शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

श्रीलंकेविरूद्ध भारताची चांगली सुरूवात, विजयी चौकार मारण्याचं लक्ष्य

By admin | Updated: July 5, 2017 17:23 IST

सलग तीन लढतींमध्ये विजय मिळविलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाचा आत्मविश्वास उंचावला असून श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यातही संघाने आश्वासक सुरूवात

ऑनलाइन लोकमत
डर्बी, दि. 5 - सलग तीन लढतींमध्ये विजय मिळविलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाचा आत्मविश्वास उंचावला असून श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यातही संघाने आश्वासक सुरूवात केली आहे. 33.3 षटकांमध्ये दोन गड्यांच्या मोबदल्यात भारताने 133 धावा केल्या आहेत. या लढतीत विजय मिळवूत उपांत्य फेरीच्या दिशेने आगेकूच करण्याचा भारताचा निर्धार आहे. 
 
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणा-या भारताची सुरूवात चांगली झाली नाही. भारताच्या सलामीच्या जोडीने आज निराशा केली. धडाकेबाज स्म्रिती मंधाना केवळ 8 धावांवर स्वस्तात बाद झाली तर पुनम राऊतही 16 धावांवर बाद झाली. पण त्यानंतर दिप्ती शर्मा आणि कर्णधार मिताली राजने डाव सावरला आहे. दिप्ती शर्मा(63) अर्धशतक फटकावून नाबाद खेळत आहे तर मिताली राजही 43 धावांवर नाबाद आहे.   
(कोणता क्रिकेटर आवडतो विचारणा-या पत्रकाराला मिताली राजचं "कडक" उत्तर)
(स्मृती मंधानाला "सेहवाग व्हर्जन" म्हणणा-या चाहत्याला विरूने सुनावलं)
(मी मुलीमध्ये माझे क्रिकेट पाहतो)
(दस का दम, भारताकडून पाकिस्तान ९५ धावांनी पराभूत)
 
फॉर्मात असलेल्या भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत प्रबळ दावेदार मानले जात आहे. श्रीलंका संघाची आतापर्यंतची स्पर्धेतील कामगिरी निराशाजनक ठरली आहे. त्यांना तीनही सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
फॉर्मचा विचार करता भारताने गेल्या चारही वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिका जिंकलेल्या आहेत. भारतीय संघाने या वाटचालीमध्ये मायदेशात श्रीलंका व विंडीजचा व्हाइटवॉश केला, तर दक्षिण आफ्रिकेला विश्वकप पात्रता स्पर्धा व चौरंगी मालिकेच्या अंतिम लढतीत पराभवाचा तडाखा दिला. विश्वकप स्पर्धेत भारताने तिन्ही राऊंड रॉबिन लढतींमध्ये विजय मिळवला. भारतीय संघ कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहे.
 
भारताने सलामी लढतीत यजमान इंग्लंडचा ३५ धावांनी पराभव करीत शानदार सुरुवात केली. त्यानतंर दुसऱ्या लढतीत विंडीजचा ७ गडी राखून पराभव केला. पाकिस्तानविरुद्ध गेल्या लढतीत ९५ धावांनी विजय मिळवला. सलग तीन विजयांमुळे भारतीय संघाचे मनोधैर्य उंचावलेले आहे. भारतीय संघाने तीन सामन्यांत सहा गुणांची कमाई केली असून गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.
 
पहिल्या दोन सामन्यांत फलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध गेल्या लढतीत डावखुरी फिरकीपटू एकता बिष्टने १० षटकांत १८ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेत, प्रतिस्पर्धी संघाचा डाव ३८.१ षटकांत ७४ धावांत गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मधल्या षटकांमध्ये दीप्ती शर्माने अचूक मारा केला. पूनम यादव व हरमनप्रीत कौर यांचीही गोलंदाजी उल्लेखनीय ठरली.
 
वन-डे इतिहासात आतापर्यंत सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरलेल्या झुलन गोस्वामीला अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही, पण पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजी आक्रमणाचा भार तिच्याच खांद्यावर राहणार आहे. फलंदाजीमध्ये सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना शानदार फॉर्मात आहे. कर्णधार मिताली राज व पूनम राऊत यांचीही कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. दुसऱ्या बाजूचा विचार करता श्रीलंका संघ विजयाचे खाते उघडण्याची प्रतीक्षा करीत आहे. श्रीलंकेला सलामी लढतीत न्यूझीलंडविरुद्ध ९ गड्यांनी, आॅस्ट्रेलियाविरुद्ध ८ गड्यांनी आणि इंग्लंडविरुद्ध ७ गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. श्रीलंका संघाला फलंदाजीमध्ये सर्वाधिक आशा चामरी अटापट्टूकडून आहे. तिने न्यूझीलंडविरुद्ध ५३ तर आॅस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १७८ धावांची खेळी केली होती. पण संघाला विजय मिळवून देण्यात तिचे प्रयत्न अपुरेच पडले.