शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

मालिका विजयासाठी भारताला २४३ धावांचे लक्ष्य

By admin | Updated: November 9, 2014 17:42 IST

तिस-या एकदिवसीय सामन्यात महेला जयवर्धनेच्या दमदार शतकाने श्रीलंकेला तारले असून श्रीलंकेने भारतासमोर विजयासाठी २४३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

 ऑनलाइन लोकमत

हैद्राबाद, दि. ९ - तिस-या एकदिवसीय सामन्यात महेला जयवर्धनेच्या दमदार शतकाने श्रीलंकेला तारले असून श्रीलंकेने भारतासमोर विजयासाठी २४३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. उमेश यादवच्या अचूक मा-याने चार फलंदाजांना बाद करत श्रीलंकेला रोखले.  

हैद्राबादमध्ये भारत विरुद्ध श्रीलंके दरम्यान तिसरा एकदिवसीय सामना सुरु असून या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकेच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्कारली. परेरा आणि संगकारा हे आघाडीचे फलंदाज स्वस्तात तंबूत परतल्याने श्रीलंकेची अवस्था २ बाद सात धावा अशी झाली होती. त्यानंतर दिलशान आणि महेला जयवर्धने या फलंदाजांनी शतकी भागीदारी करत श्रीलंकेच्या डाव तारला. दिलशानला ५३ धावांवर बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. त्यानंतर शतकवीर महेला जयवर्धनेने एकाकी झुंज देत श्रीलंकेचा डाव पुढे नेला. त्याला सीकुगे प्रसन्नाने २९ धावांची मोलाची साथ दिली. महेला जयवर्धनने ११८ धावांवर असताना आर. अश्विनच्या फिरकीने त्याची विकेट घेतली. अखेरीस श्रीलंकेचा डाव २४२ धावांवरच आटोपला. भारतातर्फे उमेश यादवने चार, अक्षर पटेलने तीन तर धवल कुलकर्णी, आर. अश्विन आणि अंबाटी रायडू यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. 

पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारत २-० ने आघाडीवर आहे. तिस-या सामन्यात विजय मिळवून मालिकाही खिशात घालण्याच्या इराद्याने भारतीय फलंदाज मैदानात उतरतील.