शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
5
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
6
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
7
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
8
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
9
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
11
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
12
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
13
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
14
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
15
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
16
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
17
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
18
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
19
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
20
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना

कोहली, रहाणेच्या शतकानंतरही भारताची फलंदाजी कोसळली

By admin | Updated: December 28, 2014 15:03 IST

विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेच्या अडीचशे धावांच्या भागीदारीनंतरही भारताच्या तळाचे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्याने तिस-या दिवसअखेर भारताची अवस्था ८ बाद ४६२ अशी झाली आहे.

ऑनलाइन लोकमत 

मेलबर्न, दि. २८ - विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेच्या अडीचशे धावांच्या भागीदारीनंतरही भारताच्या तळाचे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्याने तिस-या दिवसअखेर भारताची अवस्था ८ बाद ४६२ अशी झाली आहे.

तिस-या दिवशी एक बाद १०८ धावांवरुन पुढे खेळायला सुरुवात करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. चेतेश्वर पुजारा २५ आणि मुरली विजय ६८ धावांवर बाद झाल्याने भारताची अवस्था ३ बाद १४७ अशी झाली होती. यानंतर मैदानात उतरलेल्या विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे या जोडीने भारताच्या डावाला आकार देत ऑस्ट्रेलियाला चोख प्रत्युत्तरही दिले. या जोडीने चौथ्या विकेटसाठी तब्बल २६२ धावांची भागीदारी केली.  नॅथन लियॉनने रहाणे १४७ धावांवर बाद ही जोडी फोडली. रहाणे बाद झाला त्यावेळी भारताने ५ गडी गमावत ४०९ धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर तळाचे फलंदाज  स्वस्तात तंबूत परतले. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा लोकेश राहुल फारशी चमक दाखवू शकला नाही. तो केवळ तीन धावा करुन तंबूत परतला. त्यापाठोपाठ कर्णधार महेंद्रसिंह धोनी ११ धावांवर तर आर. अश्विन भोपळा न फोडताच माघारी परतला. त्यामुळे तिस-या दिवशी भक्कम धावसंख्या उभारुन भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला चोख प्रत्युत्तर देऊन अशी आशा असतानाच  भारताची अवस्था ७ बाद ४३४ अशी झाली. तिस-या दिवसाच्या शेवटच्या षटकात विराट कोहली १६९ धावांवर बाद झाला.मोहम्मद शमी ११ धावांवर नाबाद आहे.  ऑस्ट्रेलियातर्फे रॅन हॅरिसने सर्वाधिक चार विकेट घेतल्या आहेत.