शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

भारतीय नेमबाजांची शानदार कामगिरी कायम; शुक्रवारी पटकावली दोन सुवर्ण पदके

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 07:06 IST

भारताचे अनुभवी नेमबाज संजीव राजपूत व तेजस्विनी सावंत यांनी आयएसएसएफ विश्वचषकमध्ये शुक्रवारी ५० मीटर रायफल थ्री पोझिशन मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले.

नवी दिल्ली : भारतीय नेमबाजांनी आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघ (आयएसएसएफ) विश्वचषक स्पर्धेत आपले वर्चस्व कायम राखताना शुक्रवारी आणखी दोन सुवर्ण पदके पटकावली. पण, ऑलिम्पिकसाठी १६ वे कोटा स्थान मिळविण्याची प्रतीक्षा मात्र कायम आहे. भारत १२ सुवर्ण, ७ रौप्य व ६ कांस्य अशा एकूण २५ पदकांसह तालिकेत अव्वल स्थानी आहे. 

भारताचे अनुभवी नेमबाज संजीव राजपूत व तेजस्विनी सावंत यांनी आयएसएसएफ विश्वचषकमध्ये शुक्रवारी ५० मीटर रायफल थ्री पोझिशन मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले. त्यांनी युक्रेनच्या सेरही कुलीश आणि अ‍ॅना इलिना यांना ३१-२९ असे नमविले. संजीव-तेजस्विनी यांनी भारताला अकरावे सुवर्ण पदक पटकावून दिले. ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर व सुनिधी चौहाण यांनी कांस्य पदकाचा मान मिळवला. त्यांनी अमेरिकेच्या तिथोमी शेरी आणि वर्जिनिया थ्रेशर यांचा ३१-१५ असा एकतर्फी पराभव केला.

त्यानंतर स्वप्निल कुसाले, चैन सिंग व नीरज कुमार या भारतीय त्रिकूटाने ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये पुरुष संघाच्या फायनलमध्ये अमेरिकेचा ४७-२५ ने पराभव करीत सुवर्णपदक पटकावले. विजयवीर संधू याने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल स्पर्धेत चमकदार कामगिरी करताना रौप्यपदक पटकावले. एस्टोनियाच्या पीटर ओलेस्कोने सुवर्ण जिंकले.

टॅग्स :Shootingगोळीबार