शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
3
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
4
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
7
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
8
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
9
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
10
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
11
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
12
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
13
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
14
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
15
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
16
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
17
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
18
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
19
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
20
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा मालिका विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2016 03:30 IST

रविचंद्रन आश्विनने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना रविवारी ४ षटकांत ८ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले.

आश्विनचा अचूक मारा : टी-२० क्रमवारीत अव्वल स्थान कायमविशाखापट्टणम : रविचंद्रन आश्विनने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना रविवारी ४ षटकांत ८ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. आश्विनच्या कामगिरीच्या जोरावर भारताने तिसऱ्या व निर्णायक टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रीलंकेचा ३७ चेंडू व ९ गडी राखून पराभव करीत तीन सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी सरशी साधली. भारताने या विजयासह टी-२० क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले, तर श्रीलंका संघ चौथ्या स्थानी आहे. भारताने श्रीलंकेचा डाव १८ षटकांत ८२ धावांत गुंडाळला आणि विजयासाठी आवश्यक धावा १३.५ षटकांत एक गडी गमावत पूर्ण केल्या. सलामीवीर शिखर धवन (४६ धावा, ५ चौकार, १ षटकार) आणि अजिंक्य रहाणे (२२) यांना दुसऱ्या विकेटसाठी ५५ धावांची अभेद्य भागीदारी करीत भारताला विजयावर शिक्कामोर्तब करून दिले. पुणे येथील सलामी लढतीत पराभव स्वीकारणाऱ्या भारतीय संघाने रांची येथील दुसऱ्या लढतीत ६९ धावांनी विजय मिळवला होता. तिसऱ्या व अखेरच्या लढतीत भारतीय गोलंदाजांची कामगिरी संस्मरणीय ठरली. श्रीलंकेच्या केवळ दोन फलंदाजांना दुहेरी धावसंख्या नोंदवता आली. त्यात दासून शनाकाने सर्वाधिक १९ धावा फटकावल्या. पाहुण्या संघाची टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही नीचांकी धावसंख्या ठरली. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा कर्णधार धोनीचा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. या लढतीत भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासून वर्चस्व गाजवले. आश्विनव्यतिरिक्त भारतातर्फे सुरेश रैनाने २ षटकांत ६ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा व आशिष नेहरा यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. श्रीलंकेचा हा टी-२० क्रिकेटमधील धावसंख्येचा नीचांक ठरला. यापूर्वीची नीचांकी धावसंख्या ८७ होती. २०१० मध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिजटाऊनमध्ये श्रीलंका संघाने केवळ ८७ धावा फटकाविल्या होत्या. १०० धावांचा पल्ला गाठण्यात अपयशी ठरण्याची श्रीलंका संघाची ही चौथी वेळ आहे.धोनीने सुरुवातीलाच आपला हुकमी एक्का आश्विनकडून गोलंदाजीची सुरुवात केली. आॅफ स्पिनर आश्विनने लुप व फ्लाईटच्या जोरावर श्रीलंकेच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांना एकापाठोपाठ माघारी परतवले. पहिल्या षटकात त्याने निरोशन डिकवाला (१) व तिलकरत्ने दिलशान (१) यांना माघारी परतवले. आश्विनने त्यानंतरच्या षटकात कर्णधार दिनेश चंदीमल (८) याचा अडथळा दूर केला. पदार्पणाची लढत खेळणाऱ्या असेला गुणरत्ने (४) याला बाद करीत आश्विनने वैयक्तिक चौथा बळी घेतला. (वृत्तसंस्था) धावफलकश्रीलंका :- निरोशान डिकवाला यष्टिचीत धोनी गो. आश्विन १, तिलकरत्ने दिलशान पायचीत गो. आश्विन १, दिनेश चांदीमल झे. पांड्या गो. आश्विन ८, असेला गुनारत्ने झे. रैना गो. आश्विन ४, मिलिंदा सिरिवर्धने त्रि. गो. नेहरा ४, दसून शानका त्रि. गो. जडेजा १९, सीकुगे प्रसन्ना धावबाद ९, थिसारा परेरा झे. जडेजा गो. रैना १२, सचित्रा सेनानायके झे. धोनी गो. रैना ८, दुश्मंता चमिरा नाबाद ९, दिलहारा फर्नांडो त्रि.गो. बुमराह १. अवांतर (६). एकूण १८ षटकांत सर्वबाद ८२. गोलंदाजी : रविचंद्रन आश्विन ४-१-८-४, आशिष नेहरा २-०-१७-१, जसप्रीत बुमराह ३-०-१०-१, रवींद्र जडेजा ४-१-११-१, युवराज सिंग १-०-१५-०, हार्दिक पांड्या २-०-१३-०, सुरेश रैना २-०-६-२. भारत :- रोहित शर्मा पायचीत गो. चमिरा १३, शिखर धवन नाबाद ४६, अजिंक्य रहाणे नाबाद २२. अवांतर (३). एकूण १३.५ षटकांत १ बाद ८४. बाद क्रम : १-२९. गोलंदाजी : सेनानायके ४-०-२२-०, फर्नांडो २-०-७-०, चमिरा २-०-१४-१, प्रसन्ना १-०-३-०, श्रीवर्धने १-०-९-०, गुणरत्ने २.५-०-२२-०, दिलशान १-०-४-०.