शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय पुरुष तिरंदाजी संघ अंतिम फेरीत

By admin | Updated: May 20, 2017 03:22 IST

अभिषेक वर्मा, चिन्ना राजू श्रीधर आणि अमनजीतसिंग यांचा समावेश असलेल्या भारतीय पुरुष संघाने कम्पाऊंड प्रकारात अमेरिकेचा २३२-२३० असा निसटता पराभव करीत

शांघाय : अभिषेक वर्मा, चिन्ना राजू श्रीधर आणि अमनजीतसिंग यांचा समावेश असलेल्या भारतीय पुरुष संघाने कम्पाऊंड प्रकारात अमेरिकेचा २३२-२३० असा निसटता पराभव करीत तिरंदाजी विश्वचकाच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे.वर्माने यानंतर ज्योती सुरेखासोबत मिश्र पेअर प्रकारात कांस्य पदकाच्या प्ले आॅफमध्ये देखील प्रवेश केला.आॅलिम्पियन अतानू दास आणि दीपिका कुमारी यांच्यासह रिकर्व्ह तिरंदाजांनी मात्र निराश केले. सर्वजण आपापल्या गटातून झटपट बाहेर पडले. कम्पाऊंड प्रकारात पुरुष संघ दुसऱ्या सेटअखेरीस ११६-११७ असा माघारला होता. पण तिसऱ्या सेटमध्ये ६०-५७ अशा विजयासह आघाडी मिळाली. अंतिम सेटमध्ये पुन्हा एकदा आघाडी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले. चौथा मानांकित भारतीय संघ सुवर्णपदकाच्या लढतीत दहावा मानांकित कोलंबियाविरुद्ध खेळणार आहे. मिश्र पेअर प्रकारात कांस्य पदकाच्या लढतीत वर्मा-ज्योती हे अमेरिकेच्या जोडीविरुद्ध खेळणार आहेत. भारताच्या जोडीला उपांत्य सामन्यात कोरियाविरुद्ध १५२-१५८ असा पराभव पत्करावा लागला. मागच्या वर्षी रिओ आॅलिम्पिकनंतर पहिल्याच मोठ्या स्पर्धेत सहभागी झालेला अतानू दास हा क्वार्टर फायनलमध्ये नेदरलॅन्डच्या खेळाडूकडून चकित झाला. दीपिकाला रिकर्व्ह प्रकारात जपानची हायाकावा रेन हिच्याकडून १-७ ने पराभवाचा धक्का बसला. मिश्र पेअर प्रकारात अतानू- दीपिका यांच्या जोडीला रशियाच्या जोडीकडून ३-५ असा पराभव पत्करावा लागला. पुरुष रिकर्व्ह संघाला क्वार्टरफायनलमध्ये जपानविरुद्ध ०-३ ने पराभवाचे तोंड पहावे लागले.सहावा मानांकित भारताचा महिला रिकर्व्ह संघ पहिल्याच फेरीत अमेरिकेकडून २-६ ने पराभूत होऊन बाहेर पडला. (वृत्तसंस्था)