शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
2
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
3
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
4
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
5
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
6
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
7
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
8
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
9
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
10
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
11
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
12
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
13
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
14
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
15
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
16
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
17
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
18
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
19
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
20
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य

भारताची प्रतिष्ठा पणाला

By admin | Updated: October 8, 2015 04:28 IST

योग्य संतुलन राखून तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० मध्ये गुरुवारी द. आफ्रिकेविरुद्ध टीम इंडिया विजय मिळविण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावणार आहे.

कोलकाता : योग्य संतुलन राखून तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० मध्ये गुरुवारी द. आफ्रिकेविरुद्ध टीम इंडिया विजय मिळविण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावणार आहे.कटकच्या दुसऱ्या सामन्यात सहा गड्यांनी विजय नोंदवित आफ्रिकेने मालिकेत २-० अशी आघाडी मिळविली. भारत या सामन्यात निचांकी ९२ धावांत गारद झाला. शिवाय, प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीमुळे सामना दोनदा थांबविण्यात आला होता. जून महिन्यात बांगलादेश दौऱ्यात भारताला अशाच प्रकारच्या विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागला होता. अखेरचे दोन सामने गमावताच भारताने यजमानांना मालिका १-२ ने गमावली होती. ईडनचा सामना औपचारिकतेचा असेलही; पण धोनी अँड कंपनीसाठी तो महत्त्वपूर्ण राहील. हा सामना जिंकून पाच सामन्यांच्या वन-डे मालिकेआधी भारताला विजयी पथावर यायचे आहे. यासाठी धोनीने मात्र आपल्या आवडीचे अंबाती रायडू आणि अक्षर पटेल यांच्याऐवजी अजिंक्य रहाणे व अमित मिश्रा यांना संधी देण्यास हरकत नाही. रहाणेऐवजी रायुडूला झुकते माप दिल्याप्रकरणी धोनीवर सडकून टीका झाली. त्यामुळे गुरुवारी रहाणे खेळण्याची शक्यता आहे.ईडनची खेळपट्टी फिरकीला अनुकूल असल्याने मिश्रालादेखील संधी मिळू शकते; पण पटेल आणि हरभजन यांच्या तुलनेत मिश्रा हा धोनीच्या पसंतीस कितपत उतरतो, हे पाहावे लागेल. आश्विनचा फॉर्म ही भारताच्या जमेची बाजू आहे. त्याने आफ्रिकेच्या फलंदाजांना त्रस्त केलेच; शिवाय डिव्हिलियर्सला दोनदा त्यानेच बाद केले. यामुळे आश्विनकडून मोठ्या अपेक्षा असतील. द. आफ्रिका संघात बदल होण्याची श्क्यता नाही. फाफ डु प्लेसिस हा इम्रान ताहीर वगळता डेव्हिड मिलर आणि जेपी ड्यूमिनी यांच्याकडून अतिरिक्त गोलंदाजी करण्याच्या मनस्थितीत आहे.(वृत्तसंस्था)भज्जीला विजयाची आशा : अखेरचा सामना ईडनवर खेळण्याची इच्छाभारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२0 क्रिकेट मालिका गमावली असली तरी अनुभवी हरभजनसिंगने अखेरच्या सामन्यात भारतीय संघ जिंकू शकतो, अशी आशा व्यक्त केली.हरभजन म्हणाला, ‘‘आम्ही मालिका गमावली आहे; परंतु अखेरचा सामना अजून बाकी आहे आणि उद्याचा सामना जिंकू आणि त्यानंतर हीच लय पुढेही कायम ठेवू अशी आशा वाटते. वनडे मालिका सुरू होणार आहे. त्यानंतर कसोटी सामनेही आहेत. आम्ही उद्या सर्वोत्तम कामगिरी करू आणि एकदा विजय मिळवल्यास आम्हाला पराभूत करणे कठीण असेल.ईडन गार्डन्सला आॅस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक कसोटी ही व्हीव्हीएस लक्ष्मणच्या २८१ धावांच्या खेळीमुळे ओळखली जाते; परंतु याच सामन्यात हरभजनसिंगने १३ गडीदेखील बाद केले होते. त्यामुळेचहरभजनसिंगने कारकिर्दीतील अखेरचा सामनाही येथेच खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भज्जी म्हणाला, की मी अद्याप काहीही विचार केला नाही; परंतु अखेरचा सामना ईडनवर खेळण्याची इच्छा आहे व तोही कसोटी सामना असायला हवा. ईडन हे विशेष स्थान आहे. येथे घरी येऊन खेळण्यासारखे आहे. लोकांच्या दृष्टीने इंग्लंडमध्ये क्रिकेटसाठी लॉर्ड्स आहे, तर भारतातही क्रिकेट खेळण्यासाठी सर्वांत चांगले स्थळ ईडन आहे. उभय संघ भारत : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, अक्षर पटेल, हरभजन सिंग, आर. आश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, स्टुअर्ट बिन्नी आणि एस अरविंद. दक्षिण आफ्रिका : फाफ डु प्लेसिस (कर्णधार), हाशिम अमला, एबी डिव्हिलियर्स, जेपी ड्यूमिनी, फरहान बेहार्डियेन, डेव्हिड मिलर, ख्रिस मॉरिस, कागिसो रबाडा, काइल एबोट, एल्बी मोर्केल, इम्रान ताहिर, क्विंटन डिकाक, एडी लेइ, मर्चेंट डि लांगे, कयारा झोंडो.