शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
4
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
5
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
6
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
7
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
8
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
9
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
10
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
11
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
12
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
13
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
14
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
15
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
16
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
17
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
18
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
19
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
20
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; आतापर्यंत १४ मृत्यू ८० हून अधिक जखमी

कोहली, रहाणेच्या शतकानंतरही भारताची फलंदाजी कोसळली

By admin | Updated: December 28, 2014 15:03 IST

विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेच्या अडीचशे धावांच्या भागीदारीनंतरही भारताच्या तळाचे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्याने तिस-या दिवसअखेर भारताची अवस्था ८ बाद ४६२ अशी झाली आहे.

ऑनलाइन लोकमत 

मेलबर्न, दि. २८ - विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेच्या अडीचशे धावांच्या भागीदारीनंतरही भारताच्या तळाचे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्याने तिस-या दिवसअखेर भारताची अवस्था ८ बाद ४६२ अशी झाली आहे.

तिस-या दिवशी एक बाद १०८ धावांवरुन पुढे खेळायला सुरुवात करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. चेतेश्वर पुजारा २५ आणि मुरली विजय ६८ धावांवर बाद झाल्याने भारताची अवस्था ३ बाद १४७ अशी झाली होती. यानंतर मैदानात उतरलेल्या विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे या जोडीने भारताच्या डावाला आकार देत ऑस्ट्रेलियाला चोख प्रत्युत्तरही दिले. या जोडीने चौथ्या विकेटसाठी तब्बल २६२ धावांची भागीदारी केली.  नॅथन लियॉनने रहाणे १४७ धावांवर बाद ही जोडी फोडली. रहाणे बाद झाला त्यावेळी भारताने ५ गडी गमावत ४०९ धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर तळाचे फलंदाज  स्वस्तात तंबूत परतले. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा लोकेश राहुल फारशी चमक दाखवू शकला नाही. तो केवळ तीन धावा करुन तंबूत परतला. त्यापाठोपाठ कर्णधार महेंद्रसिंह धोनी ११ धावांवर तर आर. अश्विन भोपळा न फोडताच माघारी परतला. त्यामुळे तिस-या दिवशी भक्कम धावसंख्या उभारुन भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला चोख प्रत्युत्तर देऊन अशी आशा असतानाच  भारताची अवस्था ७ बाद ४३४ अशी झाली. तिस-या दिवसाच्या शेवटच्या षटकात विराट कोहली १६९ धावांवर बाद झाला.मोहम्मद शमी ११ धावांवर नाबाद आहे.  ऑस्ट्रेलियातर्फे रॅन हॅरिसने सर्वाधिक चार विकेट घेतल्या आहेत.