शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भारत ‘अ’ संघ मजबूत स्थितीत

By admin | Updated: February 6, 2017 01:41 IST

अनिकेत चौधरीच्या अचूक माऱ्यानंतर गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर भारत ‘अ’ संघाने रविवारी खेळल्या जात असलेल्या दोनदिवसीय सराव सामन्यात आज पहिल्या दिवसअखेर बांगलादेशविरुद्ध वर्चस्व गाजवले.

हैदराबाद : अनिकेत चौधरीच्या अचूक माऱ्यानंतर गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर भारत ‘अ’ संघाने रविवारी खेळल्या जात असलेल्या दोनदिवसीय सराव सामन्यात आज पहिल्या दिवसअखेर बांगलादेशविरुद्ध वर्चस्व गाजवले. डावखुरा वेगवान गोलंदाज अनिकेतने अचूक मारा करताना २६ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. बांगलादेश संघाने नियमित अंतरात विकेट गमावल्यानंतर त्यांनी ६७ षटकांत ८ बाद २२४ धावसंख्येवर पहिला डाव घोषित केला. बांगलादेशतर्फे सौम्या सरकार (५२) आणि कर्णधार मुशफिकुर रहीम (५८) यांनी अर्धशतके झळकावली. शब्बीर रहमान (३३) व महमुदुल्लाह (२३) यांना चांगल्या सुरुवातीनंतर मोठी खेळी करण्यात अपयश आले, तर लिटन दास २३ धावा काढून नाबाद राहिला. भारत ‘अ’ संघातर्फे चामा मिलिंद, विजय शंकर, शहाबाज नदीम आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. प्रत्युत्तरात खेळताना भारत ‘अ’ संघाने सलामीवीर फलंदाज व कर्णधार अभिनव मुकुंदच्या (१६) मोबदल्यात दिवसअखेर १ बाद ९१ धावांची मजल मारली. यंदाच्या रणजी मोसमात सर्वाधिक धावा फटकावणारा सलामीवीर प्रियांक पांचाल ४० धावांवर खेळत असून, त्याला दुसऱ्या टोकाकडून श्रेयस अय्यर (२९) साथ देत होता. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली आहे. भारत ‘अ’ संघ अद्याप १३३ धावांनी पिछाडीवर असून, त्यांच्या ९ विकेट शिल्लक आहेत. बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात समावेश असलेल्या मुकुंदने निराश केले. त्याला केवळ १६ धावा फटकावता आल्या. वेगवान गोलंदाज शुभाशिष रॉयच्या गोलंदाजीवर तो इमरुल कायेसकडे झेल देत माघारी परतला. त्यानंतर पांचाल व अय्यर यांनी बांगलादेशच्या गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. त्याआधी, बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला, पण त्यांची सुरुवात निराशाजनक झाली. कायेस केवळ ४ धावा काढून चामा मिलिंदचा लक्ष्य ठरला. चौधरीने तमीम इक्बाल (१३) व मोमिनुल हक (५) यांना माघारी परतवत बांगलादेशची ३ बाद ७२ अशी अवस्था केली. सौम्या सरकारने ७३ चेंडूंना सामोरे जाताना नऊ चौकार व एका षटकाराच्या मदतीने ५२ धावांची खेळी केली. त्याला नदीमने तंबूचा मार्ग दाखविला. कुलदीपने महमुदुल्लाह याला माघारी परतवत बांगलादेशला पाचवा धक्का दिला. मुशफिकुर व शब्बीर यांनी सहाव्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. पण शंकरने शब्बीरला बाद करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. मुशफिकुर अर्धशतकी खेळी केल्यानंतर चौधरीचे लक्ष्य ठरला. त्याने १०६ चेंडूंना सामोरे जाताना आठ चौकार व एक षटकार लगावला. चौधरीने मेहदी हसनला (०) खाते उघडण्यापूर्वीच तंबूचा मार्ग दाखविताना आपला चौथा बळी नोंदवला. त्यानंतर काही वेळाने बांगलादेशचा कर्णधार मुशफिकुरने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. (वृत्तसंस्था)