शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

भारतीय नेमबाजांची शानदार कामगिरी कायम; शुक्रवारी पटकावली दोन सुवर्ण पदके

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 07:06 IST

भारताचे अनुभवी नेमबाज संजीव राजपूत व तेजस्विनी सावंत यांनी आयएसएसएफ विश्वचषकमध्ये शुक्रवारी ५० मीटर रायफल थ्री पोझिशन मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले.

नवी दिल्ली : भारतीय नेमबाजांनी आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघ (आयएसएसएफ) विश्वचषक स्पर्धेत आपले वर्चस्व कायम राखताना शुक्रवारी आणखी दोन सुवर्ण पदके पटकावली. पण, ऑलिम्पिकसाठी १६ वे कोटा स्थान मिळविण्याची प्रतीक्षा मात्र कायम आहे. भारत १२ सुवर्ण, ७ रौप्य व ६ कांस्य अशा एकूण २५ पदकांसह तालिकेत अव्वल स्थानी आहे. 

भारताचे अनुभवी नेमबाज संजीव राजपूत व तेजस्विनी सावंत यांनी आयएसएसएफ विश्वचषकमध्ये शुक्रवारी ५० मीटर रायफल थ्री पोझिशन मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले. त्यांनी युक्रेनच्या सेरही कुलीश आणि अ‍ॅना इलिना यांना ३१-२९ असे नमविले. संजीव-तेजस्विनी यांनी भारताला अकरावे सुवर्ण पदक पटकावून दिले. ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर व सुनिधी चौहाण यांनी कांस्य पदकाचा मान मिळवला. त्यांनी अमेरिकेच्या तिथोमी शेरी आणि वर्जिनिया थ्रेशर यांचा ३१-१५ असा एकतर्फी पराभव केला.

त्यानंतर स्वप्निल कुसाले, चैन सिंग व नीरज कुमार या भारतीय त्रिकूटाने ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये पुरुष संघाच्या फायनलमध्ये अमेरिकेचा ४७-२५ ने पराभव करीत सुवर्णपदक पटकावले. विजयवीर संधू याने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल स्पर्धेत चमकदार कामगिरी करताना रौप्यपदक पटकावले. एस्टोनियाच्या पीटर ओलेस्कोने सुवर्ण जिंकले.

टॅग्स :Shootingगोळीबार