शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

भारत ‘अ’ संघ मजबूत स्थितीत

By admin | Updated: February 6, 2017 01:41 IST

अनिकेत चौधरीच्या अचूक माऱ्यानंतर गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर भारत ‘अ’ संघाने रविवारी खेळल्या जात असलेल्या दोनदिवसीय सराव सामन्यात आज पहिल्या दिवसअखेर बांगलादेशविरुद्ध वर्चस्व गाजवले.

हैदराबाद : अनिकेत चौधरीच्या अचूक माऱ्यानंतर गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर भारत ‘अ’ संघाने रविवारी खेळल्या जात असलेल्या दोनदिवसीय सराव सामन्यात आज पहिल्या दिवसअखेर बांगलादेशविरुद्ध वर्चस्व गाजवले. डावखुरा वेगवान गोलंदाज अनिकेतने अचूक मारा करताना २६ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. बांगलादेश संघाने नियमित अंतरात विकेट गमावल्यानंतर त्यांनी ६७ षटकांत ८ बाद २२४ धावसंख्येवर पहिला डाव घोषित केला. बांगलादेशतर्फे सौम्या सरकार (५२) आणि कर्णधार मुशफिकुर रहीम (५८) यांनी अर्धशतके झळकावली. शब्बीर रहमान (३३) व महमुदुल्लाह (२३) यांना चांगल्या सुरुवातीनंतर मोठी खेळी करण्यात अपयश आले, तर लिटन दास २३ धावा काढून नाबाद राहिला. भारत ‘अ’ संघातर्फे चामा मिलिंद, विजय शंकर, शहाबाज नदीम आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. प्रत्युत्तरात खेळताना भारत ‘अ’ संघाने सलामीवीर फलंदाज व कर्णधार अभिनव मुकुंदच्या (१६) मोबदल्यात दिवसअखेर १ बाद ९१ धावांची मजल मारली. यंदाच्या रणजी मोसमात सर्वाधिक धावा फटकावणारा सलामीवीर प्रियांक पांचाल ४० धावांवर खेळत असून, त्याला दुसऱ्या टोकाकडून श्रेयस अय्यर (२९) साथ देत होता. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली आहे. भारत ‘अ’ संघ अद्याप १३३ धावांनी पिछाडीवर असून, त्यांच्या ९ विकेट शिल्लक आहेत. बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात समावेश असलेल्या मुकुंदने निराश केले. त्याला केवळ १६ धावा फटकावता आल्या. वेगवान गोलंदाज शुभाशिष रॉयच्या गोलंदाजीवर तो इमरुल कायेसकडे झेल देत माघारी परतला. त्यानंतर पांचाल व अय्यर यांनी बांगलादेशच्या गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. त्याआधी, बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला, पण त्यांची सुरुवात निराशाजनक झाली. कायेस केवळ ४ धावा काढून चामा मिलिंदचा लक्ष्य ठरला. चौधरीने तमीम इक्बाल (१३) व मोमिनुल हक (५) यांना माघारी परतवत बांगलादेशची ३ बाद ७२ अशी अवस्था केली. सौम्या सरकारने ७३ चेंडूंना सामोरे जाताना नऊ चौकार व एका षटकाराच्या मदतीने ५२ धावांची खेळी केली. त्याला नदीमने तंबूचा मार्ग दाखविला. कुलदीपने महमुदुल्लाह याला माघारी परतवत बांगलादेशला पाचवा धक्का दिला. मुशफिकुर व शब्बीर यांनी सहाव्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. पण शंकरने शब्बीरला बाद करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. मुशफिकुर अर्धशतकी खेळी केल्यानंतर चौधरीचे लक्ष्य ठरला. त्याने १०६ चेंडूंना सामोरे जाताना आठ चौकार व एक षटकार लगावला. चौधरीने मेहदी हसनला (०) खाते उघडण्यापूर्वीच तंबूचा मार्ग दाखविताना आपला चौथा बळी नोंदवला. त्यानंतर काही वेळाने बांगलादेशचा कर्णधार मुशफिकुरने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. (वृत्तसंस्था)