शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
3
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
4
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
5
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
6
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
7
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
8
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
9
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
10
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
11
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
12
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
13
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
14
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
15
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
16
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
17
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
18
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
19
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
20
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव

पाकिस्तानविरोधात भारतीय हॉकी संघाने काळी फित बांधून खेळला सामना

By admin | Updated: June 19, 2017 08:45 IST

शहीद भारतीय जवानांच्या सन्मानार्थ आणि दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी खेळाडूंनी काळी फीत बांधली होती

ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 19 - रविवारी पाकिस्तानविरोधात खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय हॉकी संघाच्या खेळाडूंनी काळ्या फिती बांधल्या होत्या. शहीद भारतीय जवानांच्या सन्मानार्थ आणि दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी खेळाडूंनी काळी फीत बांधली होती. भारतीय हॉकी संघाने एफआयएच विश्व हॉकी लीग सेमीफायनलमध्ये परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा विक्रमी ७-१ गोलने धुव्वा उडविला आणि ‘ब’ गटात अव्वल स्थान कायम राखले. पाकिस्तानचा पराभव केल्यानं त्यांनी सर्वाची मने जिंकलीच. पण सोबतच भारतीय जवानांप्रती आदर दाखवत सर्वांचा मानही मिळवला. 
 
(पाकचा धुव्वा)
 
भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफने काळ्या फिती बांधल्या होत्या. हॉकी संघाने नेहमीच आपल्याला भारतीय लष्कारसंबंधी असलेला आदर व्यक्त केला आहे. तसंच दहशतवाद्यांकडून होणा-या भ्याड हल्ल्याचाही निषेध केला आहे. 
 
अनेकदा खेळाडू शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तसंच मत व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. 2016 आशिया चॅम्पिअन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर श्रीजेश यांनी संघांचा विजय जवानांना समर्पित केला होता. अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. 
 
"काळ्या फित बांधून खेळण्याचा निर्णय सर्वांनी मिळून घेतला होता. तसंच जम्मू काश्मीरमध्ये शांतता नांदावी यासाठी आम्ही प्रार्थना करतो", असं हॉकी इंडियाचे महासचिव मोहम्मद मुश्ताक अहमद यांनी सांगितलं आहे. 
कर्णधार मनप्रीत सिंह बोलला आहे की, "आम्हाला मैदानावर जिंकून दाखवून द्यायचं होतं की, आम्हाला फक्त आमच्या देशाचा अभिमान नाही, तर आमचा ज्याच्यावर विश्वास आहे त्यासाठी एकत्र येऊ खेळाच्या माध्यमातून लढू". 
भारताने अनुभवहीन पाकिस्तान संघाविरुद्ध खेळाच्या प्रत्येक विभागात वर्चस्व गाजवले. या पराभवामुळे पाकिस्तानचे विश्वकप स्पर्धेत स्थान मिळवण्याचे स्वप्न जवळजवळ भंगले. कारण या स्पर्धेतील हा त्यांचा सलग तिसरा पराभव ठरला.
पहिल्या क्वार्टरमध्ये खेळ बरोबरीत होता. उभय संघांचे चेंडूवरील नियंत्रण समसमान होते. भारताने दुसऱ्या क्वार्टरमध्ये आक्रमक खेळ करताना दोन गोल नोंदवले.
 
ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीत सिंगने १३ व्या मिनिटाला संघाचे खाते उघडले. त्याने तिसऱ्या पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवला. हरमनप्रीतला अचूक फ्लिक लगावता आला नाही, पण पाकिस्तानचा गोलकीपर अमजद अली याला गुंगारा देण्यासा पुरेसा ठरला.
 
दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला पाकिस्तानला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण बिलालला त्यावर गोल नोंदविता आला नाही. भारताने जोरदार प्रत्युत्तर देताना पुढच्याच मिनिटाला गोल नोंदवला. तलविंदरने चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखवित भारताची आघाडी वाढविली. दरम्यान, मनदीप सिंगला ग्रीनकार्ड दाखविण्यात आल्यामुळे काही वेळ भारताला १० खेळाडूंसह खेळावे लागले. भारतातर्फे तिसरा गोल तलविंदरने नोंदवला, पण हा गोल म्हणजे अनुभवी मिडफिल्डर सरदार सिंगच्या प्रयत्नांचा परिपाक होता. अखेरच्या क्षणी तलविंदरने चेंडूला गोलजाळ्यात ढकलले. सरदारसिंगने डीमध्ये मिळालेल्या संधीवर स्वत:च फटका मारण्याचा विचार केला, पण त्यानंतर त्याने तलविंदरला पास दिला. ब्रेकदरम्यान भारतीय संघ ३-० ने आघाडीवर होता.
 
ब्रेकनंतरही भारताने आक्रमक पवित्रा कायम राखला. मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर हरमनप्रीतने सामन्यातील दुसरा गोल नोंदवित भारताला ४-० अशी आघाडी मिळवून दिली. प्रत्युत्तरात पाक संघाने पेनल्टी कॉर्नर मिळवला, पण विकास दहियाने उत्कृष्ट बचाव करीत त्यांचे गोल करण्याचे प्रयत्न हाणून पाडले. भारतातर्फे पाचवा गोल आकाशदीपने ४७ व्या मिनिटाला नोंदवला. त्यानंतर दोन मिनिटांनी प्रदीप मोरने आघाडी ६-० अशी केली.
 
सामना संपण्यास ३ मिनिटे शिल्लक असताना पाकिस्तानतर्फे उमर भुट्टाने एकमेव गोल नोंदवला. पाकिस्तानला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर बिलालचा फटका भारताने अडवला, पण रिबाऊंडवर भुट्टाने गोल नोंदवला. आकाशदीपने अखेरच्या मिनिटाला गोल नोंदविता भारताला ७-१ ने विजय मिळवून दिला.
 
भारतातर्फे हरमनप्रीत सिंग (१३ व ३३ वा मिनिट), तलविंदर सिंग (२१ व २४ वा मिनिट), आकाशदीप सिंग (४७ व ५९ वा मिनिट) आणि प्रदीप मोर (४९ वा मिनिट) यांनी गोल नोंदवले, तर पाकिस्तानतर्फे एकमेव गोल उमर भुट्टा (५७ वा मिनिट) याने केला. पाकचा या स्पर्धेतील हा पहिला गोल ठरला. या विजयासह भारताने उपांत्यपूर्व फेरीत यजमान इंग्लंड आणि आॅलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनाविरुद्धची लढतीची शक्यता टाळली.