शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

भारतीय महिला संघाचा आफ्रिकेवर थरारक विजय

By admin | Updated: February 21, 2017 20:26 IST

आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील शेवटच्या पात्रता सामन्यात भारतीय महिला संघानी द. आफ्रिकेच्या संघाचा पराभव केला आहे.

ऑनलाइन लोकमतकोलंबो, दि. 21 - आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील शेवटच्या पात्रता सामन्यात भारतीय महिला संघानी द. आफ्रिकेच्या संघाचा पराभव केला आहे. महिला विश्वचषक पात्रता स्पर्धेत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा एक गडी राखून पराभव केला. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघाने यापुर्वीच विश्वचषकाचे तिकीट मिळवले आहे. या सामन्यात दोन्ही संघांनी कोणत्याही दडपणाशिवाय सर्वोत्तम खेळ केला. शेवटच्या पात्रता सामन्यात भारताने आफ्रिकेचा पराभव केल्यामुळे विश्वचषक सामन्यात भारतीय महिलांचा विश्वास वाढण्यास मदत होईल. द.आफ्रिकेविरोधात झालेल्या अटीतटीच्या लढतीत भारतीय संघाने एका विकेटने विजय मिळवला. आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत 244 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून एकाही खेळाडूला अर्धशतक झळकावता आले नाही. भारताच्या राजेश्वरी गायकवाडने तीन तर शिखा पांडेने दोन बळी मिळवले. आफ्रिकेच्या 244 धावांचा पाठलाग करताना भारताने धमाकेदार सुरुवात केली. मोना मिश्राने संयमी फलंदाजी करताना 82 चेंडूत 59 धावांची खेळी करत भारताच्या विजयाच मोलाची भूमिका बजावली. 43 षटकानंतर भारताची 4 बाद 209 अशा चांगल्या स्थितीत असताना त्यानंतर 14 धावामध्ये भारताने चार विकेट गमावत सामन्यात थरारकता आणली. शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी नऊ धावांची गरज असताना पूनम यादव बाद झाली आणि भारतीय संघ पराभवाच्या छायेत गेला. पाच चेंडूत नऊ धावांची गरज असताना हरमनप्रित स्ट्रईकवर होती. पण तीन चेंडूवर हरमनप्रीतला एकही धाव घेता आली नाही. शेवटच्या दोन चेंडूवर आठ धावांची गरज असताना हरमनप्रीतने षटकार लगावत भारतीयांच्या आशा जिवंत ठेवल्या. शेवटच्या चेंडूवर दोन धावा घेत भारताने आफ्रिकेवर थरारक विजय मिळवला. पात्रता स्पर्धेच्या सुपरसिक्स फेरीच्या गुणतालिकेत भारतीय महिला अव्वल स्थानी राहिल्या, तर दक्षिण आफ्रिकेने दुसरे स्थान पटकावले. दहा संघांच्या या स्पर्धेत या दोन्ही संघांनी सुरुवातीपासूनच चमकदार कामगिरी केली. तसेच, या स्पर्धेतील अव्वल चार संघांनी केवळ विश्वचषक स्पर्धेत प्रवेश मिळवला नसून आयसीसी महिला चॅम्पियनशिप स्पर्धेतही आपली जागा निश्चित केली आहे. भारत व दक्षिण आफ्रिकेव्यतिरिक्त श्रीलंका आणि पाकिस्तान यांनी विश्वचषक व चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे.