शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

‘भारताने गोलंदाजांची हीच फळी कायम राखावी’

By admin | Updated: January 13, 2015 02:32 IST

आॅस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत ०-२ने पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय गोलंदाजांना टीकेला सामोरे जावे लागले;

सिडनी : आॅस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत ०-२ने पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय गोलंदाजांना टीकेला सामोरे जावे लागले; पण आॅस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज डेमियन फ्लेमिंग याने वर्तमान संघातील गोलंदाजांच्या गटाला कायम राखले, तर भारतीय संघाला प्रदीर्घ कालावधीसाठी लाभ मिळेल, असे मत व्यक्त केले आहे.फ्लेमिंग म्हणाला, ‘‘माझ्या मते, गोलंदाजांच्या या गटाला शिकण्याची संधी देणे आवश्यक आहे. ईशांत शर्माच्या कामगिरीत सातत्य येत आहे. उमेश यादव व वरुण अ‍ॅरोन यांच्यामध्ये १४० किलोमीटर प्रतितास वेगाने मारा करण्याची क्षमता आहे. त्याचसोबत ते स्विंग मारा करण्यास सज्ज आहे. जगात अशी क्षमता असलेले गोलंदाज मोजके आहेत. त्यामुळे त्यांना अधिक संधी मिळायला हवी.’’फ्लेमिंग पुढे म्हणाला, ‘‘मोहंमद शमी प्रभावी गोलंदाज आहे; पण तो अधिक वेगाने गोलंदाजी करीत नाही. तो चेंडू स्विंग करतो. भुवनेश्वरला स्विंग गोलंदाजीचे वरदान लाभले आहे. अनुकूल परिस्थितीमध्ये भारताकडे त्याला खेळविण्याचा पर्याय उपलब्ध आहे.’’समालोचक झालेला फ्लेमिंग पुढे म्हणाला, ‘‘गोलंदाजांना कामगिरीत सातत्य राखता न आल्यामुळे संघाच्या रणनीतीवर प्रभाव पडतो. माझ्या मते, भारताचे गोलंदाज मानसिकदृष्ट्या कणखर नाहीत. त्यांच्या गोलंदाजीमध्ये परिपक्वता दिसत नाही. ते झटपट यश मिळविण्यास प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. सध्याच्या क्रिकेटपटूंच्या पिढीमध्ये हे प्रामुख्याने दिसून येते. कसोटी क्रिकेटमध्ये धैर्य असणे गरजेचे असते आणि भारतीय गोलंदाजीमध्ये त्याचा अभाव दिसतो.’’आॅस्ट्रेलियाविरुद्ध ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय गोलंदाजांनी धावा बहाल तर केल्याच; पण त्याचसोबत त्यांना आॅस्ट्रेलियाच्या २० विकेट घेण्यात अपयश आले. पाहुण्या संघाच्या गोलंदाजांनी यजमान संघाच्या गोलंदाजांकडून धडा घ्यावा, असेही फ्लेमिंग म्हणाला.फ्लेमिंगने पुढे सांगितले, की भारतीय गोलंदाजांना लेंथमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. रॅन हॅरिसप्रमाणे आपल्याही चेंडूला टप्पा कसा असावा, याचा सराव करणे आवश्यक आहे. हॅरिस फलंदाजाला अधिकाधिक चेंडू खेळण्यास बाध्य करतो. भारतीय गोलंदाजांनी उजव्या यष्टिबाहेर मारा करण्याचे निश्चित करावे. भारतीय संघ मायदेशात सहज विजय मिळवितो; पण विदेशात विजय मिळविण्यासाठी त्यांना चांगली कामगिरी करणे शिकावे लागेल. आॅस्ट्रेलियासह विश्व क्रिकेटमधील सर्व संघ सध्याचा तसा प्रयत्न करीत आहेत. भारतीय गोलंदाजांनी सिडनीमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी निराशाजनक कामगिरी केली. त्यांनी एका सत्रात २१३ धावा बहाल करताना प्रतिस्पर्धी आॅस्ट्रेलिया संघाला विजयाची संधी बहाल केली. (वृत्तसंस्था)