शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

भारताचा निम्मा संघ तंबूत, भारत ५ बाद १८३

By admin | Updated: March 26, 2015 15:57 IST

भारताची आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्याने सेमी फायनलमध्ये भारताची अवस्था बिकट झाली आहे. भारताचा निम्मा संघ १७८ धावांमध्ये माघारी परतला आहे.

ऑनलाइन लोकमत

सिडनी, दि. २६ - शिखर धवन, विराट कोहली, रोहित शर्मा, सुरेश रैनापाठोपाठ अजिंक्य रहाणेही ४४ धावांवर बाद झाल्याने भारताची अवस्था ५ बाद १८१ अशी बिकट झाली आहे. भारताची मदार आता कर्णधार महेंद्रसिंग धोनी व रविंद्र जडेजावर असून धोनी नाबाद ३८ धावांवर खेळत आहे. 
ऑस्ट्रेलियाचे  हेझलवूडच्या गोलंदाजीवर शिखर धवन (४५) मॅक्सवेलकडे झेल देऊन बाद झाला. तर मिशेल जॉन्सनच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने (१) एक सोपा झेल हॅडिनच्या हातात दिला. त्यानंतर ३४ धावांवर खेळणा-या शर्माचा जॉन्सननेच त्रिफळा उडवला. तर फॉकनरच्या गोलंदाजीवर सुरैश रैना ७ धावांवर बाद झाला. अजिंक्य रहाणेने कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या साथीने डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण ४४ धावांवर असताना रहाणे बाद झाला. भारताला विजयासाठी ७२ चेंडूंमध्ये १४६ धावांची गरज आहे. 
तत्पूर्वी स्मिथ (१०५) व फिंचच्या (८१) शानदार खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलमध्ये भारतासमोर विजयासाठी ३२९ धावांचे लक्ष्य ठेवले.  ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत ७ गडी गमावून ३२८ धावा केल्या. भारतातर्फे  उमेश यादवने ४, मोहित शर्माने २ आणि अश्विनने १ बळी टिपला. सामन्याची चांगली सुरूवात करणा-या ऑस्ट्रेलियाची फलंदाजी स्मिथ बाद झाल्यानंतर गडगडली. मात्र अखेरच्या षटकांत त्यांनी पुन्हा फटकेबाजी करत ३२८ धावा केल्या. 
सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने नाणफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला खरा मात्र तिस-या षटकात वॉर्नर अवघ्या १२ धावांवर बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला. मात्र स्टीव्हन स्मिथने (१०५) अॅरॉन फिंचच्या (८१) साथीने संयमी खेळी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. त्या दोघांपुढे भारतीय गोलंदाज निष्प्रभ ठरत होते. मात्र १०५ धावांवर खेळणा-या स्मिथला यादवने बाद केले आणि ऑस्ट्रेलियाची स्थिती २ बाद १९७ झाली. त्यानंतर २३२ धावसंख्या असताना मॅक्सवेल अश्विनच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि त्यापाठोपाठ फिंचलाही यादवने बाद केल्याने ऑस्ट्रेलियाची स्थिती ४० षटकांत ४ बाद २३३ अशी झाली. त्यानंतर कर्णधार मायकेल क्लार्क फलंदाजीला अाल्याने तो पुन्हा ऑस्ट्रेलियाचा डाव सावरेल असेल वाटत असतानाच मोहित शर्माने त्याला १० धावांवर बाद केले. त्यापाठोपाठ फॉकनर (२१) आणि वॉटसनही (२८) बाद झाले. 
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी या सामन्यासाठी संघात एकही बदल केला नसून, संघ कायम ठेवला आहे. आजचा सामना जिंकून फायनलमध्ये धडक मारण्यास दोन्ही संघ उत्सुक असून प्रेक्षकांना काटें की टक्कर पहायला मिळणार आहे, हे मात्र नक्की.
सहा आठवड्यांआधी उभय संघ कसोटी व त्यानंतर तिरंगी मालिकेत परस्परांविरुद्ध खेळले. त्यात मायकेल क्लार्कच्या संघाने भारताला एकही विजय साकार करू दिला नव्हता. क्रिकेटविश्वात ज्याप्रमाणे आॅस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यातील अ‍ॅशेस मालिका व भारत-पाक यांच्यातील सामन्यांची चर्चा होते तशीच चर्चा गेल्या काही वर्षांपासून भारत-आॅस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यांची होत आली आहे.