शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
3
इकडे पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिली; तिकडे 'बेवफा' सोनम युपीत सापडली...
4
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
5
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
6
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
7
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
8
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
9
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची
10
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
11
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
12
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
13
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
14
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
15
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
16
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
17
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
18
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
19
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती

आयपीएलमध्ये भारताचे सर्वांत यशस्वी पाच कर्णधार

By admin | Updated: May 3, 2016 03:51 IST

आयपीएलमध्ये संघाचे नेतृत्व भारतीय खेळाडूनेच करावे, हेच योग्य आहे. काहींचे मत असे आहे, की सर्वांत योग्य व्यक्तीकडे संघाचे नेतृत्व सोपवायला पाहिजे, मग तो खेळाडू कुठल्याही

- एबी डिव्हिलियर्स लिहितो़..आयपीएलमध्ये संघाचे नेतृत्व भारतीय खेळाडूनेच करावे, हेच योग्य आहे. काहींचे मत असे आहे, की सर्वांत योग्य व्यक्तीकडे संघाचे नेतृत्व सोपवायला पाहिजे, मग तो खेळाडू कुठल्याही देशाचा असला तरी हरकत नाही. काहींच्या मते ही जबाबदारी भारतीय खेळाडूंवरच सोपवायला पाहिजे. कारण भारतीय खेळाडू संघाला योग्य पद्धतीने प्रोत्साहित करू शकतो. त्याचप्रमाणे त्याला वेगवेगळ्या मैदानांवरील परिस्थितीची चांगली माहिती असते. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने एक महत्त्वाचा निर्णय घेताना संघाचा यशस्वी फलंदाज डेव्हिड मिलरची कर्णधारपदावरून उचलबांगडी करीत मुरली विजयकडे ही जबाबदारी सोपविली. मुरली विजय तमिळनाडूचा कर्णधार म्हणून यशस्वी ठरला आहे. दरम्यान, जर परिस्थिती नियंत्रणात असेल तर स्पर्धेत एकच कर्णधार कायम ठेवण्यात येतो. आयपीएलच्या इतिहासात पाच सर्वांत यशस्वी कर्णधारांची चर्चा केली तर ते सर्व भारतीय आहेत. किमान १५ सामन्यांमध्ये आपल्या संघाचे कर्णधारपद भूषवणाऱ्या कर्णधारांच्या विजयाच्या टक्केवारीवर आधार घेतला तर गौतम गंभीर पाचव्या स्थानी आहे. दिल्ली व कोलकाता संघांचा कर्णधार म्हणून ९३ सामने खेळताना त्याची विजयाची टक्केवारी ५५.७ अशी आहे. अनिल कुंबळे या यादीत चौथ्या स्थानी आहे. त्याने आरसीबीतर्फे २६ सामन्यांत संघाचे नेतृत्व केले. त्याची विजयाची टक्केवारी आहे ५७.६९ टक्के. महेंद्रसिंह धोनीने चेन्नई व पुणे संघाचे १३९ सामन्यांत नेतृत्व केले असून त्याची विजयाची टक्केवारी आहे ५९.०९ टक्के. तो तिसऱ्या स्थानी आहे. सचिन तेंडुलकरने २००८ ते २०११ या कालावधीत ५१ सामन्यांत मुंबई संघाचे कर्णधारपद भूषवले. त्याची विजयाची टक्केवारी आहे ६०.७८ आणि तो यादीत दुसऱ्या स्थानी आहे. आकडेवारीचा विचार करता आयपीएलच्या इतिहासात सर्वांत यशस्वी कर्णधार रोहित शर्मा आहे. रोहितने २०१३ ते २०१५ या कालावधीत ४४ सामन्यांत मुंबई संघाचे नेतृत्व केले. त्यात २७ सामन्यांत विजय मिळवला, तर १७ सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. त्याची विजयाची टक्केवारी ६१.३६ अशी आहे. आयपीएलमध्ये सर्वांत यशस्वी विदेशी कर्णधाराची चर्चा केली तर अव्वल स्थानी आहे शेन वॉर्न. महान आॅस्ट्रेलियन फिरकीपटूने पहिल्या चार सत्रांत राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपद भूषवले आणि आपल्या नेतृत्वाखाली संघाला ५५ पैकी ३० सामन्यांत विजय मिळवून दिला. त्याची विजयाची टक्केवारी आहे ५४.५४ अशी. नेतृत्व कुणाकडे असावे? या प्रश्नाचे माझ्या मते काही योग्य उत्तर सापडत नाही. कारण नेतृत्व हे कुणा एका खेळाडूपेक्षा संघासोबत जुळलेली बाब आहे. आयपीएल संघाचे नेतृत्व करणाऱ्या विदेशी खेळाडूला स्थानिक खेळाडूचे सहकार्य व समर्थन मिळणे आवश्यक ठरते. एखादा भारतीय खेळाडू जर संघाचे नेतृत्व करीत असेल तर त्यालाही विदेशी खेळाडूच्या अनुभवाचा लाभ मिळत असतो. त्यामुळे या स्पर्धेत कर्णधार कुठल्याही देशाचा असला तरी अडचणीच्या स्थितीत संयम ढळू न देणे महत्त्वाचे आहे. (टीसीएम)