शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
2
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
3
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
4
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
5
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
6
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
7
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
8
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
9
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
10
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
11
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
12
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
13
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
14
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?
15
कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात?
16
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
17
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
18
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
19
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
20
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर

बांगलादेश विरोधात भारताचे पारडे जड

By admin | Updated: June 15, 2017 04:05 IST

भारत विरुद्ध बांगलादेश हा उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. तसे पाहिले तर या दोन्ही संघांची कोणतीही तुलना केली जाऊ शकत नाही. भारताचा फॉर्म गेल्या काही

- अयाझ मेमन

भारत विरुद्ध बांगलादेश हा उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. तसे पाहिले तर या दोन्ही संघांची कोणतीही तुलना केली जाऊ शकत नाही. भारताचा फॉर्म गेल्या काही काळापासून चांगला राहिला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताला श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र, त्या सामन्यातही भारताने तीनशेपेक्षा जास्त धावा केल्या होत्या आणि फलंदाजी, गोलंदाजी तसेच क्षेत्ररक्षण यात दोन्ही संघांमध्ये कोणतीही तुलना केली जाऊ शकत नाही. मात्र, क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे; उलटफेर होऊ शकतो. आपण पाहिले आहे की, पाकिस्तानला भारताकडून मोठा पराभव स्वीकारवा लागला होता. मात्र, तरीही पाकिस्तानने स्पर्धेत पुनरागमन केले आणि स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. या खेळात खूप अनिश्चितता आहे. तुम्ही एका दिवशी सर्वात बलवान असाल, मात्र त्याचवेळी दुसरा दिवस तुमच्यासाठी कठीण असतो. त्यामुळे भारताने बांगलादेशला कमकुवत समजू नये. खेळण्याआधीच आपण हा सामना जिंकला आहे, असेही भारताने समजू नये.भारताची रणनीती आणि संघ नेमका कसा असेल, याचा विचार करूया. भारताने दक्षिण आफ्रिकेविरोधात आर.अश्विनला संधी दिली होती. आफ्रिकेकडे तीन डावखुरे फलंदाज होते. त्यामुळे अश्विनला संधी मिळणे गरजेचेदेखील होते. मात्र, बांगलादेशचे खेळाडू दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंपेक्षा फिरकी गोलंदाजी चांगली खेळतात. तमीम इक्लाब, शाकीब अल हसन हे डावखुरे खेळाडू आहेत. त्यामुळे आॅफ स्पिनरला जागा मिळेल का? हा प्रश्न आहे. मात्र, संघ निवडीसाठी कुंबळे आणि कोहली हे काय योजना करतात, त्यावर अवलंबून आहे. कदाचित उमेश यादवला पुन्हा एकदा संधी मिळू शकते. संघात इतर कोणतेही बदल होतील, असे वाटत नाही. सर्वच फलंदाज फॉर्ममध्ये आहे. शिखर धवन सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. विराट कोहली, रोहित शर्मा यांनीदेखील चांगल्या धावा केल्या आहेत. गोलंदाजीही चांगली होत आहे. जसप्रीत बुमराह यानेदेखील गडी बाद केले. या मैदानावर ३००ची धावसंख्या बनू शकते. जर भारत प्रथम फलंदाजी करत असेल, तर तीनशेच्या आसपास धावसंख्या उभी केली पाहिजे. जर समोरचा संघ तीनशेच्यावर धावा करत असेल, तर तुम्ही अडचणीत आहात. बांगलादेश प्रथम फलंदाजी करत असेल, तर बांगलादेशला २७०च्या पुढे जाऊ देणे भारतासाठी धोक्याचे ठरेल. त्यांच्याकडेदेखील चांगले फलंदाज आहेत. बांगलादेशच्या संघाकडे गमावण्यासारखे काहीही नाही, त्यामुळे भारताने सावध राहिले पाहिजे.

(संपादकीय सल्लागार)