शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
4
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
5
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
6
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
7
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
8
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
9
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
10
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
11
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
12
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
13
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
14
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
15
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
16
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
17
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
18
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
19
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
20
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले

आयपीएलमध्ये भारताचे सर्वांत यशस्वी पाच कर्णधार

By admin | Updated: May 3, 2016 03:51 IST

आयपीएलमध्ये संघाचे नेतृत्व भारतीय खेळाडूनेच करावे, हेच योग्य आहे. काहींचे मत असे आहे, की सर्वांत योग्य व्यक्तीकडे संघाचे नेतृत्व सोपवायला पाहिजे, मग तो खेळाडू कुठल्याही

- एबी डिव्हिलियर्स लिहितो़..आयपीएलमध्ये संघाचे नेतृत्व भारतीय खेळाडूनेच करावे, हेच योग्य आहे. काहींचे मत असे आहे, की सर्वांत योग्य व्यक्तीकडे संघाचे नेतृत्व सोपवायला पाहिजे, मग तो खेळाडू कुठल्याही देशाचा असला तरी हरकत नाही. काहींच्या मते ही जबाबदारी भारतीय खेळाडूंवरच सोपवायला पाहिजे. कारण भारतीय खेळाडू संघाला योग्य पद्धतीने प्रोत्साहित करू शकतो. त्याचप्रमाणे त्याला वेगवेगळ्या मैदानांवरील परिस्थितीची चांगली माहिती असते. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने एक महत्त्वाचा निर्णय घेताना संघाचा यशस्वी फलंदाज डेव्हिड मिलरची कर्णधारपदावरून उचलबांगडी करीत मुरली विजयकडे ही जबाबदारी सोपविली. मुरली विजय तमिळनाडूचा कर्णधार म्हणून यशस्वी ठरला आहे. दरम्यान, जर परिस्थिती नियंत्रणात असेल तर स्पर्धेत एकच कर्णधार कायम ठेवण्यात येतो. आयपीएलच्या इतिहासात पाच सर्वांत यशस्वी कर्णधारांची चर्चा केली तर ते सर्व भारतीय आहेत. किमान १५ सामन्यांमध्ये आपल्या संघाचे कर्णधारपद भूषवणाऱ्या कर्णधारांच्या विजयाच्या टक्केवारीवर आधार घेतला तर गौतम गंभीर पाचव्या स्थानी आहे. दिल्ली व कोलकाता संघांचा कर्णधार म्हणून ९३ सामने खेळताना त्याची विजयाची टक्केवारी ५५.७ अशी आहे. अनिल कुंबळे या यादीत चौथ्या स्थानी आहे. त्याने आरसीबीतर्फे २६ सामन्यांत संघाचे नेतृत्व केले. त्याची विजयाची टक्केवारी आहे ५७.६९ टक्के. महेंद्रसिंह धोनीने चेन्नई व पुणे संघाचे १३९ सामन्यांत नेतृत्व केले असून त्याची विजयाची टक्केवारी आहे ५९.०९ टक्के. तो तिसऱ्या स्थानी आहे. सचिन तेंडुलकरने २००८ ते २०११ या कालावधीत ५१ सामन्यांत मुंबई संघाचे कर्णधारपद भूषवले. त्याची विजयाची टक्केवारी आहे ६०.७८ आणि तो यादीत दुसऱ्या स्थानी आहे. आकडेवारीचा विचार करता आयपीएलच्या इतिहासात सर्वांत यशस्वी कर्णधार रोहित शर्मा आहे. रोहितने २०१३ ते २०१५ या कालावधीत ४४ सामन्यांत मुंबई संघाचे नेतृत्व केले. त्यात २७ सामन्यांत विजय मिळवला, तर १७ सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. त्याची विजयाची टक्केवारी ६१.३६ अशी आहे. आयपीएलमध्ये सर्वांत यशस्वी विदेशी कर्णधाराची चर्चा केली तर अव्वल स्थानी आहे शेन वॉर्न. महान आॅस्ट्रेलियन फिरकीपटूने पहिल्या चार सत्रांत राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपद भूषवले आणि आपल्या नेतृत्वाखाली संघाला ५५ पैकी ३० सामन्यांत विजय मिळवून दिला. त्याची विजयाची टक्केवारी आहे ५४.५४ अशी. नेतृत्व कुणाकडे असावे? या प्रश्नाचे माझ्या मते काही योग्य उत्तर सापडत नाही. कारण नेतृत्व हे कुणा एका खेळाडूपेक्षा संघासोबत जुळलेली बाब आहे. आयपीएल संघाचे नेतृत्व करणाऱ्या विदेशी खेळाडूला स्थानिक खेळाडूचे सहकार्य व समर्थन मिळणे आवश्यक ठरते. एखादा भारतीय खेळाडू जर संघाचे नेतृत्व करीत असेल तर त्यालाही विदेशी खेळाडूच्या अनुभवाचा लाभ मिळत असतो. त्यामुळे या स्पर्धेत कर्णधार कुठल्याही देशाचा असला तरी अडचणीच्या स्थितीत संयम ढळू न देणे महत्त्वाचे आहे. (टीसीएम)