शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

'अजिंक्य' शतकाने भारत मजबूत स्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2016 07:47 IST

वेस्ट इंडिज विरुद्ध जमैकामध्ये सुरु असलेल्या दुस-या कसोटी सामन्यात भारताची स्थिती बळकट झाली आहे.

ऑनलाइन लोकमत 

जमैका, दि. २ - वेस्ट इंडिज विरुद्ध जमैकामध्ये सुरु असलेल्या दुस-या कसोटी सामन्यात भारताची स्थिती बळकट झाली आहे. लोकेश राहुलपाठोपाठ सोमवारी कसोटीच्या तिस-या दिवशी अजिंक्य रहाणेने दमदार शतक झळकवले. रहाणेच्या शतकाच्या बळावर भारताला तीनशेपेक्षा जास्त धावांची आघाडी घेता आली. रहाणेने नाबाद १०८ धावा केल्या. 
 
कर्णधार विराट कोहलीने संघाच्या ९ बाद ५०० धावा असताना डाव घोषित केला. भारताकडे आता एकूण ३०४ धावांची आघाडी आहे. भारताने डाव घोषित करुन वेस्ट इंडिजला फलंदाजीची संधी दिली. पण त्यानंतर पाऊस सुरु झाल्यामुळे खेळ होऊ शकला नाही. पावसामुळे ४० षटकांचा खेळ वाया गेला. मंगळवारी अर्धा तास आधी सामना सुरु होऊ शकतो. दिवसभरात ९८ षटकांचे लक्ष्य आहे. 
 
कसोटीचे दोन दिवस शिल्लक असून चौथ्या दिवशीही हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. भारताने वेस्ट इंडिजला दिलेले लक्ष्य तसे कठिण आहे. कारण वेस्ट इंडिजची या मालिकेतील सर्वोच्च धावसंख्या २४३ आहे. रहाणेचे हे सातवे शतक आहे. 
वुद्धीमान सहाने ४७ धावा करुन रहाणेला चांगली साथ दिली. दोघांनी सहाव्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी केली. वेस्ट इंडिजकडून रॉसटॉन चेसने प्रभावी गोलंदाजी केली. त्याने १२१ धावांच्या मोबदल्यात सर्वाधिक पाच गडी बाद केले.