क्रमांकावर अपयशी ठरला. त्यानंतर दुष्मंता चामीराच्या पहिल्या षटकात राहुल सुदैवी ठरला. त्याचा उडालेला झेल गलीमध्ये तैनात जेहान मुबारकला टिपता आला नाही. दुसऱ्या टोकाकडून कोहली शानदार फलंदाजी करीत होता. उपाहारानंतर कोहली व राहुल यांनी शानदार फलंदाजी केली. विराटने ११ वे कसोटी अर्धशतक ६३ चेंडूंमध्ये पूर्ण केले. भारताने २८ व्या षटकात १०० धावांचा पल्ला ओलांडला. त्यानंतर राहुलनेही वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. कोहलीने चामिराच्या गोलंदाजीवर चौकार वसूल करून आक्रमक पवित्रा कायम राखला. विराट शतकी खेळी करणार, असे वाटत असताना रंगाना हेराथच्या गोलंदाजीवर अँजेलो मॅथ्यूजने शानदार झेल टिपून त्याला तंबूचा मार्ग दाखविला. कोहलीने १०७ चेंडूंमध्ये ८ चौकार व १ षटकार ठोकला. राहुलने १९० चेंडूंना सामोरे जाताना १३ चौकार व एका षटकाराच्या साह्याने शतक साकारले. रोहितने ७९ धावांची खेळी केली; पण दिवसाच्या अखेरच्या षटकांमध्ये त्याने विकेट गमावली. कामगिरीत सातत्य राखण्यासाठी संघर्ष करीत असलेल्या रोहितने संघ व्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरविण्याचा प्रयत्न केला. मला आणखी धावा काढायला पाहिजे होत्या : राहुलकोलंबो : लोकेश राहुलने शतकी खेळी करीत श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा डाव सावरला, पण संघाला अधिक मजबूत स्थिती गाठून देण्यासाठी आणखी धावा करायला पाहिजे होत्या, अशी प्रतिक्रिया या सलामीवीराने व्यक्त केली. २३ वर्षीय राहुलने कारकिर्दीतील दुसरे कसोटी शतक झळकावल्यामुळे समाधान व्यक्त केले, पण १०८पेक्षा अधिक धावा फटकावता न आल्यामुळे निराशा जाहीर केली. ‘‘मला पहिल्या कसोटी सामन्यात धावा फटकावता आल्या नव्हत्या. आज नैसर्गिक खेळ करता आल्यामुळे समाधान झाले. मला यापेक्षा सरस कामगिरी करण्याची संधी होती, पण त्यात अपयशी ठरल्यामुळे निराश झालो. दिवसाच्या तिसऱ्या सत्रात अधिक धावा फटकावण्याची संधी आहे. त्या वेळी खेळपट्टीवर राहून संघासाठी अधिक धावा वसूल करायला पाहिजे होत्या. मी सध्या शिकत असून, काही बाबींवर लक्ष केंद्रित केले आहे. भविष्यात अशी चूक होणार नाही, अशी आशा आहे.’’ धावफलकभारत पहिला डाव : मुरली विजय पायचित गो. प्रसाद ००, के. एल. राहुल झे. चांदीमल हो. चामीरा १०८, अजिंक्य रहाणे झे. करुणारत्ने गो. प्रसाद ०४, विराट कोहली झे. मॅथ्यूज गो. हेराथ ७८, रोहित शर्मा पायचित गो. मॅथ्यूज ७९, स्टुअर्ट बिन्नी झे. चामीरा गो. हेराथ १०, रिद्धिमान साहा नाबाद १९. अवांतर (२१). एकूण ८७.२ षटकांत ६ बाद ३१९. बाद क्रम : १-४, २-१२, ३-१७६, ४-२३१, ५-२६७, ६-३१९. गोलंदाजी : प्रसाद २०-५-७२-२, मॅथ्यूज १०.२-४-१७-१, चामीरा १३-०-५९-१, हेराथ २१-२-७३-२, कौशल २३-२-८२-०.(वृत्तसंस्था)