शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
2
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
3
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे दिसले संशयित ड्रोन; भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू
4
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
5
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
6
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
7
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
8
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
9
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
10
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
11
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
12
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
14
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
15
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
16
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
17
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
18
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
19
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
20
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य

भारत विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक

By admin | Updated: July 12, 2017 00:35 IST

भारतीय महिला संघ उद्या (बुधवारी) महिला विश्वकप क्रिकेट स्पर्धेतील महत्त्वाच्या लढतीत आॅस्ट्रेलियाविरुद्ध विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक आहे.

ब्रिस्टल : सलग चार सामन्यांत विजय मिळविल्यानंतर पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय महिला संघ उद्या (बुधवारी) महिला विश्वकप क्रिकेट स्पर्धेतील महत्त्वाच्या लढतीत आॅस्ट्रेलियाविरुद्ध विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक आहे. या लढतीत विजय मिळवित उपांत्य फेरीचा मार्ग सुकर करण्यास भारतीय संघ प्रयत्नशील आहे.भारताने स्पर्धेत शानदार सुरुवात करताना इंग्लंड, वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि श्रीलंका या संघांचा पराभव केला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने भारताचा विजयरथ रोखण्यात यश मिळवले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत भारताला ११५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.त्याचप्रमाणे सलग चार लढतींमध्ये विजय मिळविणाऱ्या आॅस्ट्रेलिया संघाचा विजयरथ इंग्लंडने रोखला. आॅस्ट्रेलिया संघही विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक आहे. अद्याप एकही संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरलेला नाही. पण सरस नेटरनरेटच्या आधारावर आॅस्ट्रेलियाची स्थिती मजबूत आहे. आॅस्ट्रेलिया संघाला इंग्लंडविरुद्ध केवळ तीन धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता, तर भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता.दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत भारताला उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्याची चांगली संधी होती. पण आता भारताला साखळी फेरीतील अखेरच्या दोन लढतींमध्ये आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंड या बलाढ्य संघांच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.गेल्या लढतीत विजयासाठी २७४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव १५८ धावांत संपुष्टात आला. एक वेळ १७ व्या षटकात भारताची ६ बाद ५६ अशी अवस्था झाली होती, पण दीप्ती शर्माने ६० धावांची खेळी करीत भारताला शंभरचा पल्ला ओलांडून दिला. झूलन गोस्वामी ४३ धावा काढून नाबाद होती.आॅस्ट्रेलियाविरुद्ध भारताची कामगिरी चांगली नाही. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ४१ पैकी केवळ ८ सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवता आला. गेल्या वेळी उभय संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या लढतीत कर्णधार मिताली राजने ८९ धावांची खेळी केली होती आणि भारताने या लढतीत ५ गडी राखून विजय मिळवला होता. भारतातर्फे स्मृती मानधना, पूनम राऊत व हरमनप्रीत कौर चांगल्या फॉर्मात आहेत, तर दीप्ती व मिताली यांनाही चांगली कामगिरी करावी लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत संघात परतलेल्या शिखा पांडेने तीन बळी घेतले होते. शिखा म्हणाली, ‘आम्हाला आॅस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. आक्रमक क्रिकेट खेळावे लागेल.’ (वृत्तसंस्था)