शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
2
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
3
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
4
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
5
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
6
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
7
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
8
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
11
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
12
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
13
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
14
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
15
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
16
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
17
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
18
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
19
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
20
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

भारतीय महिलांनी जिंकली मालिका

By admin | Updated: February 18, 2016 06:29 IST

मध्यमगती गोलंदाज दीप्ती शर्मा (२३ धावांत ४ बळी) हिच्या भेदक गोलंदाजीनंतर कर्णधार मिताली राज (नाबाद ५३) हिच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेला

रांची : मध्यमगती गोलंदाज दीप्ती शर्मा (२३ धावांत ४ बळी) हिच्या भेदक गोलंदाजीनंतर कर्णधार मिताली राज (नाबाद ५३) हिच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेला बुधवारी दुसऱ्या वनडे सामन्यात ४१ चेंडू बाकी ठेवताना ६ गडी राखून ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी निर्णायक आघाडी घेतली.भारताने श्रीलंकन संघाला ५० षटकांत ९ बाद १७८ धावांवर रोखल्यानंतर ४३.१ षटकांत ४ बाद १७९ धावा करून एकतर्फी विजय मिळविला. भारताने मालिकेतील पहिला सामना १०७ धावांनी जिंकला होता. या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना १९ फेब्रुवारी रोजी रांची येथे खेळवला जाईल. छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्मृती मानधना (४६) आणि थिरुष कामिनी (२६) यांनी भारताला १३.२ षटकांत ६७ धावांची सुरुवात करून विजयाचा मजबूत पाया रचला. कामिनीने ४४ चेंडूंत ५ चौकार मारले, तर स्मृती मानधना हिने ४६ चेंडूंत ४ चौकार व एक षटकार मारला. त्यानंतर कर्णधार मिताली राज हिने हरमनप्रीत कौर हिच्या साथीने ६४ धावांची भागीदारी करताना भारताचा विजय निश्चित केला. हरमनप्रीतने ६१ चेंडूंत ६ चौकारांसह ४१ धावा केल्या. त्यानंतर मितालीने दीप्ती शर्माच्या साथीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मितालीने ८० चेंडूंत ४ चौकारांसह नाबाद ५३ धावा केल्या. दीप्ती शर्मा ८ धावांवर नाबाद राहिली. श्रीलंकेकडून फिरकी गोलंदाज सुगंधा कुमारी हिने ३९ धावांत ४ गडी बाद केले. त्याआधी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकन संघाने भारतीय गोलंदाजांच्या अचूक माऱ्यासमोर नियमित अंतराने विकेट गमावल्या. त्यांच्याकडून सलामीवीर प्रसादनी वीराकोड्डीने ३७ आणि दिलानी मनोदराने नाबाद ४३ धावा केल्या. भारताकडून दीप्तीने २३ धावांत ४ गडी बाद केले. राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव आणि हरमनप्रीत यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.(वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलकश्रीलंका : ५० षटकांत ९ बाद १७८. (प्रसादनी वीराकोड्डी ३७, दिलानी मनोदरा नाबाद ४३. दीप्ती शर्मा ४/२३).भारत : ४३.१ षटकांत ४ बाद १७९. (मिताली राज ५३, स्मृती मानधना ४६, थिरुष कामिनी २६. सुगंधा कुमारी ४/३९).