शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
2
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
3
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
4
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
5
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
6
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
8
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
9
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
10
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
11
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
12
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
13
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
14
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
15
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
16
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
17
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
18
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
19
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
20
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर

भारत ‘अ’ संघ मजबूत स्थितीत

By admin | Updated: February 6, 2017 01:41 IST

अनिकेत चौधरीच्या अचूक माऱ्यानंतर गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर भारत ‘अ’ संघाने रविवारी खेळल्या जात असलेल्या दोनदिवसीय सराव सामन्यात आज पहिल्या दिवसअखेर बांगलादेशविरुद्ध वर्चस्व गाजवले.

हैदराबाद : अनिकेत चौधरीच्या अचूक माऱ्यानंतर गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर भारत ‘अ’ संघाने रविवारी खेळल्या जात असलेल्या दोनदिवसीय सराव सामन्यात आज पहिल्या दिवसअखेर बांगलादेशविरुद्ध वर्चस्व गाजवले. डावखुरा वेगवान गोलंदाज अनिकेतने अचूक मारा करताना २६ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. बांगलादेश संघाने नियमित अंतरात विकेट गमावल्यानंतर त्यांनी ६७ षटकांत ८ बाद २२४ धावसंख्येवर पहिला डाव घोषित केला. बांगलादेशतर्फे सौम्या सरकार (५२) आणि कर्णधार मुशफिकुर रहीम (५८) यांनी अर्धशतके झळकावली. शब्बीर रहमान (३३) व महमुदुल्लाह (२३) यांना चांगल्या सुरुवातीनंतर मोठी खेळी करण्यात अपयश आले, तर लिटन दास २३ धावा काढून नाबाद राहिला. भारत ‘अ’ संघातर्फे चामा मिलिंद, विजय शंकर, शहाबाज नदीम आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. प्रत्युत्तरात खेळताना भारत ‘अ’ संघाने सलामीवीर फलंदाज व कर्णधार अभिनव मुकुंदच्या (१६) मोबदल्यात दिवसअखेर १ बाद ९१ धावांची मजल मारली. यंदाच्या रणजी मोसमात सर्वाधिक धावा फटकावणारा सलामीवीर प्रियांक पांचाल ४० धावांवर खेळत असून, त्याला दुसऱ्या टोकाकडून श्रेयस अय्यर (२९) साथ देत होता. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली आहे. भारत ‘अ’ संघ अद्याप १३३ धावांनी पिछाडीवर असून, त्यांच्या ९ विकेट शिल्लक आहेत. बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात समावेश असलेल्या मुकुंदने निराश केले. त्याला केवळ १६ धावा फटकावता आल्या. वेगवान गोलंदाज शुभाशिष रॉयच्या गोलंदाजीवर तो इमरुल कायेसकडे झेल देत माघारी परतला. त्यानंतर पांचाल व अय्यर यांनी बांगलादेशच्या गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. त्याआधी, बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला, पण त्यांची सुरुवात निराशाजनक झाली. कायेस केवळ ४ धावा काढून चामा मिलिंदचा लक्ष्य ठरला. चौधरीने तमीम इक्बाल (१३) व मोमिनुल हक (५) यांना माघारी परतवत बांगलादेशची ३ बाद ७२ अशी अवस्था केली. सौम्या सरकारने ७३ चेंडूंना सामोरे जाताना नऊ चौकार व एका षटकाराच्या मदतीने ५२ धावांची खेळी केली. त्याला नदीमने तंबूचा मार्ग दाखविला. कुलदीपने महमुदुल्लाह याला माघारी परतवत बांगलादेशला पाचवा धक्का दिला. मुशफिकुर व शब्बीर यांनी सहाव्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. पण शंकरने शब्बीरला बाद करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. मुशफिकुर अर्धशतकी खेळी केल्यानंतर चौधरीचे लक्ष्य ठरला. त्याने १०६ चेंडूंना सामोरे जाताना आठ चौकार व एक षटकार लगावला. चौधरीने मेहदी हसनला (०) खाते उघडण्यापूर्वीच तंबूचा मार्ग दाखविताना आपला चौथा बळी नोंदवला. त्यानंतर काही वेळाने बांगलादेशचा कर्णधार मुशफिकुरने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. (वृत्तसंस्था)