शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

भारताने मालिका जिंकली

By admin | Updated: July 13, 2015 00:44 IST

मुरली विजय आणि अजिंक्य रहाणेच्या अर्धशकानंतर भुवनेश्वरच्या अप्रतिम माऱ्याच्या बळावर भारताने रविवारी दुसऱ्या वन-डे मध्ये झिम्बाब्वेवर ६२ धावांनी विजय

हरारे : मुरली विजय आणि अजिंक्य रहाणेच्या अर्धशकानंतर भुवनेश्वरच्या अप्रतिम माऱ्याच्या बळावर भारताने रविवारी दुसऱ्या वन-डे मध्ये झिम्बाब्वेवर ६२ धावांनी विजय साजरा करीत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी मिळविली. भारताच्या ५० षटकांतील ८ बाद २७१ धावांचा पाठलाग करणारा यजमान संघ ४९ षटकांत २०९ धावांत बाद झाला.भुवनेश्वरने ३३ धावा देत चार गडी बाद केले. ३ बाद ४३ अशा अवस्थेतून बाहेर झिम्बाब्वेला काढणारा चामू चिभाभा याची ७२ धावांची झुंज व्यर्थ ठरली. भारताने पहिला सामना चार धावांनी जिंकला होता. रहाणे-विजय यांनी दिलेली चांगली सुरुवात भारतीय संघासाठी लाभदायी ठरली. भारतीय फिरकी गोलंदाजांनीही शानदार मारा केला. हरभजन आणि अक्षर पटेल यांनी मधल्या षटकांत यजमान फलंदाजांना अक्षरश: बांधून ठेवले होते.तत्पूर्वी, झिम्बाब्वेचा कर्णधार चिगुंबुराने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला़ भारताच्या मुरली विजय आणि कर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या अर्धशतकांच्या बळावर झिम्बाब्वेविरुद्ध ८ गडी गमावून २७१ पर्यंत मजल मारली. विजयने ९५ चेंडूंत ७२ आणि रहाणेने ८३ चेंडूंत ६३ धावा ठोकल्या. या दोघांनी सलामीला २६ षटकांत ११२ धावांची भागीदारी रचत झकास सुरुवात केली. झिम्बाब्वेचा कर्णधार एल्टन चिगुंबुरा याने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजी दिली. फॉर्ममध्ये असलेल्या अंबाती रायुडूने ५० चेंडूंत तीन चौकारांसह ४१ धावा केल्या, पण मनोज तिवारी २२ आणि रॉबिन उथप्पा १३ हे दोघेही निवडकर्त्यांचा विश्वास जिंकण्यात अपयशी ठरले. स्टुअर्ट बिन्नीने अखेरच्या क्षणी १६ चेंडंूवर वेगवान २५ धावा केल्या. जखमी पनयांगाराऐवजी संघात आलेला नेव्हिले मादजिवा याने ४७ धावा देत सर्वाधिक चार गडी बाद केले. मालिकेत १-० ने आघाडी घेणाऱ्या भारताची सुरुवात चांगली झाली. पण झिम्बाब्वेच्या शिस्तबद्ध माऱ्यापुढे दोन्ही सलामीवीरांना मोकळेपणाने खेळता येत नव्हते. रहाणे-विजय यांना उसळी घेणाऱ्या स्विंग चेंडूंमुळे ताळमेळ साधणे कठीण जात होते. पण रहाणेने खराब चेंडूंवर अप्रतिम फटके मारले. २२ व्या षटकात कर्णधाराचे अर्धशतक पूर्ण झाले. २६ व्या षटकात तो चामू चिभाभाकडे कव्हरमध्ये सोपा झेल देत परतला. दुसऱ्या टोकावर असलेल्या विजयने वन डे पदार्पणाच्या पाच वर्षे चार महिन्यांनंतर पहिले अर्धशतक गाठले. यानंतर चिभाभा आणि व्हेटोरीला सलग दोन षटकार खेचले. मादजिवाला मोठा फटका मारण्याच्या नादात विजय झेलबाद झाला. रायुडूने विजयसोबत ४७ आणि तिवारीसोबत ४४ धावांची भागीदारी केली. यांनतर पाठोपाठ गडी बाद होत गेल्याने ३०० चा पल्ला गाठण्यात अपयश आले. केदार जाधवने अखेरच्या षटकात बाद होण्यापूर्वी १६ धावा कुटल्या.

मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने वन-डेत बळींचे अर्धशतक गाठले. सन २०१२ मध्ये पाकविरुद्ध पदार्पण करणाऱ्या भुवीने पहिल्याच चेंडूवर मोहम्मद हफिजला बाद करीत सनसनाटी पसरवली होती. आज ४९ व्या सामन्यात त्याने ५० बळी पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो ३३वा भारतीय गोलंदाज आहे. २५ वर्षांच्या भुवीची सर्वोत्कृष्ट कामगिरी आठ धावांत चार बळी अशी आहे. १२ कसोटीत त्याचे २९ बळी आहेत.भारत धावफलकभारत : अजिंक्य रहाणे झे. रझा गो. चिभाभा ६३, मुरली विजय झे. वालेर गो. मादजिवा ७२, अंबाती रायुडू झे. वालेर गो. रझा ४१, मनोज तिवारी झे. व्हेटोरी गो. त्रिपानो २२, रॉबिन उथप्पा त्रि. गो. मादजिवा १३, स्टुअर्ट बिन्नी झे. रझा गो. व्हेटोरी २५, केदार जाधव झे. मुतुंबमी गो, मादजिवा १६, हरभजनसिंग नाबाद ५, अक्षर पटेल झे. रझा गो. मादजिवा १, भुवनेश्वर कुमार नाबाद ००, अवांतर : १३, एकूण : ५० षटकांत ८ बाद २७१ धावा. गडी बाद क्रम : १/११२, २/१५९, ३/२०३, ४/२०५, ५/२३३, ६/२६४, ७/२६६, ८/२६९. गोलंदाजी : व्हेटोरी ८-०-४७-१, त्रिपानो ९-०-४२-१, मादजिवा १०-०-४९-४, विलियम्स ५-०-२३-०, क्रेमर ५-०-३२-०, चिभाभा ५-०-२७-१, मस्कद्जा ४-०-२६-०, रझा ४-०-२५-१.झिम्बाब्वे : सिबांडा झे, विजय गो. कुलकर्णी २, चिभाभा धावबाद ७२, मस्कद्जा झे. उथप्पा गो. कुमार ५, चिगुंबुरा झे. रहाणे गो. कुमार ९, विलियम्स त्रि, गो. पटेल २०, सिकंदर रझा झे. उथप्पा गो. हरभजन १८, आर. मुतुबामी झे. पटेल गो. बिन्नी ३२, क्रेमर झे. रहाणे गो. कुमार २७, मादजिवा धावबाद ००, त्रिपानो झे. पटेल गो. कुमार ६, व्हेटोरी नाबाद ८. अवांतर १०, एकूण : ४९ षटकांत सर्वबाद २०९ . गडी बाद क्रम : १/२४, २/३१, ३/४३, ४/९५, ५/१३०, ६/१३२, ७/१८४, ८/१८६, ९/१९५, १०/२०९. गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार १०-३-३३-३, धवल कुलकर्णी ९-१-३९-१, हरभजनसिंग १०-०-२९-१, स्टुअर्ट बिन्नी ७-०-४२-१, अक्षर पटेल १०-१-४०-१, मुरली विजय ३-०-१८-०. (वृत्तसंस्था)