शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

पाकिस्तानचं भारतासमोर 119 धावांचं आव्हान

By admin | Updated: March 19, 2016 21:46 IST

पाकिस्तान क्रिकेट संघाने भारतासमोर 119 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. १९ - पाकिस्तान क्रिकेट संघाने भारतासमोर 119 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने सेफ गेम खेळत धीम्या गतीने सुरुवात केली. पहिली विकेट मिळण्यासाठी भारताला 7 ओव्हर्सची वाट पाहावी लागली. पाकिस्तानने 118 धावा करत आपल्या 5 विकेट गमावल्या. पाकिस्तानतर्फे शोएब मलिकने सर्वात जास्त 26 धावा केल्या. 
 
शरजील खानला 17 धावांवर बाद करत भारताने पहिली विकेट घेतली. सुरेश रैनाच्या गोलंदाजीवर हार्दीक पांड्याचा अप्रतिम झेल घेत भारताने खातं उघडल. भारताकडून सुरेश रैना, बुमराह पांड्या, नेहरा आणि जाडेजाने प्रत्येकी एक विकेट घेतली. 
 
टी-20 वर्ल्ड कपमधील या हाय व्होल्टेज क्रिकेट सामन्याला पावसामुळे उशीरा सुरुवात झाली. ईडन गार्डन्स मैदानावर हा सामना सुरु आहे. 7.30 वाजता सामना सुरु होणार होता मात्र पावसामुळे सामना 8.30 वाजता सुरु झाला. सामना उशीरा सुरु झाल्याने षटके कमी करत 18 करण्यात आली.
 
न्यूझीलंडकडून पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर वर्ल्ड कपमधील पहिल्या विजयासाठी भारतीय संघ उत्सुक आहे. पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये हरवण्याचा विक्रम कायम ठेवण्याचा भारत प्रयत्न करेल. तर दुसरीकडे पाकिस्तान आशिया कपमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याच्या इराद्याने मैदानात उतरली आहे.