शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

तर भारत उपांत्य फेरीत...

By admin | Updated: March 24, 2016 17:09 IST

बांगलादेशच्या तोंडातील विजयाचा घास हिसकावून घेत एका धावेने विजय मिळवला असला तरी भारताचे उपांत्य फेरीतील स्थान अद्याप फिक्स झालेलं नाही. टी २० विश्वचषक अंतिम टप्यात आलेला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - शेवटच्या क्षणापर्यंत रोमहर्षक झालेल्या सामन्यात धोनी ब्रिगेडने झुंझार वृत्तीचे प्रदर्शन करीत बांगलादेशच्या तोंडातील विजयाचा घास हिसकावून घेत एका धावेने विजय मिळवला असला तरी भारताचे उपांत्य फेरीतील स्थान अद्याप फिक्स झालेलं नाही. टी २० विश्वचषक अंतिम टप्यात आलेला आहे. प्रत्येक सामना रंगतदार होत आहे.
 
१० संघापैकी न्युझीलंड संघ उपांत्य फेरीत धाकल झाला आहे. ब गटात अतिशय चुरशीचे सामने चालू आहेत. ब गटातील भारत, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघाला उपांत्या फेरीत जाण्याच्या संधी आहे. भारताचे ३ सामने झाले आहेत. त्यापैकी २ सामने जिंकून ब गटात दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे.
उपांत्यासामन्यासाठी काही महत्वाच्या बाबीवर टाकलेली एक नजर
 
- भारत सध्या पॉईंटटेबलमध्ये चार गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. मात्र त्यांचा रनरेट -०.५५ इतका आहे. यापुढील दोन सामने भारतासाठी महत्त्वाचे आहेत. पहिला म्हणजे ऑस्ट्रेलिया वि पाकिस्तान आणि त्यानंतर भारत वि ऑस्ट्रेलिया.
- शुक्रवारी पाकिस्तानचा सामना ऑस्ट्रेलियाशी होतोय. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवल्यास त्यांचे भारताइतकेच चार गुण होतील. त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढत महत्त्वाची असेल. हा सामना बरोबरीत सुटल्यास रनरेटच्या आधारावर ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये जाईल. 
- समजा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवल्यास त्यांचेही गुण ४ होतील. तसेच त्यांचा रनरेटही चांगला आहे. त्यांचा सध्याचा रनरेट ०.२५ आहे तर भारताचा -०.५५ इतका आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना पाकिस्तान जिंकल्यास त्यांचा रनरेटही सुधारेल. दुसरीकडे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दोघांसाठी सामना जिंकणे महत्त्वाचे असेल. भारत या सामन्यात जिंकल्यास त्यांच्यासाठी सेमीफायनलेच दरवाजे उघडतील मात्र दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला केवळ विजय मिळवून चालणार नाही तर मोठ्या फरकाने त्यांना विजय मिळवावा लागेल. ऑस्ट्रेलिया - भारत यांच्यात सामना झाला नाही तर भारताचे ५ गुण होतील. 
- समजा पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्याती सामना न झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक-एक गुण मिळतील. ऑस्ट्रेलियाचे तीन गुण होतील. त्यानंतर भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील मुकाबला महत्त्वाचा असेल. मात्र भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यातही सामना होऊ शकला नाही तर पुन्हा दोन्ही संघांना एक एक गुण मिळेल. भारताचे यानंतर पाच गुण होतील.
- जर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून हरल्यास तर त्यांचे चार गुण राहतील. मात्र ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध विजय मिळवला आणि पाकिस्तानविरुद्ध त्यांचा पराभव झाल्यास त्यांचेही चार गुण राहतील. तसेच पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला हरवल्यास त्यांचेही ४ गुण होतील. यावेळी रनरेटद्वारे भारत, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यापैकी एक संघ सेमीफायनलमध्ये पोहोचेल
- ऑस्ट्रेलियाचे दोन सामने शिल्लक आहेत. एक भारताविरुद्ध आणि दुसरा पाकिस्तानविरुद्ध. हे दोन्ही सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले, तर ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत जाईल आणि भारत स्पर्धेबाहेर.