शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
2
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
3
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
4
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
5
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
6
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
7
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
9
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
10
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
12
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
13
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
14
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
15
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
16
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
17
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
18
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
19
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
20
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन

भारताचा ऐतिहासिक विजय

By admin | Updated: December 8, 2015 02:24 IST

रविचंद्रन अश्विनच्या नेतृत्वात भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करीत चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात पाचव्या व अखेरच्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा ३३७ धावांनी पराभव केला.

नवी दिल्ली : रविचंद्रन अश्विनच्या नेतृत्वात भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करीत चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात पाचव्या व अखेरच्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा ३३७ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३-० ने ऐतिहासिक विजय साकारला. विजयासाठी ४८१ धावांच्या अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाने बचावात्मक पवित्रा स्वीकारला, पण त्यांचा डाव १४३.१ षटकांत १४३ धावांत संपुष्टात आला. अखेरच्या पाच विकेट नाट्यमयरीत्या केवळ ७ धावांच्या अंतरात पडल्या. या विजयासह भारताने आयसीसी कसोटी क्रमावारीत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. अश्विनने मोर्नी मोर्कलचा त्रिफळा उडवत दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव गुंडाळला. या मालिकेतील भारताचा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज अश्विनने ४९.१ षटकांत ६१ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले. कर्णधार विराट कोहली व सामनावीर अजिंक्य रहाणे यांनी विजयाची आठवण म्हणून खेळपट्टीवरून स्टम्प नेताना जल्लोष केला. खेळाडूंनी विजयाचा जल्लोष करताना प्रेक्षकांचे आभार व्यक्त केले. प्रेक्षकांनी उभे राहून खेळाडूंच्या अभिवादनाचा स्वीकार केला. ए.बी. डिव्हिलियर्सने २९७ चेंडूंना सामोरे जाताना ४३ धावांची खेळी केल्यामुळे एकवेळ दक्षिण आफ्रिका संघ लढत अनिर्णीत राखण्यात यशस्वी ठरेल, असे चित्र होते, पण अखेरच्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी चित्र बदलले. वेगवान गोलंदाज उमेश यादवने तीन बळी घेतले तर आश्विनने डिव्हिलियर्सचा माघारी परतवले. अश्विनच्या आॅफ ब्रेक चेंडूला डिव्हिलियर्स चुकीच्या पद्धतीने खेळला आणि लेग स्लिपमध्ये तैनात जडेजाला झेल दिला. यापूर्वी वन-डे व टी-२० सामन्यांच्या मालिकेत पराभव स्वीकारणाऱ्या भारतीय संघाच्या वेदनेवर कसोटी मालिकेतील विजयामुळे काही अंशी फुंकर घातली गेली. विजयाचे श्रेय उमेश यादवलाही द्यावे लागेल. यादवने २१ षटकांत केवळ ९ धावा बहाल करताना ३ बळी घेतले. उमेशने अखेरच्या सत्रात डेन विलास व केली एबोट यांना बोल्ड केले तर डेन पीएटला यष्टिरक्षक रिद्धिमान साहाकडे झेल देण्यास भाग पाडले. उपाहारानंतर भारताच्या विजयाच्या आशा उंचावल्या होत्या. रवींद्र जडेजाने फॅफ ड्यू प्लेसिसला पायचित करीत महत्त्वाचा अडथळा दूर केला. ड्यू प्लेसिसने ९७ चेंडूंना सामोरे जाताना १० धावा केल्या. अश्विनने जे.पी. ड्युमिनीला (००) बाद करीत मालिकेतील ३० वा बळी नोंदवला. त्याआधी, दक्षिण आफ्रिका संघाने सकाळच्या सत्रात ३१ षटकांत केवळ ४२ धावा केल्या. अखेरचे सत्र प्रारंभ होण्यासाठी दक्षिण आफ्रिका संघ सामना अनिर्णीत राखण्यात यशस्वी ठरेल, असे चित्र होते. भारतीय गोलंदाजांनी मात्र त्यांच्या आशा धुळीस मिळवल्या. जगातील सर्वोत्तम फलंदाज डिव्हिलियर्सने एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न करीत सर्वोत्तम खेळाडू परिस्थितीनुसार खेळामध्ये कसा बदल करू शकतो, हे सिद्ध केले. जगातील सर्वोत्तम टी-२० फलंदाज डिव्हिलियर्सने संयमी फलंदाजी केली. सकाळच्या सत्रात जडेजाने शानदार मारा करीत अमलाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखविला. कर्णधार अमलाने खाते उघडण्यासाठी ४६ चेंडू प्रतीक्षा केली होती. ड्यूप्लेसिसने ५३ व्या चेंडूवर खाते उघडले. यापूर्वी ड्यूप्लेसिसने अ‍ॅडिलेडमध्ये (२०१२) बचावात्मक पवित्रा स्वीकारताना ७ तास ४६ मिनिटे खेळपट्टीवर तळ ठोकताना ११० धावांची खेळी केली होती. त्याच्या या खेळीमुळे आॅस्ट्रेलियाला विजयापासून वंचित रहावे लागले होते. त्यावेळी दुसऱ्या टोकाला त्याचा सहकारी होता डिव्हिलियर्स. त्याने २२० चेंडू खेळताना ३३ धावा केल्या होत्या. ड्यूप्लेसिसने खाते उघडण्यासाठी सर्वांत अधिक चेंडू खेळण्याचा ग्रांट फ्लावरचा (२००० मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ५१ चेंडू) विक्रम मोडला. अमलाचा स्ट्राईक रेट १०.४४ होता. (वृत्तसंस्था)धावफलक : भारत पहिला डाव ३३४. दक्षिण आफ्रिका पहिला डाव १२१. भारत दुसरा डाव ५ बाद २६७ (डाव घोषित).दक्षिण आफ्रिका दुसरा डाव :- डीन एल्गर झे. रहाणे गो. अश्विन ०४, तेंबा बावुमा त्रि. गो. आश्विन ३४, हाशिम अमला त्रि. गो. जडेजा २५, ए.बी. डिव्हिलियर्स झे. जडेजा गो. आश्विन ४३, फॅफ ड्यूप्लेसिस पायचित गो. जडेजा १०, जे.पी. ड्युमिनी पायचित गो. आश्विन ००, डेन विलास त्रि. गो. यादव १३, केली एबोट त्रि. गो. यादव ००, डेन पिएट झे. साहा गो. यादव ०१, मोर्नी मोर्कल त्रि. गो. आश्विन ०२, इम्रान ताहिर नाबाद ००. अवांतर (११). एकूण १४३.१ षटकांत सर्वबाद १४३. बाद क्रम : १-५, २-४९, ३-७६, ४-१११, ५-११२, ६-१३६, ७-१३६, ८-१४०, ९-१४३, १०-१४३. गोलंदाजी : ईशांत २०-१२-२३-०, अश्विन ४९.१-२६-६१-५, जडेजा ४६-३३-२६-२, यादव २१-१६-९-३, धवन ३-१-९-०, विजय २-०-२-०, कोहली १-१-०-०, पुजारा १-०-२-०. चेन्नई पूरग्रस्तांना विजय समर्पित भारतीय कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि रविचंद्रन अश्विन यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सोमवारी टीम इंडियाने मिळवलेल्या ३-० मालिका विजय चेन्नईतील पूरग्रस्तांना समर्पित केला. त्यांनी भारतीय सेनेतर्फे राबविल्या जात असलेल्या बचाव कार्याची प्रशंसा केली.