शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

श्रीलंकेविरूद्ध भारताची चांगली सुरूवात, विजयी चौकार मारण्याचं लक्ष्य

By admin | Updated: July 5, 2017 17:23 IST

सलग तीन लढतींमध्ये विजय मिळविलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाचा आत्मविश्वास उंचावला असून श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यातही संघाने आश्वासक सुरूवात

ऑनलाइन लोकमत
डर्बी, दि. 5 - सलग तीन लढतींमध्ये विजय मिळविलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाचा आत्मविश्वास उंचावला असून श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यातही संघाने आश्वासक सुरूवात केली आहे. 33.3 षटकांमध्ये दोन गड्यांच्या मोबदल्यात भारताने 133 धावा केल्या आहेत. या लढतीत विजय मिळवूत उपांत्य फेरीच्या दिशेने आगेकूच करण्याचा भारताचा निर्धार आहे. 
 
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणा-या भारताची सुरूवात चांगली झाली नाही. भारताच्या सलामीच्या जोडीने आज निराशा केली. धडाकेबाज स्म्रिती मंधाना केवळ 8 धावांवर स्वस्तात बाद झाली तर पुनम राऊतही 16 धावांवर बाद झाली. पण त्यानंतर दिप्ती शर्मा आणि कर्णधार मिताली राजने डाव सावरला आहे. दिप्ती शर्मा(63) अर्धशतक फटकावून नाबाद खेळत आहे तर मिताली राजही 43 धावांवर नाबाद आहे.   
(कोणता क्रिकेटर आवडतो विचारणा-या पत्रकाराला मिताली राजचं "कडक" उत्तर)
(स्मृती मंधानाला "सेहवाग व्हर्जन" म्हणणा-या चाहत्याला विरूने सुनावलं)
(मी मुलीमध्ये माझे क्रिकेट पाहतो)
(दस का दम, भारताकडून पाकिस्तान ९५ धावांनी पराभूत)
 
फॉर्मात असलेल्या भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत प्रबळ दावेदार मानले जात आहे. श्रीलंका संघाची आतापर्यंतची स्पर्धेतील कामगिरी निराशाजनक ठरली आहे. त्यांना तीनही सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
फॉर्मचा विचार करता भारताने गेल्या चारही वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिका जिंकलेल्या आहेत. भारतीय संघाने या वाटचालीमध्ये मायदेशात श्रीलंका व विंडीजचा व्हाइटवॉश केला, तर दक्षिण आफ्रिकेला विश्वकप पात्रता स्पर्धा व चौरंगी मालिकेच्या अंतिम लढतीत पराभवाचा तडाखा दिला. विश्वकप स्पर्धेत भारताने तिन्ही राऊंड रॉबिन लढतींमध्ये विजय मिळवला. भारतीय संघ कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहे.
 
भारताने सलामी लढतीत यजमान इंग्लंडचा ३५ धावांनी पराभव करीत शानदार सुरुवात केली. त्यानतंर दुसऱ्या लढतीत विंडीजचा ७ गडी राखून पराभव केला. पाकिस्तानविरुद्ध गेल्या लढतीत ९५ धावांनी विजय मिळवला. सलग तीन विजयांमुळे भारतीय संघाचे मनोधैर्य उंचावलेले आहे. भारतीय संघाने तीन सामन्यांत सहा गुणांची कमाई केली असून गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.
 
पहिल्या दोन सामन्यांत फलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध गेल्या लढतीत डावखुरी फिरकीपटू एकता बिष्टने १० षटकांत १८ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेत, प्रतिस्पर्धी संघाचा डाव ३८.१ षटकांत ७४ धावांत गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मधल्या षटकांमध्ये दीप्ती शर्माने अचूक मारा केला. पूनम यादव व हरमनप्रीत कौर यांचीही गोलंदाजी उल्लेखनीय ठरली.
 
वन-डे इतिहासात आतापर्यंत सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरलेल्या झुलन गोस्वामीला अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही, पण पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजी आक्रमणाचा भार तिच्याच खांद्यावर राहणार आहे. फलंदाजीमध्ये सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना शानदार फॉर्मात आहे. कर्णधार मिताली राज व पूनम राऊत यांचीही कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. दुसऱ्या बाजूचा विचार करता श्रीलंका संघ विजयाचे खाते उघडण्याची प्रतीक्षा करीत आहे. श्रीलंकेला सलामी लढतीत न्यूझीलंडविरुद्ध ९ गड्यांनी, आॅस्ट्रेलियाविरुद्ध ८ गड्यांनी आणि इंग्लंडविरुद्ध ७ गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. श्रीलंका संघाला फलंदाजीमध्ये सर्वाधिक आशा चामरी अटापट्टूकडून आहे. तिने न्यूझीलंडविरुद्ध ५३ तर आॅस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १७८ धावांची खेळी केली होती. पण संघाला विजय मिळवून देण्यात तिचे प्रयत्न अपुरेच पडले.