शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
4
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
5
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
6
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
7
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
8
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
9
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
10
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
11
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
12
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
13
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
14
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
15
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
16
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
17
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
18
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
19
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
20
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."

भारताचा निम्मा संघ तंबूत, भारत ५ बाद १८३

By admin | Updated: March 26, 2015 15:57 IST

भारताची आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्याने सेमी फायनलमध्ये भारताची अवस्था बिकट झाली आहे. भारताचा निम्मा संघ १७८ धावांमध्ये माघारी परतला आहे.

ऑनलाइन लोकमत

सिडनी, दि. २६ - शिखर धवन, विराट कोहली, रोहित शर्मा, सुरेश रैनापाठोपाठ अजिंक्य रहाणेही ४४ धावांवर बाद झाल्याने भारताची अवस्था ५ बाद १८१ अशी बिकट झाली आहे. भारताची मदार आता कर्णधार महेंद्रसिंग धोनी व रविंद्र जडेजावर असून धोनी नाबाद ३८ धावांवर खेळत आहे. 
ऑस्ट्रेलियाचे  हेझलवूडच्या गोलंदाजीवर शिखर धवन (४५) मॅक्सवेलकडे झेल देऊन बाद झाला. तर मिशेल जॉन्सनच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने (१) एक सोपा झेल हॅडिनच्या हातात दिला. त्यानंतर ३४ धावांवर खेळणा-या शर्माचा जॉन्सननेच त्रिफळा उडवला. तर फॉकनरच्या गोलंदाजीवर सुरैश रैना ७ धावांवर बाद झाला. अजिंक्य रहाणेने कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या साथीने डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण ४४ धावांवर असताना रहाणे बाद झाला. भारताला विजयासाठी ७२ चेंडूंमध्ये १४६ धावांची गरज आहे. 
तत्पूर्वी स्मिथ (१०५) व फिंचच्या (८१) शानदार खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलमध्ये भारतासमोर विजयासाठी ३२९ धावांचे लक्ष्य ठेवले.  ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत ७ गडी गमावून ३२८ धावा केल्या. भारतातर्फे  उमेश यादवने ४, मोहित शर्माने २ आणि अश्विनने १ बळी टिपला. सामन्याची चांगली सुरूवात करणा-या ऑस्ट्रेलियाची फलंदाजी स्मिथ बाद झाल्यानंतर गडगडली. मात्र अखेरच्या षटकांत त्यांनी पुन्हा फटकेबाजी करत ३२८ धावा केल्या. 
सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने नाणफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला खरा मात्र तिस-या षटकात वॉर्नर अवघ्या १२ धावांवर बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला. मात्र स्टीव्हन स्मिथने (१०५) अॅरॉन फिंचच्या (८१) साथीने संयमी खेळी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. त्या दोघांपुढे भारतीय गोलंदाज निष्प्रभ ठरत होते. मात्र १०५ धावांवर खेळणा-या स्मिथला यादवने बाद केले आणि ऑस्ट्रेलियाची स्थिती २ बाद १९७ झाली. त्यानंतर २३२ धावसंख्या असताना मॅक्सवेल अश्विनच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि त्यापाठोपाठ फिंचलाही यादवने बाद केल्याने ऑस्ट्रेलियाची स्थिती ४० षटकांत ४ बाद २३३ अशी झाली. त्यानंतर कर्णधार मायकेल क्लार्क फलंदाजीला अाल्याने तो पुन्हा ऑस्ट्रेलियाचा डाव सावरेल असेल वाटत असतानाच मोहित शर्माने त्याला १० धावांवर बाद केले. त्यापाठोपाठ फॉकनर (२१) आणि वॉटसनही (२८) बाद झाले. 
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी या सामन्यासाठी संघात एकही बदल केला नसून, संघ कायम ठेवला आहे. आजचा सामना जिंकून फायनलमध्ये धडक मारण्यास दोन्ही संघ उत्सुक असून प्रेक्षकांना काटें की टक्कर पहायला मिळणार आहे, हे मात्र नक्की.
सहा आठवड्यांआधी उभय संघ कसोटी व त्यानंतर तिरंगी मालिकेत परस्परांविरुद्ध खेळले. त्यात मायकेल क्लार्कच्या संघाने भारताला एकही विजय साकार करू दिला नव्हता. क्रिकेटविश्वात ज्याप्रमाणे आॅस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यातील अ‍ॅशेस मालिका व भारत-पाक यांच्यातील सामन्यांची चर्चा होते तशीच चर्चा गेल्या काही वर्षांपासून भारत-आॅस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यांची होत आली आहे.